AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलीसांनी सांगितलं ऐकलं नाही, नंतर पोलिसांच्याच विनवण्या करण्याची वेळ आली

दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने गायकर कुटुंब हे त्यांच्या गावी नांदगाव येथे गेले होते, गाववरून परतल्यानंतर कपडे अस्ताव्यस्त असल्याने चोरी झाल्याचे लक्षात आले आहे.

पोलीसांनी सांगितलं ऐकलं नाही, नंतर पोलिसांच्याच विनवण्या करण्याची वेळ आली
Image Credit source: TV9 Network
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Nov 01, 2022 | 6:14 PM
Share

नाशिक : नाशिक शहरातील गुन्हेगारी थांबत नसतांना, नाशिक शहर पोलीसांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विशेष आवाहन केलं होतं. मौल्यवान वस्तु घरात न ठेवता त्या स्वतःजवळ बाळगा, सहलीला किंवा गावी जाणार असाल तर शेजारच्या व्यक्तीला याबाबत माहिती द्या, अशा सूचना करत आवाहन करण्यात आले होते. दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने अनेक जण गावी किंवा सहलीला जाण्याची संधी शोधत चोरटे चोऱ्या करत असतात. अनेकदा घरफोडीच्या घटना समोर येत असतात. असं असतांना पोलीसांनी खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना काही सूचना केल्या होत्या, त्याच सुचनांकडे नागरिकांनी दुर्लक्ष केल्याने तीन लाखांची रोकड आणि 44 तोळे दागिने चोरीला गेले आहे. बंगला बंद असल्याचे पाहून खिडकीचे गज कापून चोरट्यांनी मुद्देमाल लांबविला आहे.

दिवाळी सुरू होण्यापूर्वीच घरात मौल्यवान वस्तु ठेऊ नका, घरफोड्या होण्याची शक्यता असल्याने पोलीसांनी गस्त वाढविण्याबरोबरच काही सूचना केल्या होत्या.

मात्र त्या सुचनांकडे राजेश गायकर यांनी दुर्लक्ष केल्याची बाब समोर आली आहे. कामटवाडे परिसरात असलेल्या श्री समर्थ कृपा बंगलोमध्ये चोरी झाली आहे.

दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने गायकर कुटुंब हे त्यांच्या गावी नांदगाव येथे गेले होते, गाववरून परतल्यानंतर कपडे अस्ताव्यस्त असल्याने चोरी झाल्याचे लक्षात आले आहे.

चोरट्यांनी बंद बंगल्याच्या खिडकीचे गज कापूत आत प्रवेश करत तीन लाखाची रोकड, 44 तोळे सोने आणि 8 किलो चांदी चोरीला गेली आहे.

गायकर यांच्या बंगल्यात चोरी झाल्याची घटना वाऱ्यासारखी पसरली असून घरफोडी झाल्याबाबत अंबड पोलिसांत गुन्हा दाखल असून अंबड पोलिस याबाबत तपास करीत आहे.

Follow Us
खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
Rajabhau Waje | खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! राजाभाऊ वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्के काय म्हणाले?
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्केंनी सांगितलं पक्ष फुटीच्या अगदी काही दिवसांपूर्वी काय काय घडलं होतं?
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन.... शिंदे गटातील नेत्याचं विधान
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन नाहीतर.... शिंदे गटातील बड्या नेत्याचं राऊतांना खुलं चॅलेंज
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली....
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली, ५-६ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या...
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या हातात शिवसेनेचं चिन्ह...
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? निकालाआधी राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
Sanjay Raut - Naresh Mhaske | सुप्रीम कोर्टाबाहेर राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
राज ठाकरे अचानक फडणवीसांच्या भेटीला! भेटीचं नेमकं कारण काय?
मोठी बातमी! भाजपवर टीका अन् अचानक मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला! राज ठाकरेंच्या भेटीचं नेमकं कारण काय?
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?