
Crime: बाकोला एक उचकी आणि बसमध्येच तिचं आयुष्य संपलं… अशात त्या महिलेसोबत काय झालं असेल असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. महिलेला एक फोन आला आणि महिलेच्या कानावर पडलेल्या त्या तीन शब्दांमुळे महिलंचं निधन झालं… संबंधित घटना दिल्ली येथील हरदोई येथे घडली आहे. एका महिलेचं चालत्या बसमध्ये निधन झालं. महिलेला एक फोन आला आणि फोनवर जे काही संभाषण झालं ते ऐकल्यानंतर तिचं निधन झालं. फोनवर बोलणं झाल्यानंतर महिला ढसाढसा रडु लागली. अशात तिच्या आईने काय झालं विचारलं. तेव्हा महिला म्हणाली, ‘नवऱ्याच्या फोनवरून एक महिलेने फोन केला आणि मला म्हणाली तुझी सवत बोलतेय…’ हे तीन शब्द ऐकताच महिलेला उचकी आणि तिचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या मुलीचं नाव रिता असं होतं.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी महिलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. महिलेची आई गुड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘दीड वर्षांपूर्वी आम्ही आमच्या मुलीचं लग्न सीतापूर येथील मछरेहटा येथे केलं. लग्नाच्या 1 वर्षानंतर तिली टीबीचा आजार असल्याचं निदान झालं. त्यामुळे नवऱ्यानं तिला माहेरी सोडलं, पण उपचारानंतर पुन्हा समज घालून मुलीच्या संसाराची घडी बसवून दिली.’
2024 मध्येच रिता हिच्या वडिलांचे देखील निधन झालं आहे. तेव्हा देखील रिता माहेरी आली होती. तेव्हा देखील रिता आणि तिच्या पतीमध्ये वाद झाले होते. तेव्हा सुद्धा रिता हिला माहेरी सोडून तिचा नवरा निघून गेला होता. अशात रिता देखील आई आणि भावासोबत दिल्लीत आली.
आई गुड्डी यांनी घडलेली सर्व घटना पोलिसांना सांगितली आहे. रिता हिच्या नवऱ्याच्या फोनवरून एका महिलेने तिला फोन केला. तेव्हा रिता आणि आई बसमध्ये होते. पतीचा फोन म्हणून रिता हिने फोन रिसीव्ह केला. तेव्हा तिच्या कावावर असं काही आली, ज्यामुळे ती ढसाढसा रडू लागली…
पुढे आईने लेकीला विचारलं काय झालं. तेव्हा रिता रडत म्हणाली, एका महिलेचा फोन होता, म्हणाली, ‘तुझी सवत बोलतेय… आता सासरी कधीच येऊ नकोस…’ हे सांगताना रिता हिला एक उचकी आली आणि तिचं निधन झालं… आता रिता हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. महिलेच्या मृत्यूनंतर आईवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.