ही वस्तू वर्षातून फक्त एकदाच जाळा; साप आयुष्यात पुन्हा कधीच घरात येणार नाही, परिसरातूनही होईल गायब
प्रत्येकजण सापांना घाबरतो, साप कधीही आपल्याजवळ येऊ नये, घरात घुसू नये असं वाटतं, कारण त्यामुळे सर्पदंशाचा धोका निर्माण होऊ शकतो. निसर्गात अशा काही गोष्टी, वनस्पती आहेत, ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या घरापासून आणि परिसरापासून सापांना दूर ठेवू शकतात.

भारतामध्ये प्रचंड प्रमाणात जैवविविधता आढळून येते, प्राण्याच्या हजारो प्रजाती भारतामध्ये आहेत. अशा देखील काही प्रजाती आहेत, ज्या तुम्ही अजून पाहिल्या देखील नसतील. साप हा या जैवविविधतेच्या साखळीमधील एक प्रमुख घटक आहे. सापाला शेतकऱ्यांचा मित्र देखील म्हटलं जातं. ज्या भागांमध्ये सापांची संख्या कमी असते, त्या भागात आपोआपच उंदरांची संख्या वाढते, उंदिर मोठ्या प्रमाणात पिकांची नासाडी करतात, यावरून आपल्याला सापांचं महत्त्व लक्षात येतं. परंतु अलिकडच्या काळात काही विशिष्ट सापांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे, यामध्ये घोणस सापांचं उदाहरण देता येईल, घोणस हा साप एकाचवेळी अनेक पिल्लांना जन्म देतो, तसेच या सापाचा वावर नेहमी मानवी वस्तीच्या आसपास असल्यामुळे या सापापासून मोठा धोका असतो.
भारतामध्ये प्रामुख्याने चारच सापांच्या विषारी प्रजाती आढळून येतात, ज्यामध्ये फुरसे, मण्यार, नाग आणि घोणस या प्रजातीच्या सापांचा समावेश आहे. अनेकदा घोणस साप हे मानवी वस्तीजवळ आढळून येत असल्यामुळे या सापाचा जास्त धोका असतो. पावसाळ्यात तर हे साप थेट तुमच्या घरात देखील शिरू शकतात, जिथे जास्त आद्रता असेल आणि त्यांना लपण्यासाठी सुरक्षित जागा मिळेल तिथे हे साप आसारा घेतात.
दरम्यान सापांना घरापासून दूर ठेवण्यासाठी विविध उपाय केले जातात, जे लोक जंगालाजवळ राहतात किंवा ग्रामीण भागांमध्ये राहतात ते आपल्या घरात साप शिरू नये, यासाठी विशिष्ट वनस्पतींची देखील लागवड करतात. त्यातीलच एक उपाय म्हणजे ग्रामीण भागांमध्ये तसेच आदिवासी पाड्यांमध्ये आजही घरात साप घुसू नये, त्याच्यापासून आपलं संरक्षण व्हाव यासाठी बैलाचं शिंग जाळलं जातं. त्यासाठी हे लोक एखाद्या बैलाचा मृत्यू झाल्यास त्याचं शिंग जपून ठेवतात. जर घरात साप घुसला आहे, असा संशय असेल आणि तो जर दिसत नसेल तर अशावेळी त्या घरात बैलाचं हे शिंग जाळलं जातं, त्याला तीव्र असा वास असतो, या वासामुळे जर घरात कुठेही साप लपून बसला असेल तर तो घरातून बाहेर पडतो आणि दूर निघून जातो.
