AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kolhapur : जेवताना झालेल्या भांडणात औरवाडच्या दोघांवर कटरने हल्ला, कवठेगुलंद येथील घटना

औरवाड येथे वजीरबाबा उरूस सुरू असून गावातील दोन मुलांच्यावर हल्ला झाल्याने गावात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Kolhapur : जेवताना झालेल्या भांडणात औरवाडच्या दोघांवर कटरने हल्ला, कवठेगुलंद येथील घटना
कुरंदवाड समाधान हॉटेल हाणामारीImage Credit source: tv9
| Updated on: May 18, 2022 | 5:07 PM
Share

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) म्हटले की रांगडा बाणा. जेवढं प्रेमं तेवढीच खुन्नस ही. त्यामुळेच तेथे बऱ्याचदा छोट्या छोट्या कारणातून वाद होतात आणि त्यानंतर भांडण, हाणामारी (Violence) ही, त्यातूनच खूनही. काही अशीच काहीशी घटना येथील कुरंदवाड नजीक असणाऱ्या कवठेगुलंद येथे घडली. फक्त जेवताना झालेल्या भांडणातून दोघांवर कटरने हल्ला झाल्याची घटना घडली आहे. ही घटना येथील समाधान हॉटेलमध्ये घडली असून सांगली, मिरज शासकीय रुग्णालयात (Sangli, Miraj Government Hospital) जखमींवर उपचार सुरू आहेत. तर अमीनमहम्मद रफिक पटेल (वय 21), ओंकार माने असे जखमींची नावे असून कुरुंदवाड पोलीसात तिघा विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तर औरवाड येथे कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

धक्का लागून रस्सा सांडल्याने भांडण

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, येथील समाधान हॉटेलमध्ये मंगळवारी रात्री औरवाड इथले अमीनमहंमद रफिक पटेल, ओंकार माने तसेच संशयित आरोपी कुरुंदवाड इथले ओंकार शिकलगार, प्रकाश शिकलगार तर शेडशाळ येथील कुलदीप संतपाल हे जेवायला बसले होते. यावेळी ओंकार शिकलगार याच्या ताटाला ओंकार माने कडून धक्का लागून रस्सा सांडला. त्यावेळी माने याला ओंकार शिकलगार याने धक्का का मारलास असे विचारले. त्यावेळी पटेल, माने आणि ओंकार शिकलगार यांच्यात वाद सुरू झाला. यादरम्यान शिकलगार याने खिशातील कटर काढत दोघांना दोघांना जिवंत सोडणार नाही असे म्हणत कटर अमीनंमहंमद पटेल, ओंकार माने यांच्या पोटावर वार करून जखमी केले. तसेच आरोपी प्रकाश शिकलगार याने पाण्याच्या स्टीलच्या जगणं मारहाण केली. तसेच वाईट शिवीगाळ देखील केली. तर संशयित आरोपी कुलदीप संतपाल याने शिवीगाळ करत लाथबुक्याने मारहाण केली. यामुळे दोघेही गंभीर जखमी झाले. याबाबत स्वतः जखमी अमीनमहंमद पटेल यांनी मिरज दवाखान्यात वर्दी जबाब दिल्यावरून कुरुंदवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सदर घटना रात्री 12 वाजता घडल्याने औरवाड येथील तरुणवर्ग मोठ्या संख्येने हॉटेल समोर गर्दी करून होता.

पोलीस बंदोबस्त वाढवला

तर या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्राणात आणली. तसेच तणाव आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान जखमी सांगली तसेच मिरज येथे उपचार घेत आहेत. सध्या जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे समजते या हल्याने हॉटेल व्यावसायिक सह परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान औरवड येथे पोलीस बंदोबस्त वाढवला असून अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, इचलकरंजी पोलीस उपअधीक्षक बी बी महामुनी यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. औरवाड येथे वजीरबाबा उरूस सुरू असून गावातील दोन मुलांच्यावर हल्ला झाल्याने गावात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Follow Us
उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचा शेवटचा दिवस, एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा
उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचा शेवटचा दिवस, एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा.
भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती....
भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती.....
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी.
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती.
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती.
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या.
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष.
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार.
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले....
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले.....
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत.