AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INSTAने वाचवले तरूणीचे प्राण, अवघ्या 18 मिनिटांत… तिथे नेमकं काय घडलं ?

सध्या सोशल मीडियाचा वावर प्रचंड वाढला आहे. त्याच्या गैरवापराचे अनेक किस्से आपण ऐकत असतो, पण या सोशल मीडियामुळे कोणाचे प्राण वाचले तर ? असाच एक प्रकार गाजीपूरच्या सादात भागात घडलाय.

INSTAने वाचवले तरूणीचे प्राण, अवघ्या 18 मिनिटांत... तिथे नेमकं काय घडलं ?
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Aug 12, 2025 | 9:51 AM
Share

आजकाल सोशल मीडियाचा वावर प्रचंड वाढला आहे. त्याच्या गैरवापराचे अनेक किस्से आपण ऐकत असतो, पण या सोशल मीडियामुळे कोणाचे प्राण वाचले तर ? असाच एक प्रकार गाजीपूरच्या सादात भागात घडल्याचे समोर आले असून तेथे इन्स्टाग्राममुळे एक तरूणीचे प्राण वाचले. सोशल मीडियावर मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी 18 मिनिटांत 12 किलोमीटरचे अंतर कापले आणि मोठ्या प्रमाणात झोपेच्या गोळ्या खाल्लेल्या मुलीला आरोग्य केंद्रात नेऊन तिचे प्राण वाचवले.

खरंतर, त्या मुलीने तिचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र याची माहिती लखनौमधील डिजी कार्यालयात पोहोचली आणि त्यानंतर तेथून सादत पोलिसांना याची माहिती देण्यात आली. जराही वेळ न घालवता, सादत पोलिसांनी 18 मिनिटांत मुलीचं घर गाठलं आणि तिला त्वरित उपचार दिले, ज्यामुळे तिचा जीव वाचला.

नेमकं काय झालं ?

उत्तर प्रदेशातील गाजीपूरमधील सादत पोलीस स्टेशन परिसरातील एका गावात ही घटना घडली. प्रेमप्रकरणातील वादामुळे एका मुलीने मंगळवारी दुपारी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यासाठी तिने मोठ्या प्रमाणात औषध घेतले आणि औषध सेवन करतानाचा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्रामवर अपलोड केला. हा व्हिडिओ अपलोड करणे यूपी पोलिसांसाठी आणि त्या मुलीसाठी वरदान ठरले.

आत्महत्येच्या या प्रयत्नाचा हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड होताच त्याची सूचना लखनऊ येथील यूपी डीजीपी कार्यालयात पोहोचली. याची माहिती मिळताच, यूपी पोलिस तात्काळ सक्रिय झाले आणि प्रकरणाची माहिती सादात पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर सादात पोलिस जराही विलंब न करता त्या सांगितलेल्या ठिकाणी, मुलीच्या घरी पोहोचले.

18 मिनिटांत कापलं 12 किमी अंतर

मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या मुलीचे घर सादात पोलिस ठाण्यापासून 12 किलोमीटर अंतरावर होते. पोलिसांनी तातडीने कारवाई केली आणि ते अवघ्या 18 मिनिटांत तिच्या गावी पोहोचले. तिथे तिच्या कुटुंबातील सदस्यांनाही तिच्या आत्महत्येची माहिती नव्हती आणि ती तिच्या खोलीत बेशुद्ध पडली होती. आपल्या मुलीने मोठ्या प्रमाणात औषध सेवन करून आत्महत्या केल्याचे जेव्हा तिच्या कुटुंबियांना कळलं तेव्हा प्रचंड खळबळ उडाली.

मात्र कोणताही विलंब न करता, पोलिसांनी एका महिला कॉन्स्टेबलच्या मदतीने त्या तरूणीला जवळच्या आरोग्य केंद्रात नेले जिथे डॉक्टरांनी तिच्यावर ताबडतोब उपचार सुरू केले. यानंतर, मुलगी शुद्धीवर आली. शुद्धीवर आल्यानंतर, सादात पोलिसांसोबत आलेल्या महिला कॉन्स्टेबलने मुलीला तिच्या आत्महत्येचे कारण विचारले. त्यानंतर तिने सांगितले की प्रियकराच्या बोलण्याने तिला राग आला होता म्हणून तिने हे आत्मघातकी पाऊल उचललं.तिला तिचं जीवन बेकार वाटू लागलं होतं, म्हणून तिने आयुष्य संपवण्यासाठी ते औषध प्राशन केलं होतं.

कुटुंबियांनी मानले पोलिसांचे आभार

पोलिसांनी ज्या पद्धतीने अल्पावधीत मुलीला आरोग्य केंद्रात आणले आणि तिच्यावर उपचार केले त्यामुळे मुलीचा जीव वाचला असं डॉक्टरांनी सांगितलं. मुलीचा जीव वाचल्यानंतर, तिच्या कुटुंबियांनी यूपी पोलिस आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानले. त्यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले. जर आज यूपी पोलिस नसते तर कदाचित त्यांची मुलगी या जगात नसती असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा पोलिसांना धन्यवाद दिले.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.