AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : प्रत्येक गोष्टीत अपयश येतंय? चाणक्यांच्या या गोष्टी लक्षात ठेवा यश नक्की मिळणार

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. अनेकदा असं होतं की एखाद्या व्यक्तीला त्याच्या प्रत्येक कामात अपयश येतं. अशावेळी नक्की काय करावं? याबद्दल चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

Chanakya Niti : प्रत्येक गोष्टीत अपयश येतंय? चाणक्यांच्या या गोष्टी लक्षात ठेवा यश नक्की मिळणार
chankya Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 16, 2026 | 10:02 PM
Share

चाणक्य हे त्या काळातील एक महान विचारवंत होते. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक चांगले, वाईट अनुभव घेतले. त्यांना देखील अनेकदा आपल्या आयुष्यात पराभवाचा सामना करावा लागला, आणि त्यानंतर त्यांचा विजय देखील झाला. चाणक्य यांना जे काही अनुभव आले, त्या अनुभवाचं सार त्यांनी चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये मांडलं आहे. हा ग्रंथ आज 21 व्या शतकात देखील अनेकांना मार्गदर्शक ठरतो. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात की माणसाच्या आयुष्यात अनेकदा असे कठीण प्रसंग येतात की, त्यावेळी नेमकं काय करावं हे त्याला कळत नाही, तो निराश होतो. हा व्यक्तीच्या आयुष्यातील असा काळ असतो, ज्या काळात प्रत्येक ठिकाणी त्याचा पराभव होतं असतो. मात्र अशा कठीण काळावर देखील तुम्ही मात करू शकता. मात्र त्यासाठी तुमच्याकडे काही गुण असणं गरजेचं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

संयम –चाणक्य म्हणतात ज्या व्यक्तीकडे संयम असतो, तो व्यक्ती संपूर्ण जग जिंकण्याची ताकद ठेवतो. जेव्हा तुम्हाला एखाद्या कामात वारंवार अपयश येत आहे, तर अशावेळी खचून जाऊ नका, आणि ते कामही अर्धवट सोडू नका. फक्त एकच गोष्ट करा संयम ठेवा आणि योग्य वेळेची वाट पहा. योग्य वेळ येताच पुन्हा नव्या जोमाने ते काम करा तुम्हाला यश नक्की मिळणार. मात्र त्यासाठी तुमच्याकडे संयम नावाची गोष्ट असणं गरजेच आहे, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

सावध रहा – चाणक्य म्हणतात माणसाने नेहमी सावध असलं पाहिजे, तुमच्या आयुष्यात भविष्यात कधी कोणता प्रसंग येईल? हे तुम्ही सांगू शकत नाहीत. त्यामुळे जर समजा एखादा वाईट प्रसंग आलाच तर त्यासाठी तुम्ही नेहमी तयार राहिला पाहिजे. तसेच असे प्रसंग आयुष्यात येऊच नये यासाठी सतर्क असणं देखील तेवढंच गरजेच आहे, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या..
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच शिंदेंचं ओमराजेंबाबत मोठं विधान
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर पोहोचण्याआधीच...
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपट
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपटाचा First Look समोर
6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी
मोठी घडामोड! 6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी!
पक्ष प्रवेशापूर्वीच शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत...
Omraje Nimbalkar | पक्ष प्रवेशापूर्वीच मोठं घडलं; शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत...
शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला; राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut | शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला, नंदनवनात पाळणा...शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या
उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ऑपरेशन टायगर 2 पण होणार, शिंदेंच्या बड्या नेत्याने दिले मोठे संकेत
मोठी बातमी! 6 खासदारांनंतर आणखी मोठा धक्का; ऑपरेशन टायगर 2 पण होणार, शिंदेंच्या शिवसेनेच्या बड्या नेत्याने दिले मोठे संकेत
उद्धव ठाकरेंची 20 आमदारांसोबत बैठक, बैठकीला कोण हजर अन् कोण गैरहजर?
Thackeray MLA Meeting | उद्धव ठाकरेंची 20 आमदारांसोबत बैठक, बैठकीला कोण हजर अन् कोण गैरहजर?
कोणाला माहितीच नाही! ओमराजेंना अचानक रात्री 2 वाजता... शिंदे गटातील
कोणाला माहितीच नाही! ओमराजेंना अचानक रात्री 2 वाजता... शिंदे गटातील बड्या नेत्याने सांगितलं त्या भेटीगाठीचं गुपित