AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : प्रत्येक गोष्टीत अपयश येतंय? चाणक्यांच्या या गोष्टी लक्षात ठेवा यश नक्की मिळणार

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. अनेकदा असं होतं की एखाद्या व्यक्तीला त्याच्या प्रत्येक कामात अपयश येतं. अशावेळी नक्की काय करावं? याबद्दल चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

Chanakya Niti : प्रत्येक गोष्टीत अपयश येतंय? चाणक्यांच्या या गोष्टी लक्षात ठेवा यश नक्की मिळणार
chankya Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 16, 2026 | 10:02 PM
Share

चाणक्य हे त्या काळातील एक महान विचारवंत होते. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक चांगले, वाईट अनुभव घेतले. त्यांना देखील अनेकदा आपल्या आयुष्यात पराभवाचा सामना करावा लागला, आणि त्यानंतर त्यांचा विजय देखील झाला. चाणक्य यांना जे काही अनुभव आले, त्या अनुभवाचं सार त्यांनी चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये मांडलं आहे. हा ग्रंथ आज 21 व्या शतकात देखील अनेकांना मार्गदर्शक ठरतो. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात की माणसाच्या आयुष्यात अनेकदा असे कठीण प्रसंग येतात की, त्यावेळी नेमकं काय करावं हे त्याला कळत नाही, तो निराश होतो. हा व्यक्तीच्या आयुष्यातील असा काळ असतो, ज्या काळात प्रत्येक ठिकाणी त्याचा पराभव होतं असतो. मात्र अशा कठीण काळावर देखील तुम्ही मात करू शकता. मात्र त्यासाठी तुमच्याकडे काही गुण असणं गरजेचं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

संयम –चाणक्य म्हणतात ज्या व्यक्तीकडे संयम असतो, तो व्यक्ती संपूर्ण जग जिंकण्याची ताकद ठेवतो. जेव्हा तुम्हाला एखाद्या कामात वारंवार अपयश येत आहे, तर अशावेळी खचून जाऊ नका, आणि ते कामही अर्धवट सोडू नका. फक्त एकच गोष्ट करा संयम ठेवा आणि योग्य वेळेची वाट पहा. योग्य वेळ येताच पुन्हा नव्या जोमाने ते काम करा तुम्हाला यश नक्की मिळणार. मात्र त्यासाठी तुमच्याकडे संयम नावाची गोष्ट असणं गरजेच आहे, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

सावध रहा – चाणक्य म्हणतात माणसाने नेहमी सावध असलं पाहिजे, तुमच्या आयुष्यात भविष्यात कधी कोणता प्रसंग येईल? हे तुम्ही सांगू शकत नाहीत. त्यामुळे जर समजा एखादा वाईट प्रसंग आलाच तर त्यासाठी तुम्ही नेहमी तयार राहिला पाहिजे. तसेच असे प्रसंग आयुष्यात येऊच नये यासाठी सतर्क असणं देखील तेवढंच गरजेच आहे, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मोठी अपडेट! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळला, भाजपच्या विजयी रॅलीत...
मोठी अपडेट! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळला, भाजपच्या विजयी रॅलीत....
पंढरपूरात राधा पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा; बाचाबाचीचे रूपांतर...
पंढरपूरात राधा पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा; बाचाबाचीचे रूपांतर....
सरापूर प्रकरणातील आरोपीचा माथं टणकावणारा जबाब, म्हणाला, मी नशेत...
सरापूर प्रकरणातील आरोपीचा माथं टणकावणारा जबाब, म्हणाला, मी नशेत....
हुंड्याच्या छळाला कंटाळून विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल, थेट विहिरीतच..
हुंड्याच्या छळाला कंटाळून विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल, थेट विहिरीतच...
नसरापूर प्रकरणातील आरोपीसह पोलिसांची मध्यरात्री घटनास्थळाची पाहणी...
नसरापूर प्रकरणातील आरोपीसह पोलिसांची मध्यरात्री घटनास्थळाची पाहणी....
राऊतांचा सरकारवर हल्लाबोल; लाडकी बहिण योजनेवरून वाद पेटला, 65 लाख.....
राऊतांचा सरकारवर हल्लाबोल; लाडकी बहिण योजनेवरून वाद पेटला, 65 लाख......
9 वर्षांच्या चिमुरडीवर सख्या आजोबाचीच वाईट नजर, 50 वर्षीय नराधमाच्या..
9 वर्षांच्या चिमुरडीवर सख्या आजोबाचीच वाईट नजर, 50 वर्षीय नराधमाच्या...
सत्तांतर होताच बंगालमध्ये बुलडोझर, भाजपने तृणमूलचं कार्यालय पाडलं?
सत्तांतर होताच बंगालमध्ये बुलडोझर, भाजपने तृणमूलचं कार्यालय पाडलं?.
तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग, TVK ने सर्व 108 आमदार
तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग, TVK ने सर्व 108 आमदार.
पायधुनीमधील चौघांच्या मृत्यूचा ससपेन्स कायम, कलिंगड की गोल्डन अवर....
पायधुनीमधील चौघांच्या मृत्यूचा ससपेन्स कायम, कलिंगड की गोल्डन अवर.....