आधी विहिरीत पत्नी आणि दोन चिमुकल्याचे मृतदेह सापडले, नंतर पतीचा मृतदेह…

मालेगाव तालुक्यातील तिवळी येथे एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील चार जणांचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने खळबळ उडाली आहे.

आधी विहिरीत पत्नी आणि दोन चिमुकल्याचे मृतदेह सापडले, नंतर पतीचा मृतदेह...
| Updated on: Jun 13, 2026 | 9:19 PM

वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी अंत झाला आहे. एका इसमाने विहिरीत आपल्या पत्नी आणि दोन मुलांना टाकून स्वत: महावितरणच्या पॉवर ग्रीड टॉवरला गळफास घेऊन जीव दिल्याची घटना घडली आहे. या धक्कादायक प्रकारानंतर तिवळी गावासह संपूर्ण मालेगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

संतोष तुकाराम बकाल (वय ३५) यांनी महावितरणच्या पॉवर ग्रीड टॉवरला गळफास घेऊन जीवन संपवल्याचे उघडकीस आले आहे. त्यानंतर एका विहिरीतून त्याची पत्नी वर्षा बकाल (वय २८), मुलगी जान्हवी बकाल (वय ७) आणि मुलगा सोहम बकाल (वय ५) यांचे मृतदेह सापडले.या दोन्ही चिमुकल्या मुलांचे हात बांधलेल्या अवस्थेत आढळल्याची प्राथमिक माहिती आहे. कुटुंबातील वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे. मात्र, याला अधिकृत दुजारो मिळालेला नाही. या एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने तिवळी गावासह संपूर्ण मालेगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे.

या घटनेनंतर या मालेगाव तालुक्यातील तिवळी येथे खळबळ उडाली आहे. या लहान मुलांचे हात पाठी मागे बांधून ठेवल्याचे आढळल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमागे कौटुंबिक वाद आणि आत्महत्या आहे की या मागे काही घातपात आहे याचा तपास केला जात आहे.

 

 

Follow Us