AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ZIM: टीम इंडियाचे धन्यवाद…भारताने पराभवाची धुळ चारुनही झिम्बाब्वे कर्णधार सिकंदर रझा असं का म्हणाला?

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी-20 सामन्यांची मालिका रंगली. जी भारतीय संघाने एकतर्फी जिंकली. आता यानंतर झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने एक विधान केले ज्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

IND vs ZIM: टीम इंडियाचे धन्यवाद...भारताने पराभवाची धुळ चारुनही झिम्बाब्वे कर्णधार सिकंदर रझा असं का म्हणाला?
| Updated on: Jul 27, 2026 | 8:30 AM
Share

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेला फारशी कामगिरी करता आली नाही. भारतीय संघाने ही मालिका 3-0 ने जिंकली. अखेर कर्णधार श्रेयस अय्यरला त्याच्या नेतृत्त्वात पहिली मालिका जिंकता आली. या मालिकेपूर्वी भारतीय संघावर अनेक टीका होत होत्या. संघाची कामगिरी खूपच ढासळली होती. पण अखेर संघाने जोरदार कमबॅक केला आहे. आता तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाकडून पराभव झाल्याने झिम्बाब्वेने मालिका गमावली. यानंतर कर्णधार सिकंदर रझाने एक महत्त्वपूर्ण विधान केले.

झिम्बाब्वे दौऱ्यादरम्यान, भारतीय संघाच्या वैभव सूर्यवंशीने फलंदाजीत मोठी धावसंख्या उभारली, तर मयंक यादवनेही गोलंदाजीत चांगली कामगिरी केली. तिसऱ्या सामन्यात वैभवने 81 धावा केल्या, तर मयंकने तीन बळी घेतले. परिणामी, भारतीय संघाने तिसरा सामना 35 धावांनी जिंकून झिम्बाब्वेला तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत क्लीन स्वीप दिला. मालिकेतील तिन्ही सामने गमावल्यानंतर सिकंदर रझा म्हणाला, “भारतीय खेळाडू खेळायला आले, यासाठी आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत. मोठ्या संघांविरुद्ध खेळल्याने आमच्या खेळाची सध्याची पातळी दिसून येते. यामुळे आत्मविश्वास लक्षणीयरीत्या वाढतो.”

तीन सामन्यांच्या मालिकेवर नजर टाकल्यास, कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी केली. आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यांमध्ये पराभव पत्करल्यानंतर, भारतीय संघाने अखेर झिम्बाब्वेविरुद्ध विजयाचा मार्ग शोधला. भारतीय संघासाठी तिन्ही सामन्यांमध्ये वैभव सूर्यवंशीच्या बॅटने 151 धावा करून धुमाकूळ घातला. यामुळे त्याला अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार मिळाला आणि तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला मालिकावीर म्हणूनही गौरविण्यात आले. झिम्बाब्वेचा दौरा वैभवसाठी अविस्मरणीय ठरला आणि तो आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच मालिकावीर म्हणून मायदेशी परतणार आहे. भारतीय संघ आता सप्टेंबरमध्ये जपानमध्ये 2026 च्या आशियाई खेळांसाठी टी-20 क्रिकेट खेळेल, तर भारतीय कसोटी संघ ऑगस्टमध्ये श्रीलंकेचा दौरा करेल.

श्रीलंकेविरुद्ध कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ लवकरच जाहीर होणार आहे. 15 ऑगस्टपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. दोन सामन्यांची ही मालिका असणार आहे.

Follow Us
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...