AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ZIM: टीम इंडियाचे धन्यवाद…भारताने पराभवाची धुळ चारुनही झिम्बाब्वे कर्णधार सिकंदर रझा असं का म्हणाला?

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी-20 सामन्यांची मालिका रंगली. जी भारतीय संघाने एकतर्फी जिंकली. आता यानंतर झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने एक विधान केले ज्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

IND vs ZIM: टीम इंडियाचे धन्यवाद...भारताने पराभवाची धुळ चारुनही झिम्बाब्वे कर्णधार सिकंदर रझा असं का म्हणाला?
| Updated on: Jul 27, 2026 | 8:30 AM
Share

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेला फारशी कामगिरी करता आली नाही. भारतीय संघाने ही मालिका 3-0 ने जिंकली. अखेर कर्णधार श्रेयस अय्यरला त्याच्या नेतृत्त्वात पहिली मालिका जिंकता आली. या मालिकेपूर्वी भारतीय संघावर अनेक टीका होत होत्या. संघाची कामगिरी खूपच ढासळली होती. पण अखेर संघाने जोरदार कमबॅक केला आहे. आता तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाकडून पराभव झाल्याने झिम्बाब्वेने मालिका गमावली. यानंतर कर्णधार सिकंदर रझाने एक महत्त्वपूर्ण विधान केले.

झिम्बाब्वे दौऱ्यादरम्यान, भारतीय संघाच्या वैभव सूर्यवंशीने फलंदाजीत मोठी धावसंख्या उभारली, तर मयंक यादवनेही गोलंदाजीत चांगली कामगिरी केली. तिसऱ्या सामन्यात वैभवने 81 धावा केल्या, तर मयंकने तीन बळी घेतले. परिणामी, भारतीय संघाने तिसरा सामना 35 धावांनी जिंकून झिम्बाब्वेला तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत क्लीन स्वीप दिला. मालिकेतील तिन्ही सामने गमावल्यानंतर सिकंदर रझा म्हणाला, “भारतीय खेळाडू खेळायला आले, यासाठी आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत. मोठ्या संघांविरुद्ध खेळल्याने आमच्या खेळाची सध्याची पातळी दिसून येते. यामुळे आत्मविश्वास लक्षणीयरीत्या वाढतो.”

तीन सामन्यांच्या मालिकेवर नजर टाकल्यास, कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी केली. आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यांमध्ये पराभव पत्करल्यानंतर, भारतीय संघाने अखेर झिम्बाब्वेविरुद्ध विजयाचा मार्ग शोधला. भारतीय संघासाठी तिन्ही सामन्यांमध्ये वैभव सूर्यवंशीच्या बॅटने 151 धावा करून धुमाकूळ घातला. यामुळे त्याला अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार मिळाला आणि तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला मालिकावीर म्हणूनही गौरविण्यात आले. झिम्बाब्वेचा दौरा वैभवसाठी अविस्मरणीय ठरला आणि तो आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच मालिकावीर म्हणून मायदेशी परतणार आहे. भारतीय संघ आता सप्टेंबरमध्ये जपानमध्ये 2026 च्या आशियाई खेळांसाठी टी-20 क्रिकेट खेळेल, तर भारतीय कसोटी संघ ऑगस्टमध्ये श्रीलंकेचा दौरा करेल.

श्रीलंकेविरुद्ध कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ लवकरच जाहीर होणार आहे. 15 ऑगस्टपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. दोन सामन्यांची ही मालिका असणार आहे.

Follow Us
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा... पुन्हा नव्या मागणी
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा...  पुन्हा नव्या मागणीने मोठी खळबळ
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल 400...
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली;
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली; लाखो महिलांन होणार फायदा!
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदें
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंचा मोठा दावा!
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी वाढवलं टेन्शन
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे काय म्हणाले?
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे असं का म्हणाले?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला,
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला, धुरंधर 3 मध्ये पंतप्रधान...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच शब्दाने उडवली खळबळ
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री फडणवसीचं स्पष्टीकरण
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसीचं स्पष्टीकरण, म्हणाले...