AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पत्नी छातीवर बसली, प्रियकराने गळा दाबला, रात्रभर पतीच्या मृतदेहासोबत झोपली, अंगावर काटा आणणारा हत्येचा घटनाक्रम

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यातील चिनोर पोलिसांना चिनोरजवळील जुन्या कालव्यात एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढला आणि पोस्टमार्टम केल्यानंतर या व्यक्तीचा मृत्यू पाण्यात बुडून नसून गळा दाबून झाल्याचे उघड झाले.

पत्नी छातीवर बसली, प्रियकराने गळा दाबला, रात्रभर पतीच्या मृतदेहासोबत झोपली, अंगावर काटा आणणारा हत्येचा घटनाक्रम
मालमत्तेच्या वादातून बंगालमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
| Edited By: Anish Bendre | Updated on: Oct 26, 2021 | 11:17 AM
Share

ग्वाल्हेर : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये करवा चौथच्या दिवशीच महिलेने पतीची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. महिलेचे सूत तिच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या तरुणासोबत जुळले, तिने प्रियकराला करवा चौथच्या दिवशी आपल्या पतीसाठी उपवास ठेवणार नसल्याचं वचन दिलं होतं. त्यानंतर तिने प्रियकरासोबत आपल्याच पतीच्या हत्येचा कट रचला आणि त्याची निर्घृण हत्या केली.

काय आहे प्रकरण?

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यातील चिनोर पोलिसांना चिनोरजवळील जुन्या कालव्यात एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढला आणि पोस्टमार्टम केल्यानंतर या व्यक्तीचा मृत्यू पाण्यात बुडून नसून गळा दाबून झाल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.

6 सप्टेंबर रोजी ही घटना घडली होती. हत्येनंतर सुमारे 20 दिवसांनंतर मृताची ओळख पटली होती. त्याचे नाव पोषण सिंह रावत असून तो देवरी कला गावात राहत असल्याची माहिती मिळाली. त्याची पत्नी बसंती देवी रावतने पती हरवल्याची तक्रार नोंदवली होती. तपासादरम्यान पोलिसांना पत्नीवरच संशय आल्याने पोलिसांनी तिची कसून चौकशी केली असता संपूर्ण प्रकरण उघड झाले.

प्रियकरासोबत पतीच्या हत्येचा कट

या प्रकरणाचा खुलासा करताना पोलिसांनी सांगितले की, पोषण सिंह रावत आणि बसंती यांचे 11 वर्षांपूर्वी लग्न झाले होते, दोघांना एक मुलगा आणि एक मुलगीही आहे. पोषण हा मजूर म्हणून काम करायचा. बसंतीने दिलेल्या जबाबानुसार, पतीला दारुचे व्यसन असल्यामुळे तो तिला रोज मारहाण करत असे. दरम्यान, बसंती स्वतःहून 11 वर्षांनी लहान असलेल्या मनीष रावतच्या प्रेमात पडली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात इतके आकंठ बुडाले होते की त्यांनी पोषण सिंहच्या हत्येचा कट रचला.

पत्नी छातीवर बसली, प्रियकराने गळा दाबला

बॉयफ्रेंड मनीष रावतने प्रेयसी बसंतीला पतीसाठी करवा चौथचा उपवास न ठेवण्यास सांगितले. यावेळी पतीसाठी उपवास ठेवण्याची आपलीही इच्छा नसल्याचं बसंतीने त्याला सांगितलं. अशा स्थितीत दोघांनी पोषणचा काटा कायमचा काढण्याचा बेत आखला. 4 सप्टेंबर रोजी प्रियकर मनीष बसंतीच्या घरी पोहोचला. बसंतीने तिच्या दोन्ही मुलांना काही कामात गुंतवले आणि दोघांनी मिळून पतीची हत्या केली. पत्नी पतीच्या छातीवर बसली आणि प्रियकराने त्याचा गळा दाबला, त्यानंतर पत्नीनेही त्याचा गळा दाबला, त्यामुळे पोषणचा जागीच मृत्यू झाला.

बसंतीने 5 सप्टेंबरचा दिवस अशा प्रकारे घालवला की सर्वांना वाटले की पोषण सिंह जिवंतच आहे आणि विश्रांती घेत आहे. 5 तारखेच्या रात्री मनिष, त्याचा मित्र रवींद्रसोबत आला आणि पोषण सिंहचा मृतदेह दुचाकीवरुन घेऊन गेला. त्यांनी पोषणला दुचाकीवर अशा प्रकारे बसवले की, तीन तरुण दुचाकीवरून जात आहेत, असे लोकांना वाटले, दोघांनी सुमारे चार किलोमीटर दूर जाऊन पोषण सिंगचा मृतदेह कालव्यात फेकून दिला.

52 दिवसांनी प्रकरण उघडकीस

विशेष बाब म्हणजे 4 सप्टेंबर रोजी पत्नी बसंती हिने करवा चौथचा उपवास न ठेवण्याची शपथ घेऊन पतीची हत्या केली हा योगायोग म्हणता येईल, पण या घटनेच्या तब्बल 52 दिवसांनी करवा चौथच्या दुसऱ्याच दिवशी ही हत्या उघडकीस आली. या घटनेनंतर पोलिसांनी बसंती, तिचा प्रियकर मनीष रावत आणि रवींद्र रावत या तिघांनाही अटक केली आहे.

संबंधित बातम्या :

निर्जन स्थळी चाकूच्या धाकाने प्रेमी युगुलांची लूट, CCTV मुळे अखेर दोन गुंड जाळ्यात

पिंपरी चिंचवडमध्ये बाल गुन्हेगारीत प्रचंड वाढ, 110 गंभीर गुन्ह्यात तब्बल 135 अल्पवयीन मुलं

Follow Us
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?.

उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा