AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साखरपुड्यानंतर मुलाने भावी पत्नीसोबत हॉटेलमध्ये रात्र घालवली, मग दुसऱ्यादिवशी असं कारण देऊन मोडलं लग्न

तानसेन हॉटेलमध्ये घेऊन गेला. तिथे त्याने आधीपासून रुम बुक करुन ठेवली होती. जेव्हा मुलीने त्याच्यासोबत संबंध ठेवायला नकार दिला, तेव्हा त्याने तिला इमोशनल केलं. बोलला की....

साखरपुड्यानंतर मुलाने भावी पत्नीसोबत हॉटेलमध्ये रात्र घालवली, मग दुसऱ्यादिवशी असं कारण देऊन मोडलं लग्न
Love Image Credit source: TV9 Hindi
| Updated on: Mar 28, 2025 | 7:18 AM
Share

मध्य प्रदेशच्या ग्वालियरमध्ये एका मुलीला तिच्या होणाऱ्या नवऱ्याने लग्नाआधी दगा दिला. साखरपुडा झाल्यानंतर मुलगा मुलीला म्हणाला की, मला तुला एकट्यामध्ये भेटायचं आहे. मुलगी सुद्धा कुटुंबियांना सांगून मुलाला भेटायला गेली. तिथे मुलाने आधीपासून हॉटेलमध्ये रुम बुक करुन ठेवली होती. मुलगा मुलीला रुममध्ये घेऊन गेला. तिथे तो मुलीवर संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करु लागला. मुलीने त्याला स्पष्ट शब्दात नकार दिला. हे सर्व लग्नानंतर असं तिने स्पष्ट शब्दात सांगितलं. पण मुलगा अडून बसला. आपलं लग्न होणार आहे, मग तुला संबंध ठेवण्यात काय अडचण आहे? असं मुलगा तिला म्हणाला. मुलाने मुलीला भावनिक बनवलं व तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले.

त्यानंतर दुसऱ्यादिवशी सकाळी मुलाने तुझ्यासोबत लग्न करायच नाही, असं सांगितलं. हे ऐकून नवरी मुलीच्या पायाखालची जमीन सरकली. मुलीने या बद्दल कुटुंबियांना सांगितलं. त्यानंतर ती पोलीस स्टेशनमध्ये गेली. पोलिसांची मदत मागितली. मुलाविरोधात फसवणुकीची तक्रार दिली.

कुटुंबियांच्या होकारानंतर मी देवांशसोबत गेली

मुलीने सांगितलं की, माझा साखरपुडा मागच्या वर्षी जुलै महिन्यात दतियाच्या इंदरगढमध्ये राहणाऱ्या देवांश साहू सोबत झाला होता. साखरपुड्यानंतर आमच्यामध्ये बोलणं सुरु झालं. आम्ही अनेक तास बोलायचो. काही दिवसांनी देवांशने मला कुठेतरी फिरायला जाऊया म्हणून विचारलं. कुटुंबियांच्या होकारानंतर मी देवांशसोबत गेली. त्यावेळी मला तो हॉटेलमध्ये घेऊन गेला. तिथे आम्ही आमचं नातं पुढच्या टप्प्यावर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला.

आता आपलं लग्न होणारच आहे, यात काय चुकीच आहे?

पीडितेने पोलिसांना सांगितलं की, देवांशने कुटुंबियांना सांगितलेलं की, तो तिला बैजाताल येथे घेऊन जात आहे. पण तो तिला सोबत तानसेन हॉटेलमध्ये घेऊन गेला. तिथे त्याने आधीपासून रुम बुक करुन ठेवली होती. जेव्हा मुलीने त्याच्यासोबत संबंध ठेवायला नकार दिला, तेव्हा त्याने तिला इमोशनल केलं. बोलला की आता आपलं लग्न होणारच आहे, यात काय चुकीच आहे? मुलगी सुद्धा त्याच्या बोलण्यामध्ये फसली आणि देवांशसोबत संबंध ठेवले.

मुलीने कुटुंबियांना सर्व प्रकार सांगितला

मुलीने सांगितलं की, हॉटेलमधून परतल्यानंतर देवांशच वर्तन बदललं. आधी तो बोलायला खूप इंटरेस्टेड होता. पण नंतर तो फोनही उचलत नव्हता. देवांशच्या वडिलांनी फोन करुन लग्न मोडल्याच सांगितलं. त्यानंतर मुलीने कुटुंबियांना सर्व प्रकार सांगितला. मुलीच म्हणण ऐकून घेतल्यानंतर कुटुंबिय तिला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली असून पुढील तपास सुरु आहे.

Follow Us
नारी शक्ती विधेयकावर लोकसभेत घमासान; अरविंद सावंतांचा सरकारला सवाल
नारी शक्ती विधेयकावर लोकसभेत घमासान; अरविंद सावंतांचा सरकारला सवाल.
महिला आरक्षणावरून कोल्हेंचा हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला
महिला आरक्षणावरून कोल्हेंचा हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला.
विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक... मोदी असं का म्हणाले?
विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक... मोदी असं का म्हणाले?.
महिलांच्या अधिकारांना विरोध करणाऱ्यांना महिलांनीच उत्तर दिलं – मोदी
महिलांच्या अधिकारांना विरोध करणाऱ्यांना महिलांनीच उत्तर दिलं – मोदी.
पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट; सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये?
पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट; सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये?.
विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान
विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान.
आयटी कंपनीतील धर्मांतराचा उद्रेक... सकल हिंदू समाजाचा महाएल्गार
आयटी कंपनीतील धर्मांतराचा उद्रेक... सकल हिंदू समाजाचा महाएल्गार.
नारी शक्ती की भाजपा शक्ती?; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
नारी शक्ती की भाजपा शक्ती?; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल.
काहीच आठवेना... माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती चिं
काहीच आठवेना... माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती चिं.
महापालिकेत आत्म्यांचा वावर?, मंत्र्यांचं धक्कादायक विधान
महापालिकेत आत्म्यांचा वावर?, मंत्र्यांचं धक्कादायक विधान.