9 जण जिवंत जळाले! चंद्रपुरात ट्रक अपघातानंतर लागलेल्या आगीतील मृतांचा आकडा वाढला

मूल-चंद्रपूर अग्निशमन पथकांनी आग विझवली. आगीमुळे मृतदेह जळल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलीस तपास सुरू आहे.

9 जण जिवंत जळाले! चंद्रपुरात ट्रक अपघातानंतर लागलेल्या आगीतील मृतांचा आकडा वाढला
दोन ट्रकच्या धडकेत आग भडकून अपघातImage Credit source: टीव्ही 9
Follow us
| Updated on: May 20, 2022 | 11:37 AM

चंद्रपूर : चंद्रपूर-मूल मार्गावर अजयपूर येथे झालेल्या अपघातातील (Chandrapur Accident) मृतांचा आकडा वाढला आहे. 9 जणांचा मृत्यू झाल्याचं निश्चित झालं आहे. अजयपूर गावाजवळ काल (गुरुवारी) रात्री पेट्रोल टँकर आणि ट्रकमध्ये भीषण अपघात (Truck Accident) झाला होता. समोरासमोर धडक होऊन अपघातानंतर भीषण आग (Fire) लागली होती. आग लागल्याने ट्रकचे टायर फुटून आग भडकली होती. मूल-चंद्रपूर अग्निशमन पथकांनी सकाळपर्यंत आग विझवली, मात्र आगीमुळे मृतदेहांची राख झाल्याची विदारक दृश्ये पाहायला मिळाली.

पेट्रोलची वाहतूक करणाऱ्या टँकरमधील चालक-वाचकांचा मृतात समावेश आहे. तर लाकूड भरलेल्या ट्रकमधील 7 जणांचा कोळसा झाला. ट्रकमधील 7 जण बल्लारपूर तालुक्यातील नवी दहेली आणि कोठारी गावचे रहिवासी असल्याची माहिती आहे. अपघात नेमका कसा झाला याबाबत तपास सुरु आहे.

हे सुद्धा वाचा

नेमकं काय घडलं?

चंद्रपूर शहरालगत मूल मार्गावरच्या अजयपूर गावाजवळ 2 ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. अपघातानंतर भीषण आग लागली होती. आग लागल्याने ट्रकचे टायर फुटून ही आग आणखी भडकली होती.

जंगलातील झाडेही आगीच्या विळख्यात

संपूर्ण रस्ताभर आग पसरल्याने वाहतूक खंडित झाली होती. आगीच्या उंच ज्वाळांनी लगतच्या जंगलातील झाडेही आगीच्या विळख्यात सापडली. मूल-चंद्रपूर येथून अग्निशमन पथके आग विझवण्यासाठी, तर मूल-रामनगर पोलिसांची पथके घटनास्थळी दाखल झाली होती. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.

महामार्गावर वाहतूक खंडित

महामार्गाच्या दोन्ही बाजूस वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होती. एका ट्रकमध्ये पेट्रोल, तर दुसऱ्यामध्ये लाकूड असल्याने आग भडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या अपघातात दोन्ही वाहनांमधील एकूण नऊ जणांना प्राण गमवावे लागले. मात्र अद्याप मृतदेहांची ओळख पटलेली नाही. या प्रकरणी अधिक पोलीस तपास सुरू आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.