AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

9 जण जिवंत जळाले! चंद्रपुरात ट्रक अपघातानंतर लागलेल्या आगीतील मृतांचा आकडा वाढला

मूल-चंद्रपूर अग्निशमन पथकांनी आग विझवली. आगीमुळे मृतदेह जळल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलीस तपास सुरू आहे.

9 जण जिवंत जळाले! चंद्रपुरात ट्रक अपघातानंतर लागलेल्या आगीतील मृतांचा आकडा वाढला
दोन ट्रकच्या धडकेत आग भडकून अपघातImage Credit source: टीव्ही 9
| Edited By: | Updated on: May 20, 2022 | 11:37 AM
Share

चंद्रपूर : चंद्रपूर-मूल मार्गावर अजयपूर येथे झालेल्या अपघातातील (Chandrapur Accident) मृतांचा आकडा वाढला आहे. 9 जणांचा मृत्यू झाल्याचं निश्चित झालं आहे. अजयपूर गावाजवळ काल (गुरुवारी) रात्री पेट्रोल टँकर आणि ट्रकमध्ये भीषण अपघात (Truck Accident) झाला होता. समोरासमोर धडक होऊन अपघातानंतर भीषण आग (Fire) लागली होती. आग लागल्याने ट्रकचे टायर फुटून आग भडकली होती. मूल-चंद्रपूर अग्निशमन पथकांनी सकाळपर्यंत आग विझवली, मात्र आगीमुळे मृतदेहांची राख झाल्याची विदारक दृश्ये पाहायला मिळाली.

पेट्रोलची वाहतूक करणाऱ्या टँकरमधील चालक-वाचकांचा मृतात समावेश आहे. तर लाकूड भरलेल्या ट्रकमधील 7 जणांचा कोळसा झाला. ट्रकमधील 7 जण बल्लारपूर तालुक्यातील नवी दहेली आणि कोठारी गावचे रहिवासी असल्याची माहिती आहे. अपघात नेमका कसा झाला याबाबत तपास सुरु आहे.

नेमकं काय घडलं?

चंद्रपूर शहरालगत मूल मार्गावरच्या अजयपूर गावाजवळ 2 ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. अपघातानंतर भीषण आग लागली होती. आग लागल्याने ट्रकचे टायर फुटून ही आग आणखी भडकली होती.

जंगलातील झाडेही आगीच्या विळख्यात

संपूर्ण रस्ताभर आग पसरल्याने वाहतूक खंडित झाली होती. आगीच्या उंच ज्वाळांनी लगतच्या जंगलातील झाडेही आगीच्या विळख्यात सापडली. मूल-चंद्रपूर येथून अग्निशमन पथके आग विझवण्यासाठी, तर मूल-रामनगर पोलिसांची पथके घटनास्थळी दाखल झाली होती. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.

महामार्गावर वाहतूक खंडित

महामार्गाच्या दोन्ही बाजूस वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होती. एका ट्रकमध्ये पेट्रोल, तर दुसऱ्यामध्ये लाकूड असल्याने आग भडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या अपघातात दोन्ही वाहनांमधील एकूण नऊ जणांना प्राण गमवावे लागले. मात्र अद्याप मृतदेहांची ओळख पटलेली नाही. या प्रकरणी अधिक पोलीस तपास सुरू आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.