जा शोनू जा… आता परत कधीच नाही येणार, नेहमी आनंदी राहा; भिंतीवर मजकूर लिहून त्याने जग सोडलं
पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा भिंतीवर लिहिलेली नोट पाहून त्यांना धक्काच बसला. भिंतीवर 'जा माझ्या प्रिये, मी आता कधीच परत येणार नाही, फक्त आनंदी राहा' असे लिहिलेले आढळले.
रायपूर : छत्तीसगडमधील अंबिकापूर (Chattishgadh) येथील सुभाषनगर भागात तरुणाच्या आत्महत्येची (man killed himself) धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे 3 मे रोजी सायंकाळी एका तरुणाने भाड्याच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा भिंतीवर लिहिलेली सुसाईड नोट पाहून त्यांना धक्काच बसला. भिंतीवर ‘जा माझ्या प्रिये, मी आता कधीच परत येणार नाही, फक्त आनंदी राहा’ असे लिहिलेले आढळले. ही घटना प्रेमप्रकरणातून असल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत.
जीतन असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून त्याचे वय 32 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. अंबिकापूर येथील गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुभाषनगर येथील येथे भाड्याच्या घरात हा युवक दीड वर्षांपासून राहत होता. या घरात मामा आणि भाचा असे दोघेही राहतात, असे त्याच्या मामाने पोलिसांना सांगितले. मृत तरूणाचे मामा हे 1 मे रोजी लग्नात सहभागी होण्यासाठी गावी गेले होते. 3 मे रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ते पत्नीसह सुभाष नगर येथील भाड्याच्या घरात परतले असता दरवाजा आतून बंद होता.
आवाज देऊनही आणि मोबाईलवर कॉल करूनही दार उघडले नाही, म्हणून त्याने घरमालकाला माहिती दिली. दरवाजा तोडला असता त्याचा मृतदेह साडीला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
आपल्या भाच्याला लटकलेले पाहून मामाने गांधीनगर पोलीस ठाणे गाठून या प्रकरणाची माहिती दिली. पोलिस भाड्याच्या घरात पोहोचले तेव्हा त्यांना भिंतीवर ‘जा माझ्या प्रिये, आता मी कधीच परत येणार नाही, फक्त आनंदी राहा’ असे लिहिलेले दिसले. पोलिसांनी मृतदेह पोस्ट मार्टमसाठी पाठवला. त्यानंतर 4 मे रोजी पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत