AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalyan : 60 वर्षीय वृद्धाने 32 वर्षांच्या तरुणावर का केले चाकूने सपासप वार? कल्याणमध्ये खळबळ

धारदार शस्त्राने करण्यात आलेल्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी! नेमका का करण्यात आला हल्ला? कारणंही समोर

Kalyan : 60 वर्षीय वृद्धाने 32 वर्षांच्या तरुणावर का केले चाकूने सपासप वार? कल्याणमध्ये खळबळ
धक्कादायक घटनाImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Nov 22, 2022 | 11:21 AM
Share

कल्याण : कचऱ्यावरुन जाब विचारला म्हणून एकाने तरुणाला भोसकलंय. ही धक्कादायक घटना कल्याण पूर्व (Kalyan East) इथं घडली. या घटनेत 60 वर्षांच्या वृद्ध इसमाने 32 वर्षांच्या तरुणावर चाकूने सपासप वार केलेत. या जीवघेण्या हल्ल्यात तरुण गंभीररीत्या जखमी (Kalyan Crime News) झाला. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पोलिसांनी (Kalyan Police) गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहेत. अब्दुल अली पलासोपकर असं हल्ला करण्याऱ्या वृद्ध आरोपी इसमाचं नाव आहे. तर जखमी तरुणाचं नाव सुदर्शन माथने असं आहे.

कल्याण पूर्वेतील आडीवली ढोकळी परिसरात राहणारा सुदर्शन हा शनिवारी रात्री 50-50 हॉटेलच्या पाठीमागील रस्त्यावरुन बाईकने जात होता. यावेळी या रस्त्यावरील अब्दुल यांच्या दुकानासमोरील कचऱ्याला आग लागली असल्याचे त्याला दिसले.

दिवाळी देखील येथील कचऱ्याला आग लागलेली असल्याने अब्दुल याच्याशी सुदर्शन याचा वाद झाला होता. वारंवार आग लावत असल्याने सुदर्शनने अब्दुलला कचऱ्याला आग का लावली? असा जाब विचारला.

पोलीस निरीक्षक सुरेश मदने यांनी दिलेल्या माहितीनुसार, कचऱ्याला लागलेल्या आगीवरुन जाब विचारल्याचा राग आल्याने अब्दुल, त्याची पत्नी मैरुनिसा, मुलगी यास्मीन आणि 1 अनोळखी महिला यांच्यात बाचाबाची झाली. रागामध्ये मैरुनिसा यांनी पतीला चाकू आणून दिला. याच चाकून अब्दुलने सुदर्शन याच्या छातीवर व पोटावर सपासप वार केले. यामुळे एकच खळबळ उडाली.

गंभीर जखमी सुदर्शनवर मुंबईतील रुग्णालयात आता उपचार सुरु आहेत. याप्रकरणी सुदर्शन याचा भाऊ शिवसागर याने पोलीस ठाण्यात चौघांविरोधात तक्रार दिलीय. सध्या पोलिसांनी अब्दुल व त्याची पत्नी मैरुनिसा या दोघांना अटक केली असून इतर आरोपीचा शोध सुरू आहे.

Follow Us
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.
'कर्माचे फळ...,' चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रीया
'कर्माचे फळ...,' चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रीया.
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा.
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान.
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना....
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प.
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?.