AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Murder : धक्कादायक ! एकतर्फी प्रेमातून मामाने केली भाचीच्या प्रियकराची हत्या, वाचा नेमकं काय घडलं ?

दीपकला त्याच्या प्रेमाच्या मार्गातून दूर करण्यासाठी आरोपीने आधी त्याला पार्टी देण्याच्या बहाण्याने भाईंदरला नेले. त्यानंतर त्याला भाईंदर खाडीजवळ नेले आणि त्याला भरपूर बिअर पाजली आणि भाईंदर खाडीवरील रेल्वे पुलावर नेले. फोटो काढण्याच्या बहाण्याने तेथेच त्याने त्याला ढकलून दिले.

Mumbai Murder : धक्कादायक ! एकतर्फी प्रेमातून मामाने केली भाचीच्या प्रियकराची हत्या, वाचा नेमकं काय घडलं ?
धक्कादायक ! एकतर्फी प्रेमातून मामाने केली भाचीच्या प्रियकराची हत्याImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: May 26, 2022 | 2:53 PM
Share

मुंबई : मुंबईतील कांदिवली परिसरात मामा-भाचीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. मामाचा स्वतःच्या भाचीवरच जीव जडला आणि या एकतर्फी प्रेमप्रकरणा (Love Affair)तून मामाने भाचीच्या प्रियकराचा काटा काढल्याची घटना घडली आहे. आरोपीने मयत तरुणाला आधी भरपूर बियर पाजण्यात आली आणि त्यानंतर भाईंदरच्या खाडीत ढकलले. यामुळे बुडून तरुणाचा मृत्यू (Death) झाला. दिपक कट्टूकर (20) असे मयत तरुणाचे नाव आहे तर सूरज विश्वकर्मा (27) असे हत्या (Murder) करणाऱ्या आरोपी मामाचे नाव आहे. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी आरोपी सूरज विश्वकर्माला अटक केली आहे. भाचीवर प्रेम जडल्याने तिच्या प्रियकराला मार्गातून बाजूला करण्यासाठी आपण हे कृत्य केल्याची कबुली आरोपीने दिली.

काय आहे नेमके प्रकरण ?

कांदिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या 19 वर्षीय तरुणीवर तिच्याच मामाचे प्रेम जडले होते. मात्र तरुणीचे आधीच दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध सुरु होते. त्यामुळे भाचीच्या प्रियकराला आपल्या प्रेमाच्या मार्गातून हटवण्यासाठी मामाने हा हत्येचा कट रचला. आरोपी सूरज विश्वकर्माने भाचीचा प्रियकर दीपक कट्टूकर यास 12 मे रोजी मुंबईला लागून असलेल्या भाईंदर खाडीजवळ नेले. तेथे त्याला भरपूर बिअर प्यायला लावली. दीपक बिअरच्या नशेत तर्र झाल्यानंतर सूरजने त्याला भाईंदर खाडीवरील रेल्वे पूलावर फोटो काढण्याच्या बहाण्याने नेले. फोटो काढण्याचा बहाणा करत दीपकला रेल्वे पुलावरून खाडीत ढकलून दिले. त्यामुळे दीपकचा बुडून मृत्यू झाला.

असे उघडकीस आले प्रकरण ?

दीपक कट्टूकर हा दोन दिवस घरी न परतल्याने 14 मे रोजी त्याच्या कुटुंबीयांनी कांदिवली पोलिस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तांत्रिक पुराव्याच्या साहाय्याने तपास सुरू केला असता, आरोपी सूरज विश्वकर्मा याने बेपत्ता दीपक कट्टूकर याला कांदिवली रेल्वे स्थानकावरून भाईंदरच्या दिशेने नेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार प्रकरणाचा तपास सुरू असताना कांदिवली पोलिसांना वसईच्या समुद्राच्या किनारी एक बेवारस मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याचा फोटो दीपक कट्टूकरच्या कुटुंबीयांना दाखवला असता मृतदेहाची ओळख पटली. मात्र तोपर्यंत वसई पोलिसांनी मृताचा मृतदेह बेवारस म्हणून पुरला होता. कांदिवली पोलिसांनी मयताचा मृतदेह पुन्हा जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढला आणि त्याचे मेडिकल करून कुटुंबीयांच्या ताब्यात दिले.

कांदिवली पोलिसांनी आरोपी सूरज विश्वकर्मा याला अटक करून चौकशी केला असता आरोपीचेही त्याच मुलीवर प्रेम असल्याचे निष्पन्न झाले. दीपकला त्याच्या प्रेमाच्या मार्गातून दूर करण्यासाठी आरोपीने आधी त्याला पार्टी देण्याच्या बहाण्याने भाईंदरला नेले. त्यानंतर त्याला भाईंदर खाडीजवळ नेले आणि त्याला भरपूर बिअर पाजली आणि भाईंदर खाडीवरील रेल्वे पुलावर नेले. फोटो काढण्याच्या बहाण्याने तेथेच त्याने त्याला ढकलून दिले. (Out of one sided love, the uncle killed his nieces lover in mumbai)

चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु
चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु.
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?.
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा.
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ.
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत.
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित.
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर.
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न.