Mumbai Crime : दाऊदच्या नावे धमकी देत लेखिकेवर बलात्कार, फाईव्हस्टार हॉटेलमधील प्रकार, मुंबई महिलांसाठी असुरक्षित?

| Updated on: Jun 16, 2022 | 12:20 PM

मुंबईतील जुहू परिसरात असलेल्या एका फाईव्हस्टार हॉटेलमध्ये एका 75 वर्षीय व्यावसायिकाने 35 वर्षीय लेखिकेवर बलात्कार केला आहे.

Mumbai Crime : दाऊदच्या नावे धमकी देत लेखिकेवर बलात्कार, फाईव्हस्टार हॉटेलमधील प्रकार, मुंबई महिलांसाठी असुरक्षित?
बलात्कार (प्रातिनिधिक छायाचित्र)
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : मुंबईतील जुहूमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याच्या नावाची धमकी देत महिलावर बलात्कार (Mumbai Rape) केल्याची घटना समोर आली आहे. पीडित महिला लेखिका आहे. एका फाईव्हस्टार हॉटेलमध्ये व्यावसायिकाने या लेखिकेसोबत अतिप्रसंग केला. शिवाय याबद्दल बाहेर कुठे बोलल्यास मारून टाकण्याची धमकीही त्याने दिली. या व्यावसायिकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

लेखिकेवर बलात्कार

मुंबईतील जुहू परिसरात असलेल्या एका फाईव्हस्टार हॉटेलमध्ये एका 75 वर्षीय व्यावसायिकाने 35 वर्षीय लेखिकेवर बलात्कार केला आहे. आरोपीने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने बलात्कार पीडितेला धमकी दिली. अन् तिच्यावर बलात्कार केला. याबद्दल कुणालाही सांगितल्यास किंवा पोलिसात तक्रार केल्यास मी जीवे मारेन, अशी धमकीही दिली.

या व्यावसायिकाने पीडित महिलेकडून 2 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं.पण ते परत केले नाही. याबद्दल आपण तक्रा करू असं जेव्हा या महिलेने सांगितलं तेव्हा तिला दाऊदच्या नावाने धमक्या दिल्या जाऊ लागल्या. पीडितेला थेट धमकी देण्यात आली की, तिने याबाबत कोणाला काही सांगितले तर तिला मारून टाकण्यात येईल.

हे सुद्धा वाचा

पोलिसात तक्रार

या प्रकरणी पीडितेने पोलिसात तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम 376(2) नुसार गुन्हा दाखल केला. आयपीसी एन504 च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंबोली पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलिस महिलेच्या आरोपांची चौकशी करत आहेत. या प्रकरणाची कसून चौकशी सुरू आहे.

मुंबई महिलांसाठी असुरक्षित?

मुंबईमध्ये मागच्या काही दिवसांपासून महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबईत महिला, मुली सुरक्षित आहे का? असा सवाल विचारणं काळाची गरज बनत चालला आहे. यावर ठोस उपाय योजना होणं गरजेचं आहे.