आधी विजयने निशाला भोसकलं, मग विजयची विषारी औषध घेत आत्महत्या! आता 3 मुलांचं भविष्य अधांतरी

| Updated on: Jun 04, 2022 | 8:55 AM

Nanded Crime : शुक्रवारी सकाळी पत्नीला भोसकून पतीनं आत्महत्या केल्याच्या घटनेनं कासारपेठ परिसरात खळबळ माजली होती.

आधी विजयने निशाला भोसकलं, मग विजयची विषारी औषध घेत आत्महत्या! आता 3 मुलांचं भविष्य अधांतरी
नांदेडमधील खळबळजनक घटना
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

नांदेड : मानसिक तणावातून पतीनं आत्महत्या (Husband Suicide) केली. विषारी औषध घेत आत्महत्या करण्याआधी पतीनं पत्नीला भोसकल्याचा (Husband killed wife) धक्कादायक प्रकार समोर आलाय. ही घटना नांदेड (Nanded Crime News) जिल्ह्यामध्ये घडली आहे. पत्नीवर दवाखान्यात उपचार सुरु होता. दरम्यान, पती आणि पत्नीमध्ये वाद झाला. हा वाद टोकाला गेला आणि मानसिक तणावातून पत्नीची हत्या करत पतीनं आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी घडलेल्या या घटनेनं संपूर्ण नांदेड हादरुन गेलंय. या दाम्पत्याला एकूण तीन मुलं असून या मुलांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झालाय. या मुलांच्या डोक्यावरचं छत्र हरपलं असून आता त्यांचं काय होणार? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. नांदेड जिल्ह्यातल्या माहूर तालुक्यातील कासारपेठ इथं ही धक्कादायक घटना घडलीय.

हत्येआधी काय घडलं?

शुक्रवारी सकाळी पत्नीला भोसकून पतीनं आत्महत्या केल्याच्या घटनेनं कासारपेठ परिसरात खळबळ माजली होती. माहूर तालुक्यातील मौजे कासारपेठ येथील विजय गुलाब जाधव (33) व त्याची पत्नी निशा (29) हे दोघेही काल कासारपेठ शिवारातील शेतात काम करण्यासाठी गेले होते. दरम्यान सकाळी साडे आठ ते नऊच्या सुमारास त्याचे पत्नीसोबत भांडण झाले. याच दरम्यान शेतातील कामासाठी नेलेल्या धारदार हत्याराने त्याने पत्नीवर वार केले.

ही बाब शेजारील शेतात काम करीत असलेल्या अन्य शेतकऱ्यांनी पाहिली. त्यानंतर तडक या दोघांच्या दिशेने धाव घेतली. जखमी झालेल्या निशाला माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्यानंतर तिला यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आलं.

हे सुद्धा वाचा

दरम्यान 2 जून रोजी विलास हा शेतातून अज्ञात ठिकाणी पळून गेला होता. 3 जूनला सकाळी उमरा ते तोळा तांडा या दरम्यान असलेल्या नाल्यात त्याचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी सिंदखेड पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

तीन मुलं पोरकी

निशा आणि विजय यांना एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या भवितव्याचा प्रश्न आता निर्माण झाला आहे. आई-वडील यांचं छत्र हरपल्यानं ही तिन्ही मुलं पोरकी झाली आहेत.

किरकोळ कारणातून चाकूने भोसकल्यानंतर पती विजय फरार झाला होता. या दरम्यान जखमी असलेल्या निशाला अधिक उपचारासाठी यवतमाळला हलवण्यात आले. त्या दरम्यान पत्नी निशाचा मृत्यू झाल्याची अफवा कुणीतरी पसरवली, आता आपलं काही खंर नाही, या भीतीतून मग पती विजय ने स्वतःला संपवलं. या प्रकरणी सिंदखेड पोलीस अधिक तपास करत आहेत.