AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ghaziabad : भाऊ वारला, पण वहिनी रात्री कुणाशी बोलत असते? डोक्यात संशय, दीराने उचललं भयंकर पाऊल

सदरील घटना ही गाझियाबादमधील लोणी येथील पंचवटी भागात घडली आहे. भावाच्या निधनानंतर असे फोनवर सातत्याने बोलणे चांगले नाही. यासंदर्भात सासरच्या लोकांनी महिलेला समजावूनही सांगितले होते. असे असताना वहिनी रोज कुणाला फोनवर बोलत असतील, त्यांचे कुण्या तरुणाशी प्रेमसंबंध असल्याचा संशय दीराला होता.

Ghaziabad : भाऊ वारला, पण वहिनी रात्री कुणाशी बोलत असते? डोक्यात संशय, दीराने उचललं भयंकर पाऊल
संशयातून दीराने वहिनीची हत्या केल्याची घटना गाझियाबाद येथील लोणीमध्ये घडली आहे. Image Credit source: TV9 Marathi
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Jul 26, 2022 | 4:30 PM
Share

मुंबई :  (Suspicion) संशयाचा अंगात शिरलं की माणूस कोणत्या स्टेपला जातो याचा प्रत्यय (Ghaziabad) गाझियाबादमधील लोणी येथे आला आहे. शिवाय दिवसेंदिवस त्याच घटना होत राहिल्यास संशय अधिकच बळावतो आणि माणूस मागचा पुढचा कोणताही विचार न करता टोकाची भूमिका घेतो. भाऊ वारल्यानंतरही वहिनी रात्री अज्ञात व्यक्तीशी बोलत असल्याचा संशय घेत दीराने विधवा वहिनीच्या डोक्यात हातोडीने वार करुन तिची (Murder) हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवाय आपणच हे कृत्य केल्याची कबुलीही मृताच्या दीराने पोलीसांना दिली आहे. वहिनीने फोन बोलल्याले घरातीलच कुणालाच आवडत नव्हते. असे असतानाही दिवसेंदिवस याचे प्रमाण वाढल्याने दीराने हे कृत्य केले आहे. सदरील महिलेला तीन मुले असून 11 महिन्यांपूर्वीच रस्ते अपघातामध्ये तिच्या पतीचा मृत्यू झाला होता.

असा काढला काटा..!

सदरील घटना ही गाझियाबादमधील लोणी येथील पंचवटी भागात घडली आहे. भावाच्या निधनानंतर असे फोनवर सातत्याने बोलणे चांगले नाही. यासंदर्भात सासरच्या लोकांनी महिलेला समजावूनही सांगितले होते. असे असताना वहिनी रोज कुणाला फोनवर बोलत असतील, त्यांचे कुण्या तरुणाशी प्रेमसंबंध असल्याचा संशय दीराला होता. यातूनच त्याने दुपारी एकच्या सुमारास आरोपी अभिषेकने वहिनीच्या खोलीमध्ये प्रवेश केला. एवढेच नाहीतर हातोडीने त्यांच्या डोक्यावर आणि तोंडावर मारहाण केली. यामध्येच त्यांचा मृत्यू झाला.

11 महिन्यापूर्वीच पतीचा मृत्यू, आता मुले पोरकी

आरोपीचा मोठा भाऊ गौरव आणि 23 वर्षीय ट्विंकल यांचे सप्टेंबर 2017 मध्ये लग्न झाले होते. त्यांना तीन मुले आहेत. तर 11 महिन्यापूर्वीच तिच्या पतीचा रस्ते अपघातामध्ये मृत्यू झाला होता. तेव्हापासून ट्विंकल ही तीन मुलांसह सासरी राहत होती. भावाच्या मृत्यूनंतरच आरोपी अभिषेक हा आपल्या वहिनीकडे संशयाच्या नजरेने बघत होता. त्याच संशयाचा शेवट हा असा झाला आहे. त्याच्या या टोकाच्या निर्णयामुळे तीन मुले आज पोरकी झाली आहे.

पोलिसांकडून आरोपीला अटक

घटनेच्या माहिती मिळताच पोलिस हे घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून तपास करण्यास सुरवात केली. दरम्यान, आरोपीला अटक करण्यात आली आहे. चौकशीत आपणच वहिनीचा खुन केल्याचे त्याने कबूल केले आहे, तर त्यामागचे कारणही सांगितले आहे. या घटनेत वापरलेला हातोडाही पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केला आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?