AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Love Jihad : कमरुलचा विवेक बनून हिंदू मुलीशी विश्वासघात, अखेर 8 वर्षांनी असं समोर आलं सत्य

Love Jihad : युवतीने सांगितलं की, एक दिवस तो घरी आला आणि लग्नाचा प्रस्ताव ठेवला. दबाव टाकू लागला. त्याने आपलं नाव विवेक रावत सांगितलं होतं. वडिलांच नाव रामपाल रावत सांगितलेलं.

Love Jihad : कमरुलचा विवेक बनून हिंदू मुलीशी विश्वासघात, अखेर 8 वर्षांनी असं समोर आलं सत्य
Marriage
| Updated on: Jul 21, 2025 | 5:07 PM
Share

एका मुस्लिम युवकाने हिंदू असल्याच सांगून लग्न केलं. ज्याला ती पती मानतेय, त्याने फसवून लग्न केलय. एका युवतीला 8 वर्ष हे सत्य समजलच नाही. पोलखोल झाली तेव्हा पीडितेने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सर्व कहाणी सांगितली. या प्रकरणी गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरु केला. सध्या आरोपीचा शोध सुरु आहे. पीडितेने पोलिसांना सांगितलं की, ती रहीमाबादची सामाजिक कार्यकर्ती आहे. ब्लॉक स्तरावर महिलांसाठी पेन्शन आणि अन्य आवश्यक कागदपत्र बनवण्याचं काम करते. एक दिवस अनोळखी नंबरवरुन फोन आला. फोन करणाऱ्याने त्याचं नाव विवेक असल्याच सांगून पेन्शनची माहिती घेतली. त्यानंतर त्याचा फोन काही दिवसांच्या अंतराने चार ते पाच वेळ आला. त्याने भेटायला बोलावलं. मना केल्यानतंर दबाव टाकू लागला.

हरदोईच्या पिहानी दहेलियाचा राहणारा असल्याच त्याने सांगितलेलं. ट्रॅव्हल एजन्सीचा त्याचा व्यवसाय होता. पीडितेने पोलिसांना सांगितलं की, स्वत:ला विवेक सांगणारा कमरुल हक पूजा करायचा. डोक्यावर टिळा लावायचा. हातात कलावा बांधायचा. म्हणून त्याच्यावर संशय आला नाही. त्याने याचा फायदा उचलला. लग्न झालेले असतानाही पुन्हा विवाह केला.

नंतर घरजावई बनला

युवती कमरुलची बहिण आणि तिच्या नवऱ्याबरोबर बोलली. त्यांनी सुद्धा कमरुलबद्दल सर्वकाही खोट सांगितलं. त्यानंतर कमरुलने माझ्यासोबत आर्य समाज मंदिरात 2017 साली लग्न केलं. दोन वर्ष आम्ही लखनऊला भाड्याच्या घरात राहत होतो. त्यानंतर करोना आला. मी त्याला हरदोईला जाऊन राहूया असं सांगितलं, तेव्हा त्याने टाळाटाळ केली. कोविडमध्ये धंदा बसल्याने हालत खराब झाल्याच कमरुलने सांगितलं. नंतर घरजावई बनून रहीमाबादमध्ये चार वर्ष राहिला.

युवतीला कसं समजलं तिची फसवणूक झालीय?

जास्तवेळ माहेरी राहिल्यामुळे मी त्याला हरदोईला घेऊन जायला सांगितलं. पुन्हा तो टाळाटाळ करु लागला. एकदिवस नोकरीचा कारण देऊन लखनऊनमध्ये राहू लागला. तो दीडवर्ष राहिला. कधी-कधी यायचा. मला येणं बंद केलं. फोन केल्यावर नोकरी गेल्याच त्याने सांगितलं. तो दिल्लीला निघून गेला. जवळपास वर्षभर तो गायब होता. मग नऊ जूनला त्याला शोधत-शोधत मी त्याच्या घरी गेली. मला समजलं की, त्याचं नाव कमरुल आहे. त्याचं लग्न झालय. त्याला मुलं आहेत. मी लगेच विरोध केला, त्यावेळी त्याच्या कुटुंबियांनी मला मारुन-मारुन पळवलं.

Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.