AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Crime News : बेपत्ता उपसरपंच सापडले बेशुद्ध अवस्थेत, पत्नीच्या आरोपामुळं चारजण पोलिसांच्या ताब्यात

गावातील लोकांनी आणि त्यांच्या पत्नीने घटनास्थळी धाव घेतली. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु उपचारापुर्वी त्यांचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं.

Crime News : बेपत्ता उपसरपंच सापडले बेशुद्ध अवस्थेत, पत्नीच्या आरोपामुळं चारजण पोलिसांच्या ताब्यात
धुळ्यात पतीच्या हत्ये प्रकरणी पत्नीसह चौघांना अटकImage Credit source: assault attack on woman and girl living in live in nashik incident treatment for both is underway
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Feb 19, 2023 | 2:54 PM
Share

वाशिम : वाशिम (washim) जिल्ह्यातील मालेगाव (malegaon) तालुक्यातल्या बोराळा (borala) येथील उपसरपंच यांचा गावातीलच काही लोकांनी अपहरण करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 18 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान काही अज्ञात इसमांनी विश्वास कांबळे यांचं अपहरण केलं होतं. त्यानंतर मालेगाव तालुक्यातीलच गुंज या ठिकाणी ते बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. नंतर त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं, तेव्हा त्यांना मृत घोषित करण्यात आले. उपसरपंच यांच्या पत्नीने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे गावातील अजून काहीजण अटक होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्ती केली आहे.

बेशुद्ध अवस्थेत असल्याची माहिती गावकऱ्यांना मिळाली

विश्वास कांबळे असं उपसरपंचांचं नाव आहे. गावातील काही लोकांना त्यांना काही काम असल्याचं सांगून घरातून बाहेर काढलं. त्यानंतर त्यांचं उपहरण केलं. त्यांचा गावातील लोकांनी कुटुंबियांनी शोध घेतला. परंतु ते काही परिसरात आढळून आले नाही. त्यानंतर मालेगाव तालुक्यातीलच गुंज या ठिकाणी ते बेशुद्ध अवस्थेत असल्याची माहिती गावकऱ्यांना मिळाली.

या प्रकरणात ॲट्रॉसिटीसह, अपहरण आणि खुणाचा गुन्हा दाखल

गावातील लोकांनी आणि त्यांच्या पत्नीने घटनास्थळी धाव घेतली. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु उपचारापुर्वी त्यांचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं. या प्रकरणी पोलिसांनी चार लोकांना अटक केली आहे. त्याचबरोबर अजून काही लोकांना अटक होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात ॲट्रॉसिटीसह, अपहरण आणि खुणाचा गुन्हा दाखल केला आहे. विश्वास कांबळे हे कांबळे हे बोराळा गावचे उपसरपंच असून राजकीय वादातून त्यांची हत्या झाल्या असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

वैद्यकीय अहवाल आल्यानंतर

मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला असून वैद्यकीय अहवाल आल्यानंतर नेमका त्यांचा मृत्यू कशामुळे हे उजेडात येणार आहे.

Follow Us
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!