AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता पदवी, पदविकेसाठी ‘कालमर्यादा’ नाही; पुढील वर्षापासून ‘श्रेयांक बँक’ लागू होणार

भारतीय शिक्षण व्यवस्थेत आता अमुलाग्र बदल होणार आहेत. आता पदवीसाठी तीन वर्षे, पदव्युत्तर शिक्षणासाठी दोन वर्षे थांबण्याची गरज नाही. (higher education framework will change from next year)

आता पदवी, पदविकेसाठी 'कालमर्यादा' नाही; पुढील वर्षापासून ‘श्रेयांक बँक’ लागू होणार
सांकेतिक फोटो
| Updated on: Jan 28, 2021 | 4:31 PM
Share

नवी दिल्ली: भारतीय शिक्षण व्यवस्थेत आता अमुलाग्र बदल होणार आहेत. आता पदवीसाठी तीन वर्षे, पदव्युत्तर शिक्षणासाठी दोन वर्षे थांबण्याची गरज नाही. आता विविध विषयांचे श्रेयांक साठवून त्यानुसार तुम्ही प्रणाणपत्र, पदविका, पदवी घेऊ शकता. पुढील वर्षापासून देशात श्रेयांक बँकेची संकल्पना राबवण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कमी वेळात शैक्षणिक वर्ष पूर्ण करता येणार असून त्यांच्या प्रतिभेलाही वाव मिळणार आहे. (higher education framework will change from next year)

विद्यापीठ अनुदान आयोगाने या नव्या शिक्षण पद्धतीच्या श्रेयांक बँक संकल्पनेचा मसुदा तयार केला आहे. पुढील वर्षापासून ही संकल्पना राबविण्यासाठी युजीसीने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केला आहे. एखादी पदवी घेण्यासाठी आता विद्यार्थ्यांना दोन-दोन, तीन-तीन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याची गरज राहणार नाही. ठराविक कालमर्यादेचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याची चौकट आता विद्यार्थ्यांना पाळण्याची गरज नाही. श्रेयांक पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना आता वेगवेगळ्या टप्प्यातील शैक्षणिक मान्यता मिळवण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे.

नव्या शैक्षणिक धोरणाचा परिणाम

केंद्र सरकारने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणलं आहे. या धोरणानुसार शैक्षणिक पद्धतीचा सर्वांगीण विचार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना पदवीच्या कालमर्यादेच्या चौकटीतून बाहेर काढण्यासाठी शैक्षणिक श्रेयांक बँकेची स्थापना करण्यासाठी आयोगाने मसुदा तयार केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विषय आणि कालमर्यादा निवडीचे स्वातंत्र्य मिळणार आहे.

अशी असेल श्रेयांक बँक

साधारणपणे पदवी घेण्यासाठी तीन वर्षे तर पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी दोन वर्षे जातात. तसेच ही पदवी घेताना विद्यार्थ्यांना ठरावीक वर्षात ठरावीक विषयच शिकण्याचे बंधन आहे. श्रेयांक बँकेने ही चौकट मोडली आहे. या नव्या पद्धतीनुसार विद्यार्थ्यी हवे ते विषय मिळवून त्याचे श्रेयांक मिळवू शकतील. प्रत्येक विषयाचे श्रेयांक मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना ठरावीक तास शिक्षण पूर्ण करणे, प्रकल्प पूर्ण करणे बंधनकारक आहे. प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी अशा प्रत्येक टप्प्यासाठी निश्चित करण्यात आलेले श्रेयांक खात्यात साठल्यावर विद्यार्थी त्यांच्या गरजेनुसार त्यांचा वापर करू शकतील. एका विषयाचे श्रेयांक सात वर्षांपर्यंत विद्यार्थ्यांना वापरता येऊ शकतील. त्याचप्रमाणे एका विषयाचे श्रेयांक एका टप्प्यासाठी वापरल्यास ते दुसऱ्या टप्प्यासाठी वापरता येणार नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ तर वाचणार आहेच शिवाय त्यांना त्यांच्या आवडीच्या विषयात करिअर करण्याची संधीही मिळणार आहे. पर्यायाने विद्यार्थ्यांना त्यांची प्रतिभा दाखवता येणार आहे. (higher education framework will change from next year)

संबंधित बातम्या:

CBSE board exam 2021 schedule : 10 वी आणि 12 वीच्या वेळापत्रकाची घोषणा 2 फेब्रुवारीला : रमेश पोखरियाल निशंक

पुण्याच्या जुई केसकरचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, पार्किन्सनवरील उपकरणासाठी गौरव

श्रीकांत दातार यांना ‘पद्मश्री’, हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या मराठमोळ्या डीनचा भारावणारा प्रवास

(higher education framework will change from next year)

Follow Us
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?.

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल.

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र.

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी.

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी