
केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे घेतली जाणारी परीक्षा ही जगातील सर्वात अवघड परीक्षेपैकी एक आहे. देशातील लाखो विद्यार्था ही परीक्षा पास होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न पाहत असतात, मात्र यात फार कमी लोकांना यश मिळते. ही परीक्षा पास होणे म्हणजे प्रचंड अभ्यास, एकाग्रता, हुशारीचा संगम आहे. या परीक्षेत संजिता महापात्रा यांनी 4 वेळा अपयश आल्यानंतर पाचव्या प्रयत्नात यश मिळवले होते. त्यांच्या प्रवसाबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
संजिता महापात्रा या ओडिशातील राउरकेला येथील रहिवासी आहे. संजिता यांना लहानपणापासूनच नवीन गोष्टी शिकण्याची आवड होती. शालेय शिक्षण झाल्यानंतर त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा अभ्यास करण्यासाठी IIT कानपूरमध्ये प्रवेश घेतला. इंजिनिअरिंग सुरू असताना त्यांनी युपीएससी परीक्षेसाठी तयारी करण्याचा निर्णय घेतला आणि अभ्यासाला सुरुवात केली.
संजिता महापात्रा यांनी पदवी घेतल्यानंतर UPSC परीक्षेच्या अभ्यासाला सुरूवात केली. मात्र सुरुवातीच्या काळात त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. पहिल्या तीन प्रयत्नांमध्ये त्यांना प्रिलिम्स परीक्षाही पास होता आली नाही. यामुळे त्या नाराज झाल्या आणि काही काळासाठी एका कंपनीत नोकरी केली.
संजिता यांनी जॉब सुरू असताना यूपीएससी परीक्षेचा चौथा अटेम्पट दिला, मात्र या प्रयत्नातही तिला अपयश आले. त्यानंतर त्यांनी केवळ तिच्या तयारीवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी नोकरी सोडली आणि पुन्हा जोमाने यूपीएससीची तयारी सुरू केली. कोणत्याही कोचिंगशिवाय ऑनलाइन अभ्यास, एनसीईआरटी पुस्तके आणि वर्तमानपत्रांच्या मदतीने अभ्यास केला.
संजिता यांनी यूपीएससीची तयारी करत असताना लग्न केले. लग्नानंतर सासरच्यांनी त्यांना अभ्यासात पाठिंबा दिला. त्यांचे पती बिस्वा रंजन मुंडारी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) मध्ये व्यवस्थापक म्हणून काम करतात, त्यांनी शक्त तितकी मदत केली.
कठोर परिश्रम आणि सतत प्रयत्नांनंतर, संजिता महापात्रा यांनी पाचव्या प्रयत्नाक 2019 मध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि संपूर्ण भारतात 10 वा क्रमांक मिळवला. चारवेळा अपयश आल्यानंतरही खचून न जाता सातत्याने अभ्यास केल्यास यश मिळू शकते हे संजिता यांनी दाखवून दिले आहे.