AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Daily Static GK Quiz : आंब्याचं शहर कोणत्या शहराला म्हटलं जातं ?

कोणत्याही स्पर्धा परीक्षांची तयारी करताना सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारले जात असतात. त्यासाठी आपल्या देशातील कोणते राज्य आणि शहर कशासाठी प्रसिद्ध आहे असे प्रश्न हमखास विचारले जात असतात. पाहूया काही सोपे परंतू सहज उत्तर न येणारे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे

Daily Static GK Quiz : आंब्याचं शहर कोणत्या शहराला म्हटलं जातं ?
mango_Image Credit source: socialmedia
| Updated on: Jul 26, 2023 | 1:23 PM
Share

नवी दिल्ली | 26 जुलै 2023 :  देशभरातील अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये स्टेटीक जीके प्रश्न विचारले जातात. मग ती परीक्षा कोणतीही असो एमपीएसीची किंवा युपीएससीची असो त्यामध्ये असे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे अशा परीक्षांची तयारी करताना देशातील कोणत्या प्रातांत काय पिकते हे जाणणे महत्वाचे आहे. जर तुम्ही कोणत्याही सरकारी नोकरीसाठी परीक्षेची तयारी करीत असाल तर तुम्ही या प्रश्नाची तयारी करायला हवी. तर पाहुयात कोणते प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात.

प्रश्न क्रमांक 1 – भारतात सर्वात जादा जंगल कोणत्या राज्यात आहे ?

क ) मणिपूर

ख ) अरुणाचल

ग ) कर्नाटक

घ ) मध्यप्रदेश

उत्तर 1 – ( घ ) मध्य प्रदेश

– भारतात सर्वात जास्त जंगल आपल्या शेजारच्या मध्य प्रदेशात आहे. मध्य प्रदेशाचे एकूण क्षेत्रफळ 308252 वर्ग किलोमीटर आहे. त्यापैकी सुमारे 77,462 वर्ग किलोमीटर क्षेत्रफळात जंगल पसरले आहे. देशातील एकूण जंगल क्षेत्राची तुलना करता 30 टक्के जंगलाचा भाग एकट्या मध्यप्रदेशात आहे.

प्रश्न 2 – स्वयंपाक घरात वापरल्या जाणाऱ्या काचेच्या भांड्यांसाठी कोणत्या प्रकारची काच वापरली जाते.

क) फ्लिंट ग्लास

ख ) पायरेक्स ग्लास

ग ) क्रुक ग्लास

घ ) सोडा ग्लास

उत्तर  2 – ख ) पायरेक्स ग्लास

– स्वयंपाक घरात वापरल्या जाणाऱ्या काचेच्या भांड्यासाठी पायरेक्स ( PYREX GLASS ) काचेचा वापर केला जात असतो.

प्रश्न 3 – भारतात सर्वाधिक रेशमाचे ( SILK ) उत्पादन कोणत्या राज्यात होते ?

क ) कर्नाटक

ख ) ओडीशा

ग ) उत्तर प्रदेश

घ ) पश्चिम बंगाल

उत्तर 3 – क ) कर्नाटक

– कर्नाटक राज्यात देशात सर्वाधिक रेशमाचे उत्पादन होते. येथे वार्षिक सरासरी 8,200 मेट्रीक टन रेशमचे उत्पादन होत असते. देशातील एकूण रेशीम उत्पादनापैकी एकट्या कर्नाटकात एक तृतीयांश उत्पादन होत असते.

प्रश्न – 4 कोणत्या भारतीय क्रिकेटरने सर्वात आधी कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावले होते.?

क ) रवी शास्री

ख ) सुनील गावस्कर

ग ) कपिल देव

घ ) लाला अमरनाथ

उत्तर 4 – घ ) लाला अमरनाथ

– लाला अमरनाथ यांनी 15 डिसेंबर 1933 आपल्या पहिल्याच कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंड विरुद्ध 118 धावा करीत कसोटीतील पहिले शतक ठोकणारे पहिले भारतीय क्रिकेटपटू बनले होते.

प्रश्न – 5 – भारताच्या कोणत्या शहराला आंब्यांचे शहर म्हटले जाते ?

उत्तर 5 – भारतातील कर्नाटक राज्यातील कोलार जिल्ह्यातील श्रीनिवासपूर या शहराला आंब्याचं शहर म्हटले जाते.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.