AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केरळमध्ये भाजपला मतदान का होत नाही?; भाजप नेत्याचं उत्तर वाचाल तर चक्रावून जाल

भाजपला केरळमधील लोक मतदान का करत नाहीत? या प्रश्नाचं उत्तर खुद्द भाजपच्या नेत्यानेच दिलं आहे. (Kerala has a literacy rate of 90%, O Rajagopal reveals reasons why BJP is not growing in state)

केरळमध्ये भाजपला मतदान का होत नाही?; भाजप नेत्याचं उत्तर वाचाल तर चक्रावून जाल
O Rajagopal
| Updated on: Mar 25, 2021 | 1:06 PM
Share

तिरुवनंतपूरम: भाजपला केरळमधील लोक मतदान का करत नाहीत? या प्रश्नाचं उत्तर खुद्द भाजपच्या नेत्यानेच दिलं आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केरळमधील एकमेव आमदार ओ. राजगोपाल यांनी या प्रश्नाचं उत्तर देऊन टाकलं आहे. केरळमध्ये शिकलेले लोक अधिक आहेत. हे शिकलेले लोक भाजपला मतदान करत नाहीत, असं राजगोपाल यांनी स्पष्ट केलं. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत राजगोपाल यांनी हे विधान केल्याने भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे. (Kerala has a literacy rate of 90%, O Rajagopal reveals reasons why BJP is not growing in state)

‘इंडियन एक्सप्रेस’ या इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत राजगोपाल यांनी हा खुलासा केला आहे. हरियाणा आणि त्रिपुरामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या आणि पश्चिम बंगालमध्ये एक मुख्य राजकीय पक्ष म्हणून उदयास आलेल्या भाजपला केरळमध्ये अस्तित्व निर्माण का करता आलं नाही? असा सवाल राजगोपाल यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी, केरळमध्ये सर्वाधिक साक्षरतेचं प्रमाण आहे. येथील लोक शिकलेले आहेत. ते मतदान करण्यापूर्वी विचार करतात आणि तर्क लावतात. त्यानंतरच ते मतदान करतात असं राजगोपाल यांनी म्हटलं आहे.

शिकलेल्या लोकांची सवय

केरळ हे वेगळं राज्य आहे. दोन तीन कारणांनी हे राज्य इतर राज्यांपेक्षा वेगळं ठरतं. केरळमधील साक्षरतेचं प्रमाण 90 टक्के आहे. येथील लोक विचार करतात. तर्क लढवतात. शिकलेल्या लोकांची ही सवय असते, हा सुद्धा एक मुद्दा आहे, असं ते म्हणाले.

हिंदू-अल्पसंख्याकांची लोकसंख्या समान

दुसरी गोष्ट म्हणजे केरळमध्ये 55 टक्के हिंदू आणि 45 टक्के अल्पसंख्याक आहेत. त्यामुळे राजकीय समीकरणं जुळवणं शक्य होत नाही. त्यामुळेच केरळची तुलना इतर राज्यांशी होऊ शकत नाही. केरळची परिस्थिती वेगळी असली तरी आम्ही हळूहळू पुढे सरकतो आहोत, पक्ष वाढवण्याचं काम आम्हीही करत आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं.

6 एप्रिल रोजी मतदान

केरळच्या 160 जागांसाठी 6 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. केरळमध्ये केवळ एकाच टप्प्यात मतदान होणार असून 2 मे रोजी निकाल लागणार आहे. त्यामुळे राज्यातील जनता कुणाच्या पारड्यात मतांचं दान टाकणार हे पाहावं लागणार आहे. (Kerala has a literacy rate of 90%, O Rajagopal reveals reasons why BJP is not growing in state)

संबंधित बातम्या:

काँग्रेस नेते संघ-भाजपशीही हातमिळवणी करू शकतात; राष्ट्रवादीच्या चाकोंचा दावा

पाच किलो मोफत तांदूळ देणार, पाच लाख घरे बांधणार; काँग्रेस आघाडीचा ‘पिपल्स मेनिफेस्टो’ जारी

‘2 मुलींवर बलात्कार आणि हत्येचा आरोप’, न्याय न मिळाल्याने पीडित आई थेट मुख्यमंत्र्यांविरोधात निवडणूक रिंगणात

(Kerala has a literacy rate of 90%, O Rajagopal reveals reasons why BJP is not growing in state)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...