लता मंगेशकरांचं हे गाणं बनलं अंगाई गीत, आईने म्हणताच मुलं पटकन झोपतात, 54 वर्षांपासून सुपरहिट

54 वर्षांपूर्वीचं प्रचंड सुंदर गाणं, जे आजही अनेक महिला मुलांना झोपवण्यासाठी गातात. इतकं सुंदर गाणं की काही क्षणात मनाला मिळतो सुकून. लता मंगेशकर यांच्या आवाजामुळे गाणं ठरलं अजरामर.

लता मंगेशकरांचं हे गाणं बनलं अंगाई गीत, आईने म्हणताच मुलं पटकन झोपतात, 54 वर्षांपासून सुपरहिट
| Updated on: Sep 01, 2026 | 2:43 PM

सोशल मीडियावर सतत नवनवीन गाणी रिलीज होताना दिसत आहेत. मात्र, आजही काही चाहते 90 च्या दशकातील गाणी ऐकताना दिसतात. हिंदी चित्रपटसृष्टीत आई आणि मुलाच्या नात्याला नेहमीच अत्यंत भावनिक पद्धतीने पडद्यावर मांडण्यात आले आहे. जुन्या हिंदी चित्रपटांमधील अनेक अंगाई गीते आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. त्यापैकीच एक हृदयस्पर्शी अंगाई म्हणजे ‘मेरा राजा बेटा बूझे एक पहेली’. 1972 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अनुराग’ चित्रपटातील हे गाणं आजही आईच्या मायेचे आणि मुलावरील तिच्या प्रेमाचे प्रतीक मानले जाते.

या गाण्यात नूतन आपल्या मुलाला कुशीत घेऊन झोपवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मात्र, मुलाला झोप येत नसते. तो आईला नेहमीची अंगाई म्हणण्याचा हट्ट करतो. त्यानंतर आई जेव्हा ‘प्यारी-प्यारी अखियों की कौन सहेली…’ असे शब्द गुणगुणते, तेव्हा संपूर्ण प्रसंगच भावूक करून जातो. नूतन यांच्या चेहऱ्यावरील भाव, अभिनयातील सहजता आणि आईच्या मायेचे दर्शन घडवणारी त्यांची शैली यामुळे हे गाणं प्रेक्षकांच्या मनात कायमचे कोरले गेले.

तीन दिग्गजांमुळे गाणं झालं अजरामर

‘मेरा राजा बेटा बूझे एक पहेली’ या अंगाई गीताला अजरामर करण्यात तीन दिग्गजांचा मोठा वाटा आहे. गीतकार आनंद बक्षी यांच्या भावस्पर्शी शब्दांना एस. डी. बर्मन यांनी सुरेल संगीत दिले. तर लता मंगेशकर यांच्या आवाजाने या अंगाईला वेगळीच भावनिक उंची मिळाली.

लता मंगेशकर यांच्या आवाजातून हे शब्द ऐकताना जणू आई आपल्या लेकराला कुशीत घेऊन त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असल्याचा भास होतो. त्यामुळे अनेक दशकांनंतरही या गाण्याची जादू कायम आहे.

चित्रपटाची कथा भावनिक

‘अनुराग’ चित्रपटात नूतन यांनी अनु राय नावाच्या विधवा आईची भूमिका साकारली होती. त्यांचा मुलगा चंदन हा गंभीर आजाराने त्रस्त असतो. आपल्या मुलाच्या आजाराची गंभीरता आणि त्याच्यावर आलेले संकट आईला कळते.


मात्र, आई म्हणून आपल्या मुलाच्या चेहऱ्यावर दुःख दिसू नये, यासाठी नूतन स्वतःच्या वेदना मनात दडवतात आणि त्याला शांत करण्यासाठी ही अंगाई गातात. चित्रपटात हे गाणं दोन वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये येते. सुरुवातीला ते आनंदी वातावरणात ऐकायला मिळते तर नंतर मुलाच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्याचे दुःखद रूप अधिकच भावूक करून जाते.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us