AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Allu Arjun : अटकेनंतर अल्लू अर्जुनची पहिली प्रतिक्रिया, हात जोडून म्हणाला.. Video समोर

तुरूंगातून सुटका झाल्यानतर अभिनेता अल्लू अर्जुन याची पहिलीच प्रतिक्रिया समोर आली आहे. माध्यमांसमोर आलेला अल्लू अर्जन अटकेबद्दल, या केसबद्दल नेमकं काय म्हणाला ?

Allu Arjun : अटकेनंतर अल्लू अर्जुनची पहिली प्रतिक्रिया, हात जोडून म्हणाला.. Video समोर
अल्लू अर्जुन याने पहिल्यांदाच सोडलं मौनImage Credit source: ANI
| Updated on: Dec 14, 2024 | 10:57 AM
Share

हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याप्रकरणी अल्लू अर्जुन याला काल ( शुक्रवारी) दुपारी अटक करण्यात आली होती. रात्रभर तुरूंगात काढल्यावर आज सकाळी त्याची सुटका झाली आणि तो अंतरिम जामिनावर बाहेर पडलाय. शनिवारी सकाळी 6.40 च्या सुमारास तो चंचलगुडा जेलबाहेर आला. त्याला रिसीव्ह करण्यासाठी त्याचे वडील आणि फिल्म प्रोड्युसर अल्लू अरविंद यांच्यासह त्याचे सासरेही पोहोचले. तेलंगणा उच्च न्यायालयाने शुक्रवारीच अभिनेता अल्लू अर्जुनला अंतरिम जामीन मंजूर केला होता. मात्र जामिनाची कागदपत्रे रात्री उशिरा कारागृह अधिकाऱ्यांकडे पोहोचली. त्यामुळे त्याला संपूर्ण रात्र तुरुंगात काढावी लागली. कारागृहाच्या नियमानुसार कैद्यांना रात्री सोडता येत नाही.

जेलमधून बाहेर पडल्यानंतर अल्लू अर्जुन हा ज्युबिली हिल्स येथील त्याच्या निवासस्थानी पोहोचला. त्यानंतर तो पहिल्यांदाच माध्यमांसमोर आला आणि या संपूर्ण प्रकरणावर त्याने प्रथमच मौन सोडले.

काय म्हणाला पुष्पा स्टार ? 

‘ मला  जे प्रेम आणि पाठिंबा मिळाला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. मी माझ्या सर्व चाहत्यांचेही मनापासून आभार मानतो, पण काळजी करण्यासारखं काहीही नाही. मी सुरक्षित आहे, ठीक आहे.  काळजी करण्यासारखं काहीही नाहीये. मला एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे, मी कायद्याचं पालन करणारा नागरिक आहे. मी कायद्याचा आदर करतो. (याप्रकरणाच्या) तपासात मी पूर्णपणे सहकार्य करेन. जी घटना घडली ती खूप दुर्दैवी होती, त्याबद्दल मला खेद आहे. मृत महिलेच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे. ‘ अशा शब्दांत त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या.

‘पुष्पा 2: द रूल’ चित्रपटाच्या प्रीमिअरदरम्यान हैदारबादच्या संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. त्याप्रकरणी शुक्रवारी हैजराबाद पोलिसांनी अल्लू अर्जुन याला अटक केली आणि न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तेव्हा न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.  न्यायालयाच्या आदेशानंतर कडक सुरक्षा व्यवस्थेत चंचलगुडा तुरुंगात त्याची रवानगी करण्यात आली.

Follow Us
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!