‘तुम्ही मला त्रास..’, या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ऐश्वर्या राय झालेली नाराज, कारण सेटवर सकाळी..

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान झालेली नाराज. थेट म्हणालेली 'तुम्ही मला त्रास...'

तुम्ही मला त्रास.., या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ऐश्वर्या राय झालेली नाराज, कारण सेटवर सकाळी..
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 20, 2026 | 5:31 PM

Aishwarya Rai : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आपल्या सौंदर्य, प्रभावी अभिनय आणि मनमोहक डोळ्यांसाठी ओळखली जाते. तिच्या यशस्वी कारकिर्दीत दिग्दर्शक मणिरत्नम यांचा मोठा वाटा आहे. पहिल्या तमिळ चित्रपटापासून ते हिंदीतील गाजलेल्या चित्रपटांपर्यंत दोघांनी अनेक प्रोजेक्ट्समध्ये एकत्र काम केले आहे.

अलीकडेच कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका ब्रिंदा मास्टर यांनी O2India ला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला आणि अनेक आठवणींना उजाळा दिला.

पहाटे 5 वाजता शूट; तरीही अप्रतिम परफॉर्मन्स

मणिरत्नम यांच्या Iruvar या चित्रपटातील ‘कन्नई कट्टिकोलाथे’ या गाण्याच्या चित्रीकरणाचा किस्सा सांगताना ब्रिंदा मास्टर म्हणाल्या की, हे गाणे पहाटे 5 वाजता शूट करण्यात आले होते. त्या म्हणाल्या, ‘आजही मला त्या म्युझिक पीसची आठवण आहे. ऐश्वर्याने त्या गाण्यात अप्रतिम नृत्य केले. त्या सरावासाठी हॉटेलमध्ये आल्या होत्या. मी त्यांना परत हॉटेलमध्ये सोडले होते. पहाटे 5 वाजता शूट होते. त्यामुळे त्यांना खूप लवकर उठून तयार व्हावे लागले. त्या हलक्या अंधारात सेटवर आल्या आणि तमिळमध्ये म्हणाल्या, ‘अय्यो, अय्यो, मी मरते आहे. तुम्ही मला खूप त्रास देत आहात.’ पण कॅमेरा सुरू होताच तिने जो अभिनय आणि नृत्य केले ते खूपच सुंदर होते. ब्रिंदा यांनी पुढे सांगितले की, तिच्या त्या परफॉर्मन्सकडे सगळेच स्तब्ध होऊन पाहत होते. अगदी सहकलाकार Mohanlal देखील तिच्या नृत्याकडे पाहत राहिले.

मिस वर्ल्डपूर्वीची पहिली भेट

ब्रिंदा मास्टर यांनी ऐश्वर्याशी झालेल्या पहिल्या भेटीची आठवणही सांगितली. त्या म्हणाल्या की, ही भेट Filmfare कार्यक्रमाच्या वेळी झाली होती, तेव्हा ऐश्वर्या ‘मिस वर्ल्ड’ही झाली नव्हती. त्या काळात तिने Pepsi च्या जाहिरातीत काम केले होते आणि तरुणांमध्ये तिची प्रचंड क्रेझ होती.

ब्रिंदा म्हणाल्या, ‘फिल्मफेअरच्या सरावादरम्यान ती माझ्याकडे आली आणि म्हणाली, ‘तू खूप छान डान्स केला आहेस.’ मला माहित नाही त्यांना आज ते आठवत असेल की नाही पण त्या कौतुकामुळे मी खूप आनंदी झाले होते. बाकीचे मुले मात्र जळत होते, कारण त्या आमच्याकडे लक्ष देत नव्हत्या.’

‘इरुवर’मधील दमदार स्टारकास्ट

‘इरुवर’ या चित्रपटात मोहनलाल यांच्यासोबत प्रकाश राज, ऐश्वर्या राय, रेवती, गौतमी आणि तब्बू यांचीही प्रमुख भूमिका होती. या चित्रपटातून ऐश्वर्याच्या अभिनयाची आणि नृत्यकौशल्याची झलक प्रेक्षकांना पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाली.