मुंबई: शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाने वर्षाच्या सुरुवातीलाच दमदार कामगिरी केली. गेल्या वर्षी बॉलिवूडचे बरेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटले. त्यामुळे ‘पठाण’कडून चाहत्यांना बरीच अपेक्षा होती. अखेर याच चित्रपटामुळे बॉलिवूडचा जणू नवसंजीवनी मिळाली. याच वेळी दाक्षिणात्य प्रेक्षकांनाही पोंगलच्या मुहूर्तावर दोन धमाकेदार चित्रपटांची भेट मिळाली. वारिसु आणि थुनिवू हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले आणि शाहरुखचा ‘पठाण’सुद्धा या साऊथच्या चित्रपटांना मागे टाकू शकला नाही.