भारत-पाकिस्तान तणावादरम्यान आलिया भट्टची भावनिक पोस्ट, म्हणाली,”आज रात्री आणि येणाऱ्या अनेक रात्री”

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर आलिया भट्ट यांनी भारतीय सैनिकांसाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी सैनिकांच्या कुटुंबियांना आणि विशेषतः मातांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. या पोस्टने सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया व्हायरल होताना दिसत आहेत.

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान आलिया भट्टची भावनिक पोस्ट, म्हणाली,आज रात्री आणि येणाऱ्या अनेक रात्री
aliya bhatt
Image Credit source: Instagram
Mayuri Sajerao | Updated on: May 13, 2025 | 3:28 PM

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान सामान्यांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत सर्वांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. भारतीय सैन्याबद्दल,मोदींच्या भूमिकेबद्दल सर्वांबद्दल सर्वांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यात आता अभिनेत्री आलिया भट्टची एक पोस्ट व्हायरल होत आहे. तिने भारतीय सैन्यांबद्दल एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.

आलिया भट्टची भारतीय सैनिकांसाठी भावनिक पोस्ट

आलिया भट्टने आता भारताच्या सैनिकांसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. आलियाची ही पोस्ट ऑपरेशन सिंदूर नंतर आली आहे . आलियाने सांगितले की काही रात्री तिच्यासाठी आणि संपूर्ण देशासाठी खूप वेगळ्या होत्या. याशिवाय, आलियाने देशाच्या सैनिकांसाठी, त्यांच्या कुटुंबियांसाठी आणि मातांसाठी एक खास संदेशही लिहिला आहे.

काही रात्री कशा होत्या?

आलियाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘गेल्या काही रात्री खूप वेगळ्या होत्या. जेव्हा एखादा देश श्वास रोखून धरतो तेव्हा हवेत एक प्रकारची शांतता असते आणि गेल्या काही दिवसांत आपल्याला ती शांतता जाणवत आहे. ती शांत चिंता. प्रत्येक बातमीच्या सूचना आणि संभाषणासोबत ताणतणाव वाढतो.”

“काही पुरुष आणि स्त्रिया अंधारात उभे असतात…”

आलियाने पुढे असं म्हटलं आहे की, ‘वारंवार विचार करणे दुःखद आहे की कुठेतरी डोंगरांमध्ये आपले सैनिक जागे, सतर्क आणि धोक्यात आहेत. आपण घरात असताना, काही पुरुष आणि स्त्रिया अंधारात उभे असतात, ज्यांच्यामुळे आपण शांतपणे झोपू शकतो. हे वास्तव आहे, ते तुमच्यावर परिणाम करते कारण तुम्हाला हे समजते की ते फक्त शौर्य नाही. हे त्याग आहे आणि प्रत्येक यूनिफॉर्मच्या मागे एक आई आहे आणि ती झोपतही नाही. आपल्या मुलाला ओळखणारी आई अंगाईगीत ऐकत नाही तर अनिश्चिततेच्या रात्रीचा सामना करत असते”


सैनिकांच्या आईसाठी भावना

आलियाने पुढे लिहिले की, ‘आम्ही रविवारी मदर्स डे साजरा केला . आम्ही फुले देत होतो आणि एकमेकांना मिठी मारत होतो, तेव्हा मी त्या मातांचाही विचार करत होते ज्यांनी आपल्यासाठी जीवन धोक्यात घालणाऱ्या खऱ्या नायकांना वाढवले ​​आहे. आपण त्यांच्यासाठी शोक व्यक्त करत आहोत जे मृत्युमुखी पडले आहेत, ते सैनिक जे कधीही घरी परतणार नाहीत, ज्यांची नावे आता या राष्ट्राच्या आत्म्यात कोरली गेली आहेत. त्यांच्या कुटुंबियांना शक्ती मिळो.”

 पालकांना प्रेम पाठवा

आलियाने शेवटी लिहिले, “तर आज रात्री आणि येणाऱ्या अनेक रात्री, आपण कमी ताणतणाव आणि शांततेतून मिळणारी अधिक शांती मिळण्याची आशा करूया. प्रार्थना करणाऱ्या आणि अश्रू रोखणाऱ्या प्रत्येक पालकांना प्रेम पाठवा कारण तुमची शक्ती या देशाला तुम्ही कल्पनाही करू शकत नाही त्यापेक्षा जास्त पुढे घेऊन जाते. आम्ही एकत्र उभे आहोत. आमच्या रक्षकांसाठी.’

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us