अलिया म्हणते, ‘आम्ही लग्न केलंय’, खरचं लग्न झालय का ? जाणून घ्या

| Updated on: Feb 11, 2022 | 2:03 PM

आतापर्यंत आलिया सोबत माझं लग्न झालं असतं. पंरतु कोरोनाच्या कारणामुळे अजून लग्न झालेलं नाही असं रणवीर कपूरचं म्हणणं आहे.

अलिया म्हणते, आम्ही लग्न केलंय, खरचं लग्न झालय का ? जाणून घ्या
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर (फाईल फोटो)
Follow us on

मुंबई – बॉलिवूड (bollywood) अनेक कारणांनी चर्चेत राहिलेलं आहे, कारण बॉलिवूडच्या कलाकारांची लफड्यावर चर्चा करण्यात अनेकांना रस आहे. त्यामुळे तिथं झालेली चर्चा देखील काहीजण अगदी आवडीने वाचतात. अनेक सेलिब्रिटीचे लाखो चाहते देशात आणि देशाबाहेर सुध्दा पाहायला मिळतात. अनेक सेलिब्रिटींची अफेअर राहिलेली आहेत. तसेच अनेकांनी लग्न सुध्दा केलेली आहेत. रणबीर कपूर (ranbir kapoor)आणि आलिया भट्टचं (aalia  bhat) लग्न केव्हा होणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. कारण अनेक दिवसांपासून दोघे लग्न करणार असल्याची चर्चा आहे. पण स्वत : अलियाने मी रणवीरसोबत लग्न केलं असल्याचे म्हणाल्याने अनेकांच्या भुवय्या उचवल्या देखील आहेत. दोघेही सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असतात. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांनी त्यांना प्रश्न विचाराला देखील सुरूवात केली आहे.

कसं लग्न केलंय तुम्हाला माहिती आहे का ?

अलियाने नुकतीच एनडीटी टिव्हीला मुलाखत दिली. तिथं तिला अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी तिला लग्न केव्हा करणार असाही प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तिने मी तर रणबीरशी केव्हाचं लग्न केलं आहे अस उत्तर दिलं त्यावेळी चाहत्यांच्या मनात अनेक शंका उपस्थित झाल्या असणार, परंतु तिने नंतर मी मनाने त्याच्याशी लग्न केलंय असं म्हणटलं. त्यामुळे दोघांच्यात किती प्रेम आहे लक्षात येतं.

लग्नाबद्दल रणबीर काय म्हणतो

आतापर्यंत आलिया सोबत माझं लग्न झालं असतं. पंरतु कोरोनाच्या कारणामुळे अजून लग्न झालेलं नाही असं रणवीर कपूरचं म्हणणं आहे. मी अलियाला पत्नी म्हणून स्विकारायला केव्हापासून तयार आहे. परंतु कोरोनामुळे आमचं लग्न लांबणीवर पडलं आहे. अलियाने जरी मला मनाने पती मानलं असलं तरी रिअर लाईफ त्यांना अनेकांना पती पत्नी झाल्याचं पाहायचं आहे. तसेच दोघेही येत्या एप्रिल महिन्यात लग्न करणार असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे.

आतापर्यंत बॉलिवूड अनेक कारणांनी चर्चेत आहे. क्रिकेटर आणि अभिनेत्री यांचं पहिल्यापासून एक वेगळ नातं राहिलेलं आहे. तसेच त्यांच्या अफेअरच्या सुध्दा चर्चा अनेकदा राहिलेल्या आहेत. अनेक क्रिकेट खेळाडूंनी अभिनेत्रींशी लग्न सुध्दा केली आहेत. त्याचबरोबर अनेक अभिनेता आणि अभिनेत्रीचं सुध्दा अफेअरनंतर लग्न झालेली आहेत. अनेकांचे ब्रेकअप झाल्याची सुध्दा चर्चा वारंवार तुमच्या कानावर येते. अनेक सेलिब्रिटीचं तर करिअर पेक्षा प्रेम प्रकरणामुळे अधिक प्रसिध्द आहेत.

‘व्हॅलेंटाईन डे’ च्या दिवशी गायत्री दातारचं म्युझिकल गिफ्ट, ‘नको हा बहाणा’म्युझिक अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला येणार

कर्नाटक हिजाब प्रकरणात कंगना रनौतची उडी, म्हणाली, हिंमत असेल तर अफगानिस्तानात…

VIDEO | अलविदा करण्याआधी शेवटचं शूट, सिद्धूसोबत डान्स, रमेश देव यांचे अखेरचे क्षण