
बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन कायमच चर्चेत असणारे नाव आहे. मात्र, जया बच्चन आणि पापाराझी यांचे कायमच खटके उडताना दिसतात. जया बच्चन यांना पापाराझींनी फोटो काढणे अजिबातच पटत नाही. पापाराझींना कोणत्या ना कोणत्या कारणावरून त्या सतत सुनावताना दिसतात. पापाराझी आणि जया बच्चन यांच्यात एकदा नाही तर हजार वेळा वाद झाला. मागच्यावेळी तर जया बच्चन यांनी थेट पापाराझींच्या पॅन्टवर कमेंट केली होती, ज्यानंतर जया बच्चनला टीकेचे धनी होण्याची वेळ आली. आता पुन्हा एकदा पापाराझी फोटो काढत असल्याने जया बच्चन यांना राग अनावर झाला. जया बच्चन पापाराझी फोटो आणि व्हिडीओ काढत असताना भडकल्या आणि खडेबोल सुनावले. हेच नाही तर अमिताभ बच्चन यांनी त्या घटनेनंतर काल रात्री उशीरा सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपला संताप व्यक्त केला.
काल मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने बॉलिवूड सेलिब्रिटी पोहोचले होते. यादरम्यान जया बच्चन काही महिलांसोबत उभे राहून गप्पा मारत होत्या. त्यावेळी पापाराझी त्यांचे फोटो आणि व्हिडीओ काढत होते. जया बच्चन यांना हे पाहून प्रचंड राग आला आणि त्यांनी म्हटले की, बस आता बस… ठीक आहे आता बस आता.. यावेळी जया बच्चन यांच्या चेहऱ्यावर राग स्पष्टपणे दिसत होता.
यादरम्यान करण जोहर तिथे आला आणि जया बच्चन यांना भेटला. जया बच्चन आणि करण जोहर एकमेकांना भेटत असताना पापाराझींनी त्यांचा फोटो काढला. जया बच्चन तिथून निघून जाताच पापाराझी यांना करण जोहर हा म्हणाला की, माझ्यामुळे तुम्हाला फोटो मिळाला. यादरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसला.
जया बच्चन यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाच बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी रात्री उशिरा सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत रागाचे इमोजी शेअर केले. आता चूप म्हणून पोस्ट केली. आता अमिताभ बच्चन यांनी नक्की कशासाठी ही पोस्ट शेअर केली, यावरून विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत.