AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अचानक वारं फिरलं अन् पाऊस गायब, मान्सून कमकुवत का झाला? IMD ने दिली सर्वात मोठी अपडेट

Why Monsoon Weakened : गेल्या दोन दिवसांपासून राज्यासह देशातील अनेक भागातील पाऊस कमी झाला आहे. यामागे काय कारण आहे याबाबत हवामान विभागाने सविस्तर माहिती दिली आहे.

अचानक वारं फिरलं अन् पाऊस गायब, मान्सून कमकुवत का झाला? IMD ने दिली सर्वात मोठी अपडेट
Why Monsoon WeakenedImage Credit source: X IMD
| Updated on: Jul 11, 2026 | 10:38 PM
Share

काही दिवसांपूर्वी धुमाकूळ घालणारा पाऊस आता अचानक कमी झाला आहे. 11 जुलै रोजी समोर आलेल्या उपग्रह छायाचित्रांमध्ये भारतातील सुमारे 70-80 टक्के भागावर पाऊस देणारे ढग अत्यंत कमी किंवा जवळपास गायब झाल्याचे समोर आले आहे. 9 जुलै रोजी नैऋत्य मान्सून संपूर्ण देशभर पोहोचताच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, यामागील प्रमुख कारण म्हणजे भारतापासून हजारो किलोमीटर दूर पश्चिम प्रशांत महासागरात निर्माण झालेले एक शक्तिशाली चक्रीवादळ. यामुळे सध्या मान्सून कमकुवत झाला असून अनेक राज्यांमध्ये पावसाचे प्रमाण घटले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अचानक पाऊस कमी झाला

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू होता. अनेक शहरांमध्ये पाणी साचणे आणि पुरासारखी परिस्थितीही निर्माण झाली होती. मात्र आता हवामानात अचानक बदल झाला आहे. उपग्रह चित्रांमध्ये देशाचा मोठा भाग स्वच्छ दिसत असून अनेक ठिकाणी पाऊस जवळपास थांबला आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात मान्सून कमकुवत झाला का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आता हवामान विभागाने नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे.

मान्सून कमकुवत का झाला?

हिंदी महासागरातून येणाऱ्या दमट वाऱ्यांमुळे देशभर पाऊस पाडतो. मात्र सध्या पश्चिम प्रशांत महासागरात एक शक्तिशाली चक्रीवादळ तयार झाले असून त्याने आर्द्रता आणि वाऱ्यांचा प्रवाह स्वतःकडे खेचून घेतला आहे. याचा थेट परिणाम भारतातील मान्सूनवर झाला आहे. यामुळे मान्सून ट्रफ कमकुवत झाली असून देशाच्या मोठ्या भागात पावसाचे प्रमाण घटले आहे. हवामान विभागानेपुढील काही दिवस मध्य भारत आणि दक्षिण भारतातील अनेक भागांमध्ये कमी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

मान्सूनची संथ सुरूवात

मान्सूनने 9 जुलै रोजी संपूर्ण देश व्यापला. हा नेहमीच्या वेळेपेक्षा फक्त एक दिवस उशिरा पोहोचला. मात्र त्याची सुरुवात कमकुवत झाली होती. जूनअखेरपर्यंत देशात सुमारे 40 टक्के कमी पावसाची नोंद झाली होती, जी अलीकडील वर्षांतील सर्वात कमकुवत सुरुवातींपैकी एक मानली जाते. त्यानंतर जूनच्या अखेरीस आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात अनेक राज्यांमध्ये चांगला पाऊस झाला. मात्र सर्व राज्यांमध्ये समान प्रमाणात पाऊस झाला नाही.

पुढे काय होणार?

हवामान विभागाच्या अंदाजानुसार जुलै महिन्याच्या उर्वरित कालावधीतही देशातील अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. संपूर्ण महिन्यातील पावसाचे प्रमाणही सामान्यपेक्षा कमी राहू शकते. सध्या हवामान तज्ज्ञांचे लक्ष प्रशांत महासागरात निर्माण होत असलेल्या एल-निनो परिस्थितीकडे आहे. जर एल-निनो अधिक तीव्र झाला, तर त्याचा मान्सूनवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पावसाचे प्रमाण आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला