AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘घटस्फोटानंतर मी फार….’ सैफ अली खानसोबतच्या घटस्फोटावर अमृता सिंगने मौन सोडलं

बॉलिवूडमध्ये असे अनेक घटस्फोट असतील जे आजही चर्चेत आहेत आणि महागडेही. असाच एक घटस्फोट म्हणजे सैफ अली खान आणि अमृता सिंग. अभिनेत्री अमृता सिंगने एका मुलाखतीत तिच्या घटस्फोटाबद्दल पहिल्यांदाच सांगितलं आहे.

'घटस्फोटानंतर मी फार....' सैफ अली खानसोबतच्या घटस्फोटावर अमृता सिंगने मौन सोडलं
Amrita Singh Speaks Out, Post-Divorce Life & Saif Ali Khan MarriageImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 17, 2025 | 2:43 PM
Share

बॉलिवूडमध्ये असे अनेक घटस्फोट असतील जे आजही चर्चेत आहेत आणि महागडेही. असाच एक घटस्फोट म्हणजे सैफ अली खान आणि अमृता सिंग. अभिनेत्री अमृता सिंगने बेताब या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 5 ऑगस्ट 1983 रोजी प्रदर्शित झालेल्या बेताब या चित्रपटातून सनी देओलसोबतची तिची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. 2 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. दिल्लीतील रहिवासी अमृता सिंगने अमिताभ बच्चन, अनिल कपूर आणि सलमान खानसोबत काम केले. ऑक्टोबर 1991 मध्ये तिने तिच्यापेक्षा 12 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेता सैफ अली खानशी लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले. 2004 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.

2004 मध्ये दोघांचाही परस्पर संमतीने घटस्फोट झाला

घटस्फोटाबद्दल सैफ अली खान त्याच्या मुलाखतींमध्ये बोललेला आहे. पण बॉलिवूड अभिनेत्री अमृता सिंगने फार क्वचित तिच्या नात्यांबद्दल, घटस्फोटाबद्दल बोलली आहे. एकच अशी मुलाखत आहे ज्यात तिने याबद्दल सांगितलं आहे. दोघांनीही कुटुंब आणि नातेवाईकांना न सांगता लग्न केले. 1995 मध्ये अमृताने मुलगी साराला जन्म दिला. 2004 मध्ये दोघांचाही परस्पर संमतीने घटस्फोट झाला.

चित्रपटांमध्ये काम करून मला कंटाळा आला होता.

लग्नानंतर अमृताने चित्रपटांमध्ये काम करणे बंद केले. याचे कारण स्पष्ट करताना अमृता म्हणाली होती की, ‘त्या वेळी माझ्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी माझे घर आणि मुले होती. लग्नानंतर मी काही वर्षे काम केलं. मला काहीतरी वेगळं करायचं होतं. चित्रपटांमध्ये काम करून मला कंटाळा आला होता. जेव्हा मी पहिल्यांदा प्रेग्नंट राहिले तेव्हा मी ठरवलं होतं की मी आता काम करणार नाही. मी इंडस्ट्री सोडली. माझ्या मनात एका आनंदी कुटुंबाचे चित्र होते. लग्न हा त्या आनंदी चित्राचा एक भाग होता. जेव्हा मुलं जन्माला आलं तेव्हा मला वाटलं की त्यांना माझी जास्त गरज आहे. नंतर गोष्टी खूप वेगाने बदलल्या. या गोष्टी स्वतःहून घडतात, तुम्हाला ते कळतही नाही. मला इंडस्ट्री सोडल्याचा अजिबात पश्चात्ताप नाही’

‘मीही इतर महिलांसारखीच आहे’

पुढे अमृता म्हणाली, ‘मीही इतर महिलांसारखीच आहे. लग्नानंतर मी बेफिकीर झाले होते. महिलांना सवय असते. लग्नानंतर घरच्या जबाबदाऱ्या येतात. मला दोन मुले आहेत आणि आयुष्यात मला आणखी काय हवं आहे. मी असा विचार करू लागलो होते. हो, स्त्रीने चांगले दिसणे आणि काही गोष्टी सांभाळणे महत्त्वाचे आहे. सैफ कधीही याबाबत बोलत नव्हता किंवा जज करत नव्हता. तो स्वतःला तंदुरुस्त ठेवायचा. तो जिममध्ये जायचा. मी देखील पुन्हा काम करायला सुरुवात केली. मी माझे 15 किलो वजनही कमी केले.’

“घटस्फोटाचे दुःख याच्या तुलनेत काहीच नाही.”

अमृता यांनी त्यांच्या आईच्या मृत्यूचे वर्णन घटस्फोटापेक्षाही त्यांच्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ असल्याचे सांगितले. ती म्हणाली, “जेव्हा माझी आई गेली, तेव्हा तो माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ होता. मी माझ्या आईच्या जवळ होते. तिच्या मृत्यूनंतर मी पूर्णपणे तुटले होते. मला भावंडे नाहीत. मी माझ्या आईसोबत राहत होते. जेव्हा इब्राहिमचा जन्म झाला तेव्हा तो खूप आजारी पडला. हा माझ्या आयुष्यातील दुसरा सर्वात कठीण काळ होता. घटस्फोटाचे दुःख याच्या तुलनेत काहीच नाही.”

‘घटस्फोटानंतर मला कामाची गरज होती’

अभिनेत्री म्हणाली, ‘घटस्फोटानंतर मला कामाची गरज होती. मला मानसिक आणि आर्थिक आधाराची गरज होती. मला दोन मुले होती. मला निराश होऊन घरी बसायचे नव्हते. मी पुन्हा काम करण्याचा निर्णय घेतला. मी खूप आळशी आहे. माझ्याकडे जे काही होते त्यात मी समाधानी होते. सर्वप्रथम, मला या टप्प्यातून बाहेर पडावे लागले. अभिनय सोडल्याबद्दल मला अजिबात पश्चात्ताप नाही. लग्न ही प्रत्येक महिलेच्या आयुष्यात खूप महत्त्वाची गोष्ट आहे. लग्न करण्याचा अनुभव माझ्यासाठी खूप छान होता. मला दोन सुंदर मुले आहेत. माझे लग्न यशस्वी झाले नाही, मला त्याचा अजिबात पश्चात्ताप नाही. माझ्या 12 वर्षांच्या वैवाहिक आयुष्यात मला खूप काही मिळालं आहे.’

मानसिक स्थितीशी संघर्ष करावा लागला

अमृता पुढे म्हणाल्या, ‘घटस्फोटानंतर, सर्वप्रथम मला माझ्या मानसिक स्थितीशी संघर्ष करावा लागला. नंतर मला माझ्या तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित करावे लागले. माझ्या मुलांनी मला परिस्थितीसमोर पराभूत झालेले पाहू नये असे मला वाटत होते. घटस्फोटामुळे मी खूप दुःखी होते. आता मी काही प्रकारे माझ्या आयुष्यात आनंदी आहे आणि काही प्रकारे दुःखी आहे. ” तसेच तिने पुन्हा लग्न करण्याची गरज नसल्याचंही तिने म्हटलं

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.