
Kangana Ranaut: बॉलिवूड आणि राजकारण एकाच फ्रेममध्ये आलं की, चर्चा तर होणारच.. बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारल्यानंतर अभिनेत्री कंगना राणौत यांनी त्यांच्या मोर्चा राजकारणाकडे वळवळा. पहिल्याच प्रयत्नात कंगना यांनी हिमाचल प्रदेश येथील मंडी मतदार संघातील मतदरांनी त्यांनी वियजी केलं. त्यानंतर कंगना यांचा राजकारणातील प्रवास सुरु झाला. पण खासदार म्हणून निवड झाल्यानंतर एक खासदार असा देखील आहे, ज्याने कंगना यांना पाहिल्यानंतर स्वतःला रस्ता बदलला. दोघांमध्ये असलेल्या खास कनेक्शनच्या देखील चर्चांनी जोर धरला.
सध्या ज्या खासदाराची चर्चा रंगली आहे, ते खासदार दुसरे तिसरे कोणी नाही तर, चिराग पासवान आहे… कंगना आणि चिराग यांची खासदार म्हणून निवड झाल्यानंतर दोघांना अनेक वर्षांनंतर संसदेत स्पॉट करण्यात आलं. त्यानंत दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते. यावर कंगना म्हणालेल्या, ‘चिराग यांच्याबद्दल मला आता प्रचंड प्रश्न विचारले जातात. आता तर मला पाहिल्यानंतर चिराग स्वतःचा रस्ता बदलतात…’, दोघांना लग्नाबद्दल देखील अनेकदा विचारण्यात आलं आहे.
सांगायचं झालं तर, चिराग आणि कंगना दोघांचं करियर प्रचंड भक्कम आहे आणि दोघे अविवाहित देखील आहेत. दोघांची मैत्री देखील चांगली असल्यामुळे अनेकांनी त्यांनी ‘पावर कपल’ म्हणण्यास देखील सुरुवात केली. दोघांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर, त्यावर अनेक कमेंट आणि मिम्स देखील तयार करण्यात आल्या..
चिराग यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता होण्याचं त्यांचं स्वप्न होतं. कंगना राणौत यांच्यासोबत चिराग यांनी ‘मिले ना मिले हम’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमा 2011 मध्ये प्रदर्शित झालेला. पण बॉक्स ऑफिसवर सिनेमा फ्लॉप ठरला… त्यानंतर चिराद यांनी राजकारण स्वतःचं करियर घडवलं. सिनेमा फ्लॉप ठरला, पण जेव्हा दोघांनी एकत्र संसदेत पाय ठेवला, तेव्हा पुन्हा सिनेमाची चर्चा रंगू लागली. सोशल मीडियावर देखील सिनेमाचे अनेक सीन व्हायरल झाले.
कंगना यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, कायम वादाच्या भोवऱ्यात राहणाऱ्या कंगना स्वतःची स्पष्ट भूमिका मांडत असतात. यामुळे अनेकदा त्यांना मोठी किंमत देखील मोजाली लागली आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींवर देखील कंगना यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगना कायम स्वतःचं मांडत असतात.