Samanthaने नाग चैतन्यसोबतचं उरलं सुरलं नातंही संपवलं; यावेळी तिने..

ऑक्टोबर 2021 मध्ये टॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वांत लोकप्रिय जोडी विभक्त झाली. समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu)आणि नाग चैतन्यच्या (Naga Chaitanya) घटस्फोटाच्या वृत्ताने सर्वांनाच धक्का बसला. चार वर्षांच्या संसारानंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटाच्या कारणांवरून सोशल मीडियावर अनेकदा चर्चा झाल्या.

Samanthaने नाग चैतन्यसोबतचं उरलं सुरलं नातंही संपवलं; यावेळी तिने..
Follow us
| Updated on: Mar 23, 2022 | 3:31 PM

ऑक्टोबर 2021 मध्ये टॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वांत लोकप्रिय जोडी विभक्त झाली. समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu)आणि नाग चैतन्यच्या (Naga Chaitanya) घटस्फोटाच्या वृत्ताने सर्वांनाच धक्का बसला. चार वर्षांच्या संसारानंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटाच्या कारणांवरून सोशल मीडियावर अनेकदा चर्चा झाल्या. मात्र या दोघांमध्ये नेमकं कुठे बिनसलं, हे निश्चितपणे अद्यापही समोर आलं नाही. समंथा वेळोवेळी सोशल मीडियाद्वारे कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्षपणे तिच्या नात्याविषयी व्यक्त झाली. आता तिने नाग चैतन्यसोबतचं उरलं सुरलेलं नातंही संपवलं आहे. समंथाने तिच्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवरील त्याच्यासोबतचे सर्व फोटो काढून टाकले आहेत. त्याचसोबत त्याला अनफॉलो केलं आहे. अनफॉलो केल्यानंतर तिने स्टोरीमध्ये एक पोस्ट लिहिली आहे.

‘कधीकधी, आपल्या आतील सामर्थ्य ही सर्वांना दिसू शकेल अशी मोठी ज्योत नसते. कधी कधी, ती फक्त एक छोटीशी ठिणगी असते, जी हळूच तुम्हाला म्हणते.. पुढे चालत रहा, तुम्ही हे करू शकाल,’ अशा आशयाची पोस्ट तिने स्टोरीमध्ये लिहिली आहे. नाग चैतन्यबाबतच तिने ही पोस्ट लिहिली असावी, असा अंदाज चाहत्यांनी वर्तवला आहे. समंथाने नाग चैतन्यला अनफॉलो केलं असलं तरी नाग चैतन्य तिला अजूनही इन्स्टाग्रामवर फॉलो करत आहे. त्याने त्याच्या अकाऊंटवरील तिच्यासोबतचे फोटोसुद्धा डिलिट केले नाहीत.

नाग चैतन्यच्या अकाऊंटवरील समंथासोबतचा फोटो-

नाग चैतन्यची प्रतिक्रिया-

घटस्फोटानंतर नाग चैतन्यने बराच काळ मौन बाळगलं होतं. घटस्फोटाच्या तीन महिन्यांनंतर एका मुलाखतीत तो याविषयी म्हणाला, “आम्ही दोघांनी परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. मला यात काहीच वाईट वाटत नाही. जर ती खूश असेल तर मीसुद्धा खूश आहे. अशा परिस्थितीत घटस्फोट हाच निर्णय मला योग्य वाटतो.”

विभक्त झाल्यानंतर समंथावर सोशल मीडियावरून अनेक आरोप करण्यात आले होते. विवाहबाह्य संबंध, गर्भपात यांसारखे गंभीर आरोप तिच्यावर झाले. याविषयी एका पोस्टद्वारे तिनं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं होतं. ‘ते म्हणतात माझं अफेअर होतं, मला मूल नको होतं, मी गर्भपात केलाय, मी संधीसाधू आहे. तुम्हाला सांगू इच्छिते की घटस्फोट हा अत्यंत क्लेशकारक असतो. त्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी मला थोडा तरी वेळ द्या. माझ्या खासगी आयुष्यावर होणारे हे आरोप अत्यंत वाईट आहेत. या आरोपांमुळे मी खचून जाणार नाही’, असं तिने लिहिलं होतं.

हेही वाचा:

“The Kashmir Files साठी लता मंगेशकरांनी…”; अखेर विवेक अग्निहोत्रींनी चर्चांना दिला पूर्णविराम

The Kashmir Filesची कमाई काश्मिरी पंडितांना देण्याचा सल्ला देणाऱ्या IAS अधिकाऱ्याला विवेक अग्निहोत्रींचं उत्तर..

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.