मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) आणि वाद हे समीकरण फार पूर्वीपासून चालत आलेले आहे. स्वरा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. विषय कोणताही असो स्वरा आपले मत मांडायला आणि पंगा घ्यायला अजिबात घाबरत नाही. परिणामी अनेकदा स्वराला टीकेचा (Criticism) सामनाही करावा लागतो. बऱ्याचवेळा तर आपल्या बेधडक शैलीसाठीमुळे स्वराला त्रासही होतो. आता करण जोहरवर (Karan Johar) स्वराने अत्यंत मोठे विधान केले आहे. यामुळे पुन्हा एकदा स्वराचे नाव चर्चेत आलंय.
स्वराने नुकताच ‘बॉयकॉट ट्रेंड’वर आपले मत मांडले आहे. इतकेच नाही तर स्वरा यावर बिनधास्त बोलली आहे. दरवेळी सर्वांसोबत पंगे घेणारी स्वरा यावेळी चक्क करण जोहरची पाठराखण करताना दिसलीये. करण जोहर विरोधात सुरू असलेल्या मोहिमेबद्दल आणि सोशल मीडियावरी ट्रोलिंगबद्दल तिने आपले मत मांडले आहे. निश्चितपणेच स्वराचे हे मत अनेकांच्या पचनी पडणार नाहीये. चला तर स्वरा नेमकी काय म्हणाली आहे हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात.
स्वराने कनेक्ट एफएम कनाडाला एक मुलाखत दिलीये. यावेळी बोलताना स्वरा भास्कर म्हणाली की, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचे मला दु:ख वाटते. सुशांत सिंहच्या मृत्यूला काही लोक करण जोहरला कारणीभूत ठरवतात. सुशांत सिंहच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर ज्याप्रकारे करण जोहरबद्दल ट्रोलिंग सुरू आहे, हे अत्यंत चुकीचे आहे. तुम्ही करण जोहरवर राग व्यक्त करतात, त्याच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकतात, तुम्हाला करण आवडत नाही. मात्र, हे एक सत्य आहे की, करण हा सुशांत सिंह राजपूतचा खुनी नाहीये.