Govinda Song: गोविंदा आणि मीनाक्षी शेषाद्रीचे गाणे, 33 वर्षांनंतरही ठरतेय हिट
गोविंदाने आपल्या चित्रपट कारकिर्दीत अनेक अविस्मरणीय चित्रपट आणि गाणी दिली आहेत. त्याच्याच चित्रपटातील 'आदमी खिलौना है' हे असेच एक गाणे आहे. मीनाक्षी शेषाद्रीसोबतचे हे गाणे आजही लोकप्रिय आहे.

अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री यांनी बुधवारी सोशल मीडियाद्वारे चित्रपट ‘आदमी खिलौना है’च्या शूटींगच्या वेळची आठवण करुन दिली आहे. अभिनेत्रीने या पोस्टद्वारे चित्रपटात चित्रित केलेल्या ‘बहुत जताते हो, चाह हमसे’ या गाण्यामागील कहाणी सांगितली. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट केला, ज्यात त्या ‘बहुत जताते हो, चाह हमसे’ या गाण्यावर डान्स करत आहेत.
व्हिडिओमध्ये अभिनेत्री उत्कृष्ट हावभाव आणि डान्स करताना दिसत आहेत. अभिनेत्रीने व्हिडिओ पोस्ट करून, “हे खूपच सुंदर रोमँटिक गाणे आहे. हे गाणे माझा चित्रपट ‘आदमी खिलौना है’मधले आहे. महाबळेश्वरच्या सुंदर दऱ्याखोऱ्यांत हे गाणे चित्रित करण्यात आले होते. नदीम-श्रवण यांचे हे गीत खूप आवडले. ते पुन्हा चित्रित करण्यात खूप मजा आली” असे कॅप्शन दिले आहे.
33 वर्षांनंतही गाण्याची क्रेझ कायम
अभिनेत्रीच्या या व्हिडिओने फॅन्सना जुन्या दिवसांची आठवण करून दिली. ‘बहुत जताते हो, चाह हमसे’ या गाण्याबद्दल बोलायचे झाले तर हे १९९३ सालच्या बॉलिवूड चित्रपट ‘आदमी खिलौना है’चे एक अत्यंत प्रसिद्ध रोमँटिक गाणे आहे. या गाण्याला प्रसिद्ध गायक मोहम्मद अझीज आणि अल्का याग्निक यांनी आवाज दिला होता आणि त्याचे बोल समीर यांनी लिहिले होते. याचे संगीत नदीम-श्रवण या प्रसिद्ध जोडीने तयार केले होते. हे गाणे प्रेम, आपुलकी आणि मनात दडलेल्या भावना व्यक्त करते. त्याचे बोल प्रेमी-प्रेयसीमधील गोड भावना, तक्रार आणि एकमेकांसोबत जगण्याची प्रतिबद्धता दर्शवतात. ९० च्या दशकातील हे मेलोडी सॉन्ग आजही मधूर संगीतासाठी आवडते.
काय आहे चित्रपटाची कथा?
१९९३ मध्ये रिलीज झालेल्या कौटुंबिक आणि भावनिक हिंदी ड्रामा चित्रपट ‘आदमी खिलौना है’चे दिग्दर्शन जे. ओम प्रकाश यांनी केले होते. संगीत नदीम-श्रवण यांनी दिले होते. या चित्रपटात जितेंद्र, गोविंदा, रीना रॉय आणि मीनाक्षी शेषाद्री यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटाची कहाणी कौटुंबिक त्याग आणि नात्यांच्या गुंत्यात आधारित आहे. विजय (जितेंद्र) आणि गंगा (रीना रॉय) हे एक सुखी जोडपे आहेत जे विजयचा धाकटा भाऊ शरद (गोविंदा) सोबत राहतात. जेव्हा हे समजते की शरदची पत्नी पूनम (मीनाक्षी शेषाद्री) मूल जन्माला घालू शकत नाही, तेव्हा गंगा एक मोठा त्याग करते आणि आपले मूल पूनमला देऊन टाकते. त्यानंतर कुटुंबात सुरू होणाऱ्या भावनिक चढ-उतार आणि गैरसमजुतींची कहाणीच या चित्रपटाचा मुख्य सार आहे.