Hanuman Ansh चे आणखी दोन भाग येणार, विराट-अनुष्काची एन्ट्री होणार? निर्मात्यांनी दिलं स्पष्टीकरण

Hanuman Ansh Movie Part 2: 'हनुमान अंश' आता ब्लॉकबस्टर ठरला आहे. चित्रपट सातत्याने दमदार कमाई करत असून, याचदरम्यान निर्मात्यांनी त्याच्या सिक्वेलची घोषणा केली आहे.

Hanuman Ansh चे आणखी दोन भाग येणार, विराट-अनुष्काची एन्ट्री होणार? निर्मात्यांनी दिलं स्पष्टीकरण
| Updated on: Sep 11, 2026 | 8:50 AM

बॉलिवूड चित्रपट ‘हनुमान अंश’ सध्या बॉक्स ऑफिसवर प्रचंड लक्ष वेधून घेत आहे. प्रदर्शित झाल्यापासून, चित्रपटाच्या कमाईची सतत चर्चा होत आहे आणि निर्मात्यांचा आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रचंड प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर, प्रेक्षकांचे लक्ष आता त्याच्या सिक्वेलवर लागले आहे. विशेष म्हणजे, चित्रपटाची कथा सुरुवातीला एकच चित्रपट म्हणून तयार केली नव्हती. निर्मात्यांनी तीन चित्रपटांची एक मोठी सीरिजची बनवण्याचा प्लान होता. चित्रपटाच्या निर्मात्या, नम्रता सिंग यांनी आता ही योजना उघड केली आहे.

चित्रपटाचे चाहते दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत असताना, निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे की पटकथेवर काम अद्याप सुरू झालेले नाही. कथा योग्यरित्या विकसित करण्यासाठी टीमला काही वेळ हवा आहे. टीम गेल्या दीड वर्षापासून एकही दिवस सुट्टी न घेता सतत काम करत आहे. परिणामी, निर्मात्यांनी काम पुन्हा सुरू करण्यापूर्वी अंदाजे ९० दिवसांचा ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. टीमच्या मनात कथेची रूपरेषा आधीच तयार आहे. ”

दुसऱ्या भागात मोठे स्टार्स दिसणार का?

नीम करोली बाबांचा प्रभाव केवळ सामान्य भक्तांपुरता मर्यादित नाही. अनेक देशी आणि आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटीसुद्धा त्यांच्याशी संबंधित आहेत. यामध्ये हॉलिवूड अभिनेत्री ज्युलिया रॉबर्ट्स, तसेच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांसारख्या नावांचा समावेश आहे. जेव्हा नम्रता सिंग यांना विचारण्यात आले की, असे सेलिब्रिटी चित्रपटाच्या पुढील भागात दिसू शकतात का, तेव्हा त्यांनी सांगितले की “टीमने काही लोकांशी संपर्क साधला आहे. यापैकी काही लोकांना चित्रपटाबद्दल आधीच माहिती होती.  कोणत्याही विशिष्ट सेलिब्रिटीच्या कॅमिओबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.”

नम्रता सिंग यांनी सांगितले की, “त्या आणि लेखक विशाल चतुर्वेदी हे महाराजजींशी खूप काळापासून जोडलेले आहेत.” नम्रता सुमारे १४ वर्षांपासून त्यांच्या भक्त आहेत, तर विशाल जवळपास २० वर्षांपासून त्यांचे भक्त आहेत. निर्मात्यांचा उद्देश केवळ एका संताची कथा सांगणे हा नाही, तर त्यांचा आध्यात्मिक वारसा जगासमोर आणणे हा आहे. तिसऱ्या भागात, नीम करोली बाबांच्या शिकवणी आणि आध्यात्मिक प्रभावाने भारताबाहेरील लोकांवर कसा परिणाम केला आहे, यावर लक्ष केंद्रित केले जाईल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us