
बॉलिवूड अभिनेता सलमान खान त्याच्या खासगी आयुष्यामुळे एकेकाळी प्रचंड चर्चेत राहिला. ऐश्वर्या राय आणि सलमान खानचे एका वाईट वळणार ब्रेकअप झाले. हेच नाही तर सलमान खान ऐश्वर्याला मारहाण करत आणि तिच्या चित्रपटांच्या सेटवर येऊन गोंधळ घालत असल्याचाही आरोप केला जातो. आता नुकताच अनेक वर्षानंतर सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्याबद्दल अत्यंत जवळच्या एका व्यक्तीने मोठा खुलासा केला. त्यावेळी काय घडले हे देखील स्पष्टपणे सांगितले. संगीत दिग्दर्शक इस्माईल दरबार यांनी अलीकडेच एक मुलाखत दिली. संजय लीला भन्साळी आणि सलमान खान यांच्या वादावरही त्यांनी भाष्य केले.
भन्साळींसोबत सलमान खानने हम दिल दे चुके सनम या चित्रपटात काम केले. याच चित्रपटात ऐश्वर्या राय देखील होते. हा चित्रपट हीट ठरला. भन्साळींनी देवदास चित्रपटात सलमान खानला घेतले नाही. विक्की लालवानी यांना दिलेल्या मुलाखतीत बोलताना संगीत दिग्दर्शक इस्माईल दरबार यांनी म्हटले की, ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपट हीट ठरल्यानंतरही सलमान खान आणि भन्साळी यांच्यात खटके उडत होती.
भन्साळींनी देवदास चित्रपटामध्ये सलमान खानऐवजी शाहरुख खानला कास्ट केले. तो मोठा धक्का सलमान खानला बसला होता. त्यादरम्यानच ऐश्वर्या राय आणि सलमान खानच्या ब्रेकअपबद्दल सर्वत्र चर्चा सुरू होती आणि बातम्या देखील येत होत्या. ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांच्या ब्रेकअपनंतर आम्हालाही मोठा धक्का बसला आणि वाईट वाटले. ते दोघे खूप जास्त जवळ होते. मला वाटते की, त्यांनी भांडायला नव्हते पाहिजे.
पण ठीक आहे हा सर्वकाही आता भूतकाळ आहे. सलमान खान देखील समजदार आहे, तो देखील यावर कधीच काही बोलत नाही. सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचे ब्रेकअप बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत राहिलेले ब्रेकअप नक्कीच आहे. सलमान खान याच्यासोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याने काही वर्षात अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केले. विशेष म्हणजे ऐश्वर्या आणि अभिषेक यांची एक मुलगी असून तिचे नाव आराध्या बच्चन आहे.