AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kapil Sharma : ‘द कपिल शर्मा शो’ पुन्हा एकदा लोकांना हसवण्यासाठी सज्ज, नव्या कलाकारांचीही एन्ट्री होणार!

'द कपिल शर्मा शो' पुन्हा एकदा प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झालाय. काही दिवसांपूर्वी हा शो ऑफ एयर करण्यात आला होता. नव्या शोमध्ये काही नवे क्रिएटिव्ह लोक दिसतील, अशी माहिती कपिलने दिली आहे.

Kapil Sharma : 'द कपिल शर्मा शो' पुन्हा एकदा लोकांना हसवण्यासाठी सज्ज, नव्या कलाकारांचीही एन्ट्री होणार!
| Updated on: Mar 25, 2021 | 10:40 PM
Share

मुंबई : कॉमेडियन कपिश शर्मा आपला कॉमेडी चॅट शो ‘द कपिल शर्मा शो’ पुन्हा एकदा प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झालाय. काही दिवसांपूर्वी हा शो ऑफ एयर करण्यात आला होता. नव्या शोमध्ये काही नवे क्रिएटिव्ह लोक दिसतील, अशी माहिती कपिलने दिली आहे. शो मध्ये आधीपासूनच कृष्णा अभिषेक, किकू शारदा, भारती सिंह, सुमोना चक्रवर्ती, चंदन प्रभाकर आणि अर्चना पूरन सिंह आहेत. अशावेळी कपिलला नव्या सिजनमध्ये अधिक कलाकार आणि स्क्रिप्ट रायटर्स जोडले जाण्याची आशा आहे.(The Kapil Sharma Show will launched with new vast and script writers)

नवं टॅलेंट, नवे कलाकार जोडले जाणार

द कपिल शर्मा शो मध्ये नवं टॅलेंट, नवे कलाकार आणि नवे स्क्रिप्ट रायटर्सचं स्वागत करण्यासाठी मी उत्साहीत आणि आनंदी आहे. एन्टरटेन्मेंटसाठी खरी इच्छा दाखवणारे आणि समान विचारधारा असलेले टॅलेंटेड लोकांना भेटण्यासाठी मी उत्सुक आहे, असं कपिल शर्माने म्हटलंय. कपिल शर्मा शोचं प्रॉडक्शन सलमान खान टेलीव्हिजन आणि Banijay Asia कडून केलं जातं.

सलमान खान टेलीव्हिजनचे सीईओ नदीम कोरीशी यांनी सांगितलं की, ‘कपिल शर्मा आणि त्यांच्या शोचे अन्य कलाकार देशभरात या शोमुळे ओळखले जातात. आम्ही प्रेक्षकांना काही नावीन्यपूर्ण आणि रोमांचक देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहोत. टीमचे आताचे आणि नव्याने जोडले जाणाऱ्या सर्व लोकांचा उद्देश्य हा फक्त मनोरंजन असणार आहे’.

कपिल शर्मा शो अचानक बंद

भारतातील लोकप्रिय शोपैकी एक असणारा ‘द कपिल शर्मा’ (The Kapil Sharma Show’) 31 जानेवारीपासून बंद झाला आहे. 1 फेब्रुवारीला शो टिव्हीवर दाखवण्यात आला नाही. याबद्दल ‘द कपिल शर्माच्या शोमधील कलाकारांनी अगोदरच कल्पना दिली होती. मात्र, प्रेक्षकांकडून निरोप घेताना कपिलने कोणताही फिनाले ठेवला नाही यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. परंतू असेही सांगितले जात आहे की हा शो परत एकदा टीव्हीवर येऊ शकतो. पण यामध्ये शोचे जुनेच भाग दाखवले जातील. कपिलच्या शो अचानक बंद झाल्यामुळे बरेच प्रश्नही निर्माण झाले आहेत. दरम्यान, एका चाहत्याने कपिलला शो बंद होण्याचे कारण विचारले होते, त्यावेळी कपिल म्हणाला होता की, लवकरच आम्ही पुन्हा एकदा पालक बनणार आहोत त्यामुळे मला माझ्या पत्नीला वेळ द्यायचा आहे.

इतर बातम्या :

Disha Patani | सोशल मीडियावर बिकिनी फोटो शेअर करताच ट्रोल झाली दिशा पाटनी, पहा काय म्हणाले नेटकरी…

Gauri Khan | गौरी खानचा ग्लॅमरस अंदाज, शाहरुख खानच्या पत्नीचे ‘हे’ फोटो पाहून चाहतेही म्हणाले ‘व्वा!’

The Kapil Sharma Show will launched with new vast and script writers

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.