
असे काही हॉरर चित्रपट आहेत ज्यांची चर्चा आजही होते. त्यातील एक म्हणजे ‘रागिनी MMS’. हा चित्रपट आजही लोकांच्या पसंतीच्या लिस्टमध्ये आहे. 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रागिनी एमएमएस’ मध्ये राजकुमार राव आणि कैनाज मोतीवाला हे कलाकार दिसले होते.’
या चित्रपटाच्या यशानंतर या चित्रपटाचा सीक्वल काढण्यात आला. या दुसऱ्या चित्रपटाची कथा ही थोडी वेगळी आहे. यात मुख्य म्हणजे सनी लिओनी असल्यामुळे या चित्रपटाची जरा जास्तच चर्चा झाली होती.
रागिनी MMS 2 मधील चर्चेत आलेला बाथरुम सीन
रागिनी MMS 2 मधीलS 2 मधील सीनही प्रचंड चर्चेत आले होते. त्यातील एक सीन म्हणजे बाथरुम सीन. या सीनमुळे बिगबॉस 18 विजेता अन् लोकप्रिय अभिनेता करण वीर मेहरा चर्चेत आला होता. या सीनबद्दल नुकत्याच एका मुलाखतीमध्ये करणने खुलासा केला.
करणवीर मेहरानं सोशल मीडिया इन्फूएन्सल एल्विश यादवच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यानं त्याच्या खासगी आयुष्यासोबत त्याच्या कामाबद्दलही चर्चा केली.याचवेळी त्याने सनी लियोनीसोबत ‘रागिनी एमएमएस 2’ मध्ये काम करण्याचा अनुभवही शेअर केला.
या सीनबद्दल नुकत्याच एका मुलाखतीमध्ये करणने खुलासा केला. वीर मेहरानं सोशल मीडिया इन्फूएन्सल एल्विश यादवच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यानं त्याच्या खासगी आयुष्यासोबत त्याच्या कामाबद्दलही चर्चा केली.याचवेळी त्याने सनी लियोनीसोबत ‘रागिनी एमएमएस 2’ मध्ये काम करण्याचा अनुभवही शेअर केला.
‘सीन पाहून माझे मित्र डिप्रेशनमध्ये गेले’
पॉडकास्ट दरम्यान, एल्विशनं करणला त्याचा हॉरर चित्रपट ‘रागिनी एमएमएस 2’ आणि सनी लियोनीसोबत त्याचा बाथरुमचा सीन होता. त्याविषयी एल्विशनं करणला असं विचारलं. त्यावर उत्तर देत एल्विश म्हणाला, एक शॉवर सीन होता. करण मस्करीत पुढे म्हणाला, ‘मी म्हणालो की जेव्हा त्यानं हा सीन त्याच्या मित्रांना दाखवला. तेव्हा त्याचे मित्र डिप्रेशनमध्ये गेले. इतकंच नाही तर चार मित्र अजूनही या धक्क्यातून सावरलेले नाही.’
‘सीन करताना खूप मज्जा आली…’
बाथरुम सीनवर चर्चा करताना सनीसोबत तो सीन करण्यासाठी उपवास ठेवले होते का? असं विचारण्यात आलं. यावर करणनं हसत उत्तर दे म्हटलं “उलट त्या दिवशी मी जेवलो होतो. कारण मला त्या सीनसाठी जास्त एनर्जी हवी होती. तर हा सीन करताना खूप मज्जा आली. जेव्हा मित्रांना तो सीन दाखवला तर त्यांनी मस्करी केली की तू या कामासाठी पैसे पण घेतले? करणनं हे देखील सांगितलं की त्या सीनसाठी अनेक रीटेक झाले होते.’
करण पुढे सांगितले की, सकाळी 11 वाजता शूटिंग सुरु झाली होती आणि रात्री 9 वाजेपर्यंत शूटिंग सुरु होती. दरम्यान हा चित्रपट 2014 मध्ये प्रदर्शित झाला होता. या सीक्वलचं दिग्दर्शन हे भूषण पटेल यांनी केली आहे. चित्रपटात सनी लियोनी आणि करण वीर मेहराशिवाय साहिल प्रेम, परवीन डब्बास, संध्या मृदुल, दिव्या दत्त आणि अनीता हसनंदानी सारखे कलाकार दिसले होते. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला होता. चित्रपटाच्या पहिल्या पार्टप्रमाणे या चित्रपटाला फारशी पसंती मिळाली नाही.