किरण कुमार अभिनेत्याने सांगितलं श्रीदेवीसोबत काम करण्याचा अनुभव ,’त्या कुणाला जास्त जवळ येऊ द्यायच्या नाहीत…’

एका अभिनेत्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत श्रीदेवींसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे. अभिनेत्याने सांगितलं की 'श्रीदेवी कधीच कोणाला फार जवळ येऊ द्यायच्या नाहीत. 

किरण कुमार अभिनेत्याने सांगितलं श्रीदेवीसोबत काम करण्याचा अनुभव ,त्या कुणाला जास्त जवळ येऊ द्यायच्या नाहीत...
Kiran Kumar Recalls Working with Sridevi, She Did not Let Anyone Get Close
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 15, 2025 | 12:59 PM

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी या नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत. कधी चित्रपटांमुळे, तर कधी त्यांच्या सुंदरतेमुळे तर कधी त्यांच्या शिस्तबद्ध वागण्याने. अनेकांनी त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. असाच अनुभव शेअर केला आहे एका बॉलिवूड अभिनेत्याने. या अभिनेत्याने श्रीदेवींसोबत काम केलं आहे. याबद्दलचा अनुभव त्याने सांगितला आहे. अभिनेता म्हणाला की ‘सेटवर त्या प्रचंड काटेकोर असायच्या. आणि त्याकोणालाही जास्त जवळ येऊ द्यायच्या नाही’

अभिनेत्याने श्रीदेवींसोबत काम करण्याचा त्यांचा अनुभव शेअर केला

1992 मध्ये श्रीदेवी आणि अमिताभ बच्चन यांचा ‘खुदा गवाह’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यात दोन्ही स्टार्सची केमिस्ट्री लोकांच्या प्रचंड पसंतीस उतरली. या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता म्हणजे किरण कुमार. किरण यांच्या अभिनयाचे देखील खूप कौतुक झाले होते. सुरुवातीला ही भूमिका दिवंगत अभिनेते अमरीश पुरी यांच्यासाठी लिहिली गेली होती. पण नंतर ती किरण कुमार यांना देण्यात आली. अलीकडेच किरण कुमार यांनी श्रीदेवीसोबत काम करण्याचा त्यांचा अनुभव शेअर केला.

त्या कोणालाही त्यांच्याजवळ येऊ देत नव्हत्या.

एका मुलाखतीत किरण कुमार म्हणाले, ‘श्रीदेवीसोबत माझे सलाम-दुआचे नाते होते. त्या कोणालाही त्यांच्याजवळ येऊ देत नव्हत्या. जेव्हा कोणी तुम्हाला जवळ येऊ देत नाही, तेव्हा तुमचे त्यांच्यासोबत सलाम-दुआचे नाते असते. म्हणून मी सेटवर फक्त त्यांना हाय-हॅलो एवढंच करायचो.’ याशिवाय, किरण कुमार यांनी ‘खुदा गवाह’च्या क्लायमॅक्सच्या शूटिंगदरम्यान श्रीदेवींसोबत झालेल्या संभाषणाची आठवण काढली.

किरण कुमार यांनी कळसाची कहाणी सांगितली

किरण कुमार म्हणाले, ‘क्लायमॅक्समध्ये एक चांगला सीक्वेन्स होता, जिथे मी धावत असतो. अमितजी आणि श्रीदेवी दोन्ही बाजूंनी घोडेस्वारी करत असतात. ते मला उचलतात आणि नंतर एका टेकडीवरून खाली फेकतात. अशा प्रकारे पाशाचा मृत्यू होतो. पण जेव्हा त्यांनी मला उचलले आणि घोड्यावर स्वार होऊन पुढे गेले तेव्हा घोड्याच्या खूराने माझा पायाला दुखापत झाली. ज्यामुळे माझा पाय सुजला होता.’

श्रीदेवी घोड्यावरून खाली उतरल्या आणि …

तो पुढे म्हणाला, ‘शूटनंतर, श्रीदेवी घोड्यावरून खाली उतरल्या आणि म्हणाल्या किरण, तू ठीक आहेस ना? तुझा पाय दुखावला होता’ मी म्हणालो-‘ हो, ठीक आहे. सगळं ठीक होईल’ तर त्या म्हणाल्या ‘की तू काळजी घ्यायला हवी होतीस. या शॉटसाठी तू डुप्लिकेट का घेतला नाहीस? मी म्हणालो मॅडम, तुम्ही मला या शॉटमध्ये उचललं. खूप मजा आली. कृपया काळजी करू नका. खूप खूप धन्यवाद. मॅडमशी हा माझा एकमेव संवाद होता. पण माझ्यासाठी तेवढेच पुरेसे होते.’

2018 मध्ये श्रीदेवी यांचे निधन चटका लावून गेलं

2018 मध्ये श्रीदेवी यांचे निधन झाले. 2017 च्या क्राइम थ्रिलर ‘मॉम’ मधील त्यांच्या शेवटच्या भूमिकेसाठी त्यांना मरणोत्तर नेशनल अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या पश्चात त्यांचे पती तथा निर्माते बोनी कपूर, त्यांच्या मुली जान्हवी कपूर आणि खुशी कपूर आहेत. आज या दोघीही अभिनयाच्या जगात आपलं नाव कमावताना दिसत आहे.