AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर सयाजी शिंदे यांची मोठी प्रतिक्रिया, विद्यार्थ्यांबद्दल म्हणाले…

NEET पेपरफुटीनंतर जवळपास 20 विद्यार्थ्यांनी स्वतःचं आयु्ष्य संपवलं. त्यानंतर केंद्रिय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. ज्यामुळे सीजेपी आंदोलकांनी जंतरमंतर पासून संसदेपर्यंत मोर्चा पुकारला. पण यादरम्यान विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. आता यावर मराठी अभिनेते सयाजी शिंदे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर सयाजी शिंदे यांची मोठी प्रतिक्रिया, विद्यार्थ्यांबद्दल म्हणाले...
Sayaji Shinde
| Updated on: Jul 22, 2026 | 11:01 AM
Share

विद्यार्थी त्यांच्या हक्कांसाठी, न्याय मिळण्यासाठी रस्त्यावर उतरले आहे. पण त्यांच्यावर लाठीचार्ज होत असल्यामुळे देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलेल्या तरुणांची प्रमुख मागणी केंद्रिय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि शिक्षण व्यवस्थेत सुधारणा साझी पहिजे… अशी आहे. अशात विद्यार्थ्यांच्या समर्थासाठी संपूर्ण देश पुढे आलं आहे. राजकीय पक्ष, सेलिब्रिटी देखील तरुणांचं समर्थन करत, लढा जारी ठेवा असं सांगत असताना, मराठी अभिनेते सयाजी शिंदे यांनी केंद्रिय धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर मोठी प्रतिक्रिया दिला आहे. शिवाय मुलांना मारायला नको होतं.. असं देखील सयाजी शिंदे म्हणाले आहेत.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत, तरुणांवर झालेल्या लाठीचारावर सयाजी शिंदे म्हणाले, ‘आपल्याच माणसाने आपल्यावरच लाठीचार्ज करणं योग्य नाही. शेवटी ही आपलीच माणसं आहेत… ती आपल्या चांगल्यासाठी, भविष्यासाठी भांडत आहेत. ही लोकशाही आहे, त्यामुळे अशा पद्धतीने लाठीचार्ज नव्हता करायला पाहिजे. सरकारने विद्यार्थ्यांचा विश्वास निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण केली पाहिजे, म्हणजे आता सध्या जी परिस्थिती आहे, ती टळेल…’

पुढे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर सयाजी शिंदे म्हणाले, ‘राजीनामा म्हणजे सिस्टिम बदलली पाहिजे. ती व्यक्ती बदलली पाहिजे. कारण त्यांनी काय होत आहे, याकडे लक्ष दिलं नाही. चांगली सर्व्हिस मिळावी म्हणून आपण सरकारला निवडून देतो, त्यामुळे, त्यांनी देखील तसं वागलं पाहिजे, मग असे आंदोलन कधीच होणार नाही…’ असं देखील सयाजी शिंदे म्हणाले.

सोनम वांगचुक यांच्यावर सयाजी शिंदे यांची प्रतिक्रिया

यावेळी सयाजी शिंदे यांनी सोनम वांगचुक यांच्या कामाचं देखील कौतुक केलं. ‘मी सोनम वांगचुक यांना खरंच मानतो, अशी माणसं फार दुर्मिळ आहेत. मी त्यांना प्रत्यक्ष भेटलोय, बोललोय, आमचे विचार देखील जुळले… असं वाटतं अशी माणसं आपल्यापेक्षा चांगली आहेत आणि अशा माणसांची आपल्या देशाला खरंच गरज आहे… सरकारने या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा… सरकार आपलं असतं, आपण निवडून दिलेलं असतं… त्यामुळे असं चालणार नाही ना…’, असं देखील सयाजी शिंदे म्हणाले.

Follow Us
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा.

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा

बंदुका, ग्रेनेड्स की उघड युद्ध? मुलांविरोधात काय येणार? पवन खेडा यांचा सवाल; तर पोलिसांचा दावा काय?.

बंदुका, ग्रेनेड्स की उघड युद्ध? मुलांविरोधात काय येणार? पवन खेडा यांचा सवाल; तर पोलिसांचा दावा काय?

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !.

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट.

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट