AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pushkar Jog: “दुसऱ्याचं चांगलं झालं नाही पाहिजे हाच विचार ते करतात”; मराठी इंडस्ट्रीबाबत पुष्कर जोगने मांडली खदखद

अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog) याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मराठी चित्रपटसृष्टीत एकता नसल्याचं म्हटलंय. दाक्षिणात्य आणि इतर चित्रपटसृष्टीत मराठीच्या तुलनेत अधिक एकता आहे, असं मत पुष्करने मांडलंय.

Pushkar Jog: दुसऱ्याचं चांगलं झालं नाही पाहिजे हाच विचार ते करतात; मराठी इंडस्ट्रीबाबत पुष्कर जोगने मांडली खदखद
Pushkar JogImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jun 03, 2022 | 9:54 AM
Share

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड आणि दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीतील (South Film Industry) फरकाबद्दलचा वाद सुरू आहे. त्यातच आता मराठी चित्रपटसृष्टीचीही (Marathi film industry) भर पडली आहे. अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog) याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मराठी चित्रपटसृष्टीत एकता नसल्याचं म्हटलंय. दाक्षिणात्य आणि इतर चित्रपटसृष्टीत मराठीच्या तुलनेत अधिक एकता आहे, असं मत पुष्करने मांडलंय. “इतर फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांमध्ये एकता दिसून येते. पण मराठी सिनेसृष्टीत ती एकता नाही. इथे लोक कौतुक करण्यापेक्षा टीकाच अधिक करतात. एखाद्याला मराठी इंडस्ट्रीत काही चांगलं करायचं असेल तर त्याची साथ देणारे खूप कमी असतात”, असं तो म्हणाला.

काय म्हणाला पुष्कर जोग?

“लॉबी आणि ग्रुपिज्म हे सगळीकडेच आहे. त्यावर मात करत तुम्हाला पुढे जावं लागतं. पावनखिंड या चित्रपटाने चांगलं यश मिळवलं होतं. पण त्याच्या यशाचं कौतुक ना मीडियाने किंवा ना फिल्म इंडस्ट्रीतील लोकांनी केलं. त्यांना ईर्षा आहे का? जेव्हा मी स्वत: त्या चित्रपटाविषयी पोस्ट लिहिली, तेव्हा चित्रपटातील कोणत्याच कलाकाराने त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. तो चित्रपट खरंच आवडला म्हणून त्यातील सर्व कलाकारांना टॅग करत मी ती पोस्ट लिहिली होती. हे असंच होतं. इंडस्ट्रीत एकताच नाही. इथे लोकांना याचीच जास्त काळजी असते की दुसऱ्याचं कसं चांगलं नाही झालं पाहिजे. आधी मी असं काही मोकळेपणाने बोलायला घाबरायचो, पण आता नाही”, असं पुष्कर म्हणाला.

इन्स्टा पोस्ट-

मराठी इंडस्ट्रीला आणि त्यातील कलाकारांना दिल्या जाणाऱ्या दुय्यम वागणुकीविषयीही पुष्कर बोलला. “ओटीटी प्लॅटफॉर्म्स किंवा सॅटेलाइटकडून आम्हाला जी किंमत मिळते, ती खूपच कमी असते कारण आम्ही मराठी आहोत. हे असं का आहे? प्रेक्षकांना सिनेमागृहापर्यंत खेचून आणण्यासाठी काहीतरी खूप मोठं करण्याची गरज मराठी इंडस्ट्रीला आहे. 200-300 कोटींची कमाई करणारा, जबरदस्त कथानक असलेला चित्रपट हवा. हे करण्यासाठी सर्वांत आधी इंडस्ट्रीतील लोकांनी एकत्र येणं गरजेचं आहे. तुम्हाला तुमच्याच कंटेटचं आधी कौतुक करावं लागेल,” असं मत त्याने मांडलं.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.