AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नेमके अच्छे दिन कुणाचे? एबीजी शिपयार्ड घोटाळ्यानंतर दिग्दर्शक केदार शिंदे यांचा सवाल

एबीजी शिपयार्ड घोटाळ्यानंतर दिग्दर्शक केदार शिंदे यांनी ट्विटरच्या माध्यमातून नेमके अच्छे दिन कुणाचे? असा सवाल विचारला आहे.

नेमके अच्छे दिन कुणाचे? एबीजी शिपयार्ड घोटाळ्यानंतर दिग्दर्शक केदार शिंदे यांचा सवाल
केदार शिंदे
| Edited By: | Updated on: Feb 15, 2022 | 2:08 PM
Share

मुंबई : एबीजी शिपयार्ड लिमिटेड कंपनीचे (ABG Shipyard) माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ऋषी कमलेश अग्रवाल (Rishi Kamlesh Agrawal) यांनी केलेल्या घोटाळ्याची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. 22 हजार 842 कोटींचा हा घोटाळा चर्चेचा विषय बनला आहे, अश्यात हा घोटाळा करुन कंपनीचे मालक पळून गेल्याचं बोललं जातंय. यावर मराठी दिग्दर्शक केदार शिंदे (Director Kedar Shinde) यांनी ट्विट करत आपलं मत मांडलं आहे. “22 हजार कोटी? म्हणजे नेमके किती शुन्य? एवढा बॅंक fraud करून त्या लोकांनी गुजरातमधून पलायन केलं. साधं घर घ्यायचं तर सामान्य माणसाला हे बॅंकवाले एवढं पेपरवर्क करायला लावतात. त्यात जे घर आहे ते पण तारण ठेवतात. नेमके अच्छे दिन आहेत कोणाचे?” असं केदार शिंदे म्हणाले आहेत.

केदार शिंदे यांचं ट्विट

22 हजार कोटींच्या घोटाळ्यावर केदार शिंदेंनी नाराजी व्यक्त केली आहे. “22 हजार कोटी? म्हणजे नेमके किती शुन्य? एवढा बॅंक fraud करून त्या लोकांनी गुजरातमधून पलायन केलं. साधं घर घ्यायचं तर सामान्य माणसाला हे बॅंकवाले एवढं पेपरवर्क करायला लावतात. त्यात जे घर आहे ते पण तारण ठेवतात. नेमके अच्छे दिन आहेत कोणाचे?” असं केदार शिंदे म्हणाले आहेत.

प्रकरण काय आहे?

एबीजी शिपयार्डने 28 बँकांना 22 हजार 842 कोटी रुपयांना गंडा घातला आहे. दरम्यान, रविवारी स्टेट बँक ऑफ इंडियाने कंपनीविरोधात तक्रार दाखल करून घेण्यात कोणताही निष्काळजीपणा झाला नसल्याचा दावा केला आहे.सीबीआयने कंपनीचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ऋषी कमलेश अग्रवाल यांच्यासह अनेक जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आयसीआयसीआय बँक 28 बँकांच्या संघाची मोट बांधण्यात आघाडीवर होती. दुसरे पाऊल आयडीबीआय बँकेने उचलले होते. मात्र तक्रार दिली ती एसबीआयने. नोव्हेंबर 2019 मध्ये भारतीय स्टेट बँकेने पहिल्यांदा या कंपनीविरोधात सीबीआयकडे तक्रार दाखल केली होती.

संबंधित बातम्या

वडिलांचं उदाहरण देत प्रविण तरडेंचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ‘मुळशी पॅटर्न’ सल्ला, म्हणाले…

सारा अली खान फिटनेससाठी कुठल्या जीममध्ये जाते? पहा तिचे एक्सक्लुझिव्ह फोटो…

Oscar 2022 : काय सांगता…तुम्ही चक्क ऑस्कर 2022 साठी वोट करू शकणार, जाणून घ्या कसे, कधी आणि कुठे वोट करायचे!

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.