नादच खुळा, 90 च्या दशकातील प्रचंड सुपरहिट गाणी, इतकी सुंदर की ऐकताच दिवसभर गुणगुणतात लोक

'नजर के सामने', 'तू मेरी जिंदगी है' सारखी प्रचंड सुपरहिट रोमँटिक गाणी लिहिणारी महिला गायिका. ज्यांची गाणी आजही प्रत्येकजण ऐकतो पण त्यांचं नाव अनेकांना माहिती नाही. कोण आहेत त्या?

नादच खुळा, 90 च्या दशकातील प्रचंड सुपरहिट गाणी, इतकी सुंदर की ऐकताच दिवसभर गुणगुणतात लोक
Image Credit source: Social media
| Updated on: Aug 01, 2026 | 4:10 PM

90 च्या दशकातील हिंदी चित्रपटसृष्टीतील रोमँटिक गाण्यांचा विषय निघाला की कुमार सानू, अलका याज्ञिक, अनुराधा पौडवाल किंवा नदीम-श्रवण यांची नावे आवर्जून घेतली जातात. मात्र, त्या काळातील अनेक अजरामर गाण्यांना आवाज देणाऱ्या गीतकार राणी मलिक यांचे नाव मात्र फार कमी चर्चेत आले. त्यांच्या लेखणीतून जन्माला आलेल्या अनेक गाण्यांनी प्रेम, विरह आणि भावनांना सुंदर शब्द दिले. आजही ही गाणी तितक्याच आवडीने ऐकली जातात.

राणी मलिक यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपटांसाठी गीतलेखन केले. विशेष म्हणजे ‘आशिकी’ या चित्रपटातील अनेक गाजलेल्या गाण्यांचे बोल त्यांनी लिहिले. ‘धीरे-धीरे से मेरी जिंदगी में आना’, ‘नजर के सामने’ आणि ‘तू मेरी जिंदगी है’ ही गाणी आजही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट रोमँटिक गाण्यांमध्ये गणली जातात. कुमार सानू आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील या गाण्यांनी 90 च्या दशकातील प्रेमाची नवी ओळख निर्माण केली.

याशिवाय ‘बाजीगर’ मधील ‘बाजीगर ओ बाजीगर’ या गाण्याने शाहरुख खान आणि काजोल यांच्या जोडीला वेगळीच लोकप्रियता मिळवून दिली. या गाण्यातील भावपूर्ण शब्दांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले.

‘साजन’ चित्रपटातील ‘मेरा दिल भी कितना पागल है’ हे गाणं राणी मलिक यांच्या सर्वाधिक गाजलेल्या गाण्यांपैकी एक मानले जाते. प्रेमभावना व्यक्त करणाऱ्या या गाण्याला आजही प्रचंड लोकप्रियता आहे. त्याचप्रमाणे ‘सड़क’ मधील ‘तुम्हें अपना बनाने की कसम’ हे गाणं आजही विविध नव्या आवृत्त्यांमध्ये आणि कव्हर व्हर्जनमध्ये ऐकायला मिळते.

हृदयाला भिडणारी गाणी

राणी मलिक यांनी ‘दिलवाले’ मधील ‘कितना हसीन चेहरा’, ‘गॅम्बलर’ मधील ‘हम उनसे मोहब्बत करके’, तसेच ‘हाँ मैंने भी प्यार किया’ मधील ‘मुबारक हो तुमको यह शादी तुम्हारी’ यांसारख्या भावनिक आणि लोकप्रिय गाण्यांना शब्द दिले. सुरेल संगीतामुळे ही गाणी आजही संगीतप्रेमींच्या मनात घर करून आहेत.

राणी मलिक यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी प्रेम, विरह आणि नात्यांतील भावना अत्यंत साध्या पण हृदयाला भिडणाऱ्या शब्दांत मांडल्या. त्यामुळे त्यांची गाणी काळाच्या कसोटीवर टिकली असून आजच्या पिढीलाही ती तितकीच भावतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us