AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL: श्रीलंका कसोटी दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या वेळापत्रकात बदल, आता फक्त 3 दिवसांचा होणार सामना

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात पोहोचण्यासाठी भारताला यापुढे प्रत्येक कसोटी सामना महत्त्वाचा आहे. अशा स्थितीत भारतीय संघ यासाठी श्रीलंका दौरा करणार आहे. या दौऱ्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. पण या दौऱ्यापूर्वी एक मोठा बदल करण्यात आला आहे.

IND vs SL: श्रीलंका कसोटी दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या वेळापत्रकात बदल, आता फक्त 3 दिवसांचा होणार सामना
IND vs SL: श्रीलंका कसोटी दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या वेळापत्रकात बदल, आता फक्त 3 दिवसांचा होणार सामनाImage Credit source: PTI
| Updated on: Aug 01, 2026 | 4:26 PM
Share

Ind vs SL Test Series Schedule: भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. 15 ऑगस्टपासून या मालिकेला सुरूवात होणार आहे. ही मालिका भारतासाठी खूपच महत्त्वाची आहे. कारण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या अंतिम फेरीचं गणित सोडवायचं असेल, तर ही मालिका 2-0 ने जिंकणं भाग आहे. अन्यथा भारताचं गणित खूपच किचकट होईल. असं असताना या मालिकेपूर्वी टीम इंडिया लोकल श्रीलंकन इलेव्हनसोबत एक वॉर्म मॅच खेळणार आहे. या सामन्याच्या वेळापत्रकात एक बदल करण्यात आला आहे. या सराव सामन्याचा एक दिवस कमी करण्यात आला आहे. यापूर्वी हा सामना चार दिवसांचा असल्याचं सांगितलं गेलं होतं, पण आता तीन दिवसांचा होणार आहे. हा सराव सामना 7 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट दरम्यान कोलंबोच्या एनसीसी ग्राउंडमध्ये खेळला जाईल. भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यासाठी 4 ऑगस्टला रवाना होणार आहे.

टीम इंडियाला दिली अशी माहिती

बीसीसीआयने संघ निवडीच्या वेळी चार दिवसांचा सराव सामना असेल अशी घोषणा केली होती. पण आता बदल झाल्याची माहिती संघाला दिली गेली आहे. पण या सामन्याचा एक दिवस कमी करण्याचं कारण काय ते अद्याप कळू शकलेलं नाही. पण बीसीसीआय आणि टीम मॅनेजमेंटच्या सूत्रांनी सराव सामन्यात बदल झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. जून महिन्यात भारताने शेवटचा कसोटी सामना खेळला होता. अनौपचारिक कसोटी सामना अफगाणिस्तानविरुद्ध खेळला आणि जिंकला होती. त्यामुळे मागच्या एक महिन्यात कसोटी भारताची तयारी कशी आहे, याचा अंदाज बांधणं कठीण आहे. त्यामुळे हा सराव सामना भारतासाठी महत्त्वाचा आहे. सर्वात चांगली बाब म्हणजे हा वॉर्म अप सामना लाईव्ह टेलिकास्ट केला जाणार आहे.

टीम इंडियाचा श्रीलंका दौरा

  • 3-दिवसीय वॉर्म-अप सामना: 7 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट (एनसीसी ग्राउंड, कोलंबो)
  • पहिला कसोटी सामना: 15 ऑगस्टपासून (गाले इंटरनेशनल स्टेडियम)
  • दुसरा कसोटी सामना : 23 ऑगस्टपासून (एसएससी स्टेडियम, कोलंबो)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत भारताला एकूण 9 सामने खेळायचे आहेत. त्यापैकी 7 सामन्यात विजय मिळवला तर अंतिम फेरीचं तिकीट मिळेल. त्यामुळे ही मालिका किती महत्त्वाची आहे याचा अंदाज येतो.भारतीय श्रीलंकेविरुद्ध 2, न्यूझीलंडविरुद्ध 2 आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यामुळे भारतासमोरचं आव्हान वाटतं तितकं सोपं नाही.

Follow Us
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही...
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा
धनुष्यबाण आमचाच... नाही मिळालं तर गोठवलं जाईल; ठाकरेंचा मोठा दावा
मोठी बातमी! धनुष्यबाण आमचाच... नाही मिळालं तर गोठवलं जाईल; सुप्रीम कोर्टाच्या निकालापूर्वी उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
CJP सह अनेक संस्थांचं टेन्शन वाढलं; विदेशी फंडिंगच्या दाव्यानंतर...
CJP सह अनेक संस्थांचं टेन्शन वाढलं; विदेशी फंडिंगच्या दाव्यानंतर गृहराज्यमंत्र्यांचे थेट आदेश...
आता अजित डोवाल यांचे तरुणांवर मोठे विधान, म्हणाले, तरुणांनी...
Ajit Doval Speech | आता अजित डोवाल यांचे तरुणांवर मोठे विधान, म्हणाले, तरुणांनी...
झुरळ, भरकटलेले म्हणणारे पंतप्रधान मोदी तरुणांची माफी मागणार का?
Uddhav Thackeray | झुरळ, भरकटलेले म्हणणारे पंतप्रधान मोदी तरुणांची माफी मागणार का?; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
137 मिमी पावसानंतर पांजरा नदीला पूर; रातोरात रस्ते पाण्याखाली...
Dhule Rain | 137 मिमी पावसानंतर पांजरा नदीला पूर; रातोरात रस्ते पाण्याखाली, प्रशासनाचा अलर्ट जारी
लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात अमित शाहांचं मोठं वक्तव्य; तरुणांना...
लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात अमित शाहांचं मोठं वक्तव्य; तरुणांना दिलेल्या खास संदेशाची सर्वत्र चर्चा