AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL: श्रीलंका कसोटी दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या वेळापत्रकात बदल, आता फक्त 3 दिवसांचा होणार सामना

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात पोहोचण्यासाठी भारताला यापुढे प्रत्येक कसोटी सामना महत्त्वाचा आहे. अशा स्थितीत भारतीय संघ यासाठी श्रीलंका दौरा करणार आहे. या दौऱ्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. पण या दौऱ्यापूर्वी एक मोठा बदल करण्यात आला आहे.

IND vs SL: श्रीलंका कसोटी दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या वेळापत्रकात बदल, आता फक्त 3 दिवसांचा होणार सामना
IND vs SL: श्रीलंका कसोटी दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या वेळापत्रकात बदल, आता फक्त 3 दिवसांचा होणार सामनाImage Credit source: PTI
| Updated on: Aug 01, 2026 | 4:26 PM
Share

Ind vs SL Test Series Schedule: भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. 15 ऑगस्टपासून या मालिकेला सुरूवात होणार आहे. ही मालिका भारतासाठी खूपच महत्त्वाची आहे. कारण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या अंतिम फेरीचं गणित सोडवायचं असेल, तर ही मालिका 2-0 ने जिंकणं भाग आहे. अन्यथा भारताचं गणित खूपच किचकट होईल. असं असताना या मालिकेपूर्वी टीम इंडिया लोकल श्रीलंकन इलेव्हनसोबत एक वॉर्म मॅच खेळणार आहे. या सामन्याच्या वेळापत्रकात एक बदल करण्यात आला आहे. या सराव सामन्याचा एक दिवस कमी करण्यात आला आहे. यापूर्वी हा सामना चार दिवसांचा असल्याचं सांगितलं गेलं होतं, पण आता तीन दिवसांचा होणार आहे. हा सराव सामना 7 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट दरम्यान कोलंबोच्या एनसीसी ग्राउंडमध्ये खेळला जाईल. भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यासाठी 4 ऑगस्टला रवाना होणार आहे.

टीम इंडियाला दिली अशी माहिती

बीसीसीआयने संघ निवडीच्या वेळी चार दिवसांचा सराव सामना असेल अशी घोषणा केली होती. पण आता बदल झाल्याची माहिती संघाला दिली गेली आहे. पण या सामन्याचा एक दिवस कमी करण्याचं कारण काय ते अद्याप कळू शकलेलं नाही. पण बीसीसीआय आणि टीम मॅनेजमेंटच्या सूत्रांनी सराव सामन्यात बदल झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. जून महिन्यात भारताने शेवटचा कसोटी सामना खेळला होता. अनौपचारिक कसोटी सामना अफगाणिस्तानविरुद्ध खेळला आणि जिंकला होती. त्यामुळे मागच्या एक महिन्यात कसोटी भारताची तयारी कशी आहे, याचा अंदाज बांधणं कठीण आहे. त्यामुळे हा सराव सामना भारतासाठी महत्त्वाचा आहे. सर्वात चांगली बाब म्हणजे हा वॉर्म अप सामना लाईव्ह टेलिकास्ट केला जाणार आहे.

टीम इंडियाचा श्रीलंका दौरा

  • 3-दिवसीय वॉर्म-अप सामना: 7 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट (एनसीसी ग्राउंड, कोलंबो)
  • पहिला कसोटी सामना: 15 ऑगस्टपासून (गाले इंटरनेशनल स्टेडियम)
  • दुसरा कसोटी सामना : 23 ऑगस्टपासून (एसएससी स्टेडियम, कोलंबो)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत भारताला एकूण 9 सामने खेळायचे आहेत. त्यापैकी 7 सामन्यात विजय मिळवला तर अंतिम फेरीचं तिकीट मिळेल. त्यामुळे ही मालिका किती महत्त्वाची आहे याचा अंदाज येतो.भारतीय श्रीलंकेविरुद्ध 2, न्यूझीलंडविरुद्ध 2 आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यामुळे भारतासमोरचं आव्हान वाटतं तितकं सोपं नाही.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल