AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकरी उपाशी अन् नेत्याचा काजू बदामावर ताव, सुषमा अंधारे आक्रमक, थेट शेतातील सोयाबीन दाखवत म्हणाल्या.., Video

राज्यात पावसाने दडी मारली आहे, पाऊस नसल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. विरोधकांकडून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येत आहे. यावर आता सुषमा अंधारे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

शेतकरी उपाशी अन् नेत्याचा काजू बदामावर ताव, सुषमा अंधारे आक्रमक, थेट शेतातील सोयाबीन दाखवत म्हणाल्या.., Video
Sushma AndhareImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 20, 2026 | 7:41 PM
Share

राज्यात पावसाने दडी मारली आहे. गेल्या दीड महिन्यात पाऊस झालेला नाहीये. सुरुवातीचे दोन महिने सोडले तर यंदा संपूर्ण पावसाळा कोरडा गेला आहे. पाऊस नसल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. आता शेतकऱ्यांचे डोळे सरकारच्या मदतीकडे लागले आहेत. राज्यात सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा, दुष्काळ जाहीर करा अशी मागणी विरोधी पक्षातील नेत्यांकडून सुरू आहे.

दरम्यान याच सर्व पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी थेट आपल्या शेतातील सोयाबीनचं पिक दाखवत सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारने दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.  तसेच आढावा बैठकीवेळी सोशल मीडियावर व्यस्थ असलेल्या अधिकाऱ्यांवरून देखील त्यांनी सरकारला टोला लगावला आहे.

नेमकं काय म्हणाल्या अंधारे? 

‘हे माझ्या शेतातील सोयाबीन, शेंगा जर तुम्ही बघितल्या तर त्यामध्ये दोन दाने देखील भरले नाहीत. दुष्काळ फक्त औपचारिकता म्हणून जाहीर करण्याचा अवकाश आहे. परंतु इथे सगळी दुष्काळीच परिस्थिती आहे. त्यामुळे अशा काळात खरं म्हणजे सरकारने थेटपणे दुष्काळ जाहीर केला पाहिजे. मात्र सरकार फक्त पहाणी दौरेच करत आहे. ही शेंग पहा, या संपूर्ण एका सोयाबीनच्या शेंगेमध्ये फक्त एक दाणा आहे. शेतकरी उपाशी मरतोय अन् नेते मात्र काजू बदामावर ताव मारत आहेत. आज पुन्हा एकदा आणखी एक गोष्ट पुढे आली आहे, ती म्हणजे पहाणी दौऱ्याची बैठक सुरू आहे, आणि अधिकारी सोशल मीडियामध्ये व्यस्त होते. अधिकाऱ्यांची काही चूकच नाही. सत्ताधारी नेत्यांना पाहिजे असलेलं कमिशन जर बिनबोभाट पोहोचवलं जात असेल तर अधिकाऱ्यांना नेत्यांचा धाक असण्याचं काही कारण नाही, पण या सगळ्यांमध्ये दुष्काळाने त्रस्त झालेला जो शेतकरी आहे, त्याचा वाली कोणीच नाही,’ असं यावेळी सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल