Raja Shivaji : अभिषेक बच्चनमुळे ‘राजा शिवाजी’ सिनेमातील ‘या’ सीनवर फिरवली कात्री, रितेशकडून मोठं सत्य समोर

Raja Shivaji : अभिनेता रितेश देशमुख स्टारर 'राजा शिवाजी' सिनेमा सध्या सर्वत्र चर्चेत आहे. दरम्यान सिनेमातील महत्त्वाचा सीन कट करण्यात आला, ज्यावर रितेश याने मोठं वक्तव्य केलं आहे.

Raja Shivaji : अभिषेक बच्चनमुळे राजा शिवाजी सिनेमातील या सीनवर फिरवली  कात्री, रितेशकडून मोठं सत्य समोर
| Updated on: May 12, 2026 | 12:33 PM

Ritesh Deshmukh Interview: अभिनेता रितेश देशमुख स्टारर आणि दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ सिनेमाची गर्जना सध्या सर्वत्र ऐकू येत आहे. सध्याच्या घडीला प्रत्येक जण या सिनेमाची तुलना, सिनेमाशी करत आहे… पण सिनेमातील सर्वात जास्त रडवणारा जो सीन आहे, त्या सीनमध्ये अभिनेता अभिषेक बच्चन याच्यामुळे मोठे बदल करण्यात आले आहेत. टीव्ही 9 हिंदी डिजिटलला दिलेल्या मुलाखतीत रितेश याने त्या सीनबद्दल मोठा खुलासा केला आहे. ज्यावर अभिषेक याच्यामुळे कात्री फिरवण्यात आली.

सिनेमात अभिषेक याने महाराजांचे भाऊ संभाजी भोसले यांची भूमिका साकाकली आहे. सिनेमात हाय पॉइंट तेव्हा येतो, जेव्हा महाराजांच्या भावाच्या मृत्यूची बातमी समोर येते… रितेश म्हणाला, ‘हा सीन शूट करणं आणि त्यावर अभिनय करणं फार कठीण होतं… कारण या सीनमध्ये महाराजांनी घरी परतून माँसाहेब जिजाऊ यांना सांगायचं होतं की, त्यांचा मुलगा आता या जगात नाही…

रितेश देशमुख म्हणाला, ‘सुरुवातीला मी सीन एडिट केला, ज्यामध्ये डायलॉग होते, जसं की, महाराजांना पाहिल्यानंतर माँसाहेबांना कळतं की, कोणाला तरी वीरमरण आलं आहे… यावर माँसाहेब विचारतात, ‘आबासाहेब…’ आणि महाराज म्हणतात नाही, पुन्हा माँसाहेब विचारतात, शंभू? आणि महाराजांकडून उत्तर येतं… हो…’

अभिषेक बच्चन काय म्हणाला?

रितेश याने जेव्हा हा सीन अभिषेक याला दाखवला, तेव्हा अभिषेक याने रितेश याला एक सल्ला दिला… अभिषेक म्हणाला, ‘रितेश ज्याठिकाणी तू ‘हो’ बोलत आहेस, तो एक शब्द कट कर… तेव्हा त्यांच्याकडे दुःख व्यक्त करण्यासाठी शब्द देखील नसतील…’, अशात अभिषेक याने दिलेल्या सल्ल्यानंतर रितेश याने ‘हो’ हा एक शब्द हटवला.

रितेश पुढे म्हणतो, ‘सिनेमात अभिषेक याचं फार मोठं योगदान आहे..’ अभिषेक याचे शब्द रितेशच्या काळजाला भिडले आणि त्याने ती एक ओळ वगळली. आता, सिनेमात महाराज बोलत नाहीत; त्यांचं मौन आणि त्यांच्या चेहऱ्यावरील वेदना खूप काही सांगून जातात.’कधी – कधी भावनेच्या भरात आपण जास्त बोलून जातो. पण त्या सीनमध्ये मौनाची जी शक्ती होती, ती शक्ती फक्त अभिषेक याला ओळखता आली…’ असं देखील रितेश म्हणाला.

अभिषेक याने का दिला असा सल्ला?

अभिषेक बच्चन मुलखतीत म्हणाला, ‘एखाद्या कलाकारासाठी सर्वात कठीण काम स्वतःवर नियंत्रण मिळवणं असतं.’, रितेश याचं कौतुक करत अभिनेता म्हणाला, ‘सहसा एखाद्या कलाकाराला जेव्हा इमोशनल सीन करण्याची संधी मिळते, तेव्हा तो विचार करतो की, मी खूप रडेल, ओरडेल आणि सीन पूर्ण करेल. पण रितेश याने त्याठिकाणी स्वतःला थांबवलं. एक हिरो तोच असतो, ज्या रडायचं तर असतं, पण तो स्वतः अश्रू गिळून घेतो. त्याच वेदना दर्शकांपर्यंत अधिक पोहोचतात.’ असं देखील अभिषेक बच्चन म्हणाला.

Follow Us