AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘इस्लाम कबूल करत मी फातिमा झाले’, लव्ह – जिहादबद्दल राखी सावंत हिचं मोठं वक्तव्य

आदिलसोबत लग्न केल्यानंतर राखी हिने स्वीकारला इस्लाम, लग्नानंतर राखीची फातिमा झाली, विवाहामुळे चर्चेत आलेल्या राखी सावंत हिचं लव्ह - जिहादबद्दल मोठं वक्तव्य

'इस्लाम कबूल करत मी फातिमा झाले', लव्ह - जिहादबद्दल राखी सावंत हिचं मोठं वक्तव्य
'इस्लाम कबूल करत मी फातिमा झाले', लव्ह - जिहादबद्दल राखी सावंत हिचं मोठं वक्तव्य Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 18, 2023 | 12:25 PM
Share

मुंबई : अभिनेत्री राखी सावंत कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून राखी बॉयफ्रेंड आदिल याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आली आहे. राखी हिने आदिलसोबत निकाह केल्याचे फोटो पोस्ट करत सर्वांना हैराण केलं. मुस्लिम आदिल खान याच्यासोबत लग्न केल्यानंतर राखीने स्वतःचं नाव देखील बदललं आहे. आदिलसोबत निकाह केल्यानंतर अभिनेत्रीने लव्ह – जिहादबद्दल मोठं वक्यव्य केलं आहे. ज्यामुळे राखी पुन्हा चर्चेत आली आहे. राखीने निकाहनंतर इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर एका व्हिडीओच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.

राखी सावंत आणि आदिल यांना विचारण्यात आलं की, दोघांचं नातं आणि लव्ह – जिहादबद्दल अनेक चर्चा रंगत आहेत. यावर राखी म्हणाली, ‘पहिली गोष्ट तर मला माहिती नाही की लव्ह – जिहाद काय आहे. मला फक्त प्रेम काय असतं एवढंच माहिती आहे. आम्ही जात – धर्म मानत नाही. त्याने मला कबूल केलं आहे आणि मी त्याला कबूल केलं. आमच्यामध्ये धर्म नाही.’ असं अभिनेत्री म्हणाती.

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘आम्ही निकाह केला आहे. आदिलने माझं नाव आता फातिमा ठेवलं आहे. मी इस्लाम स्वीकराला आहे आणि या गोष्टीचा मी स्वीकर करते. माझं प्रेम मिळवता यावं म्हणून मला जे करता आलं ते मी केलं. माझ्या पतीला मिळवण्यासाठी मी सर्व काही केलं आहे. ‘ असं देखील राखी म्हणाली.

दरम्यान, आदिलने १६ जानेवारी रोजी एक पोस्ट केली आणि राखीसोबत लग्न मान्य केलं. पोस्टमध्ये आदिल म्हणाला, ‘मी तुझ्यासोबत लग्न केलं नाही, असं कधीच मी म्हणालो नाही. मला काही गोष्टी स्पष्ट करायाच्या होत्या. म्हणून मी शांत होतो.’ असं म्हणत आदिलने राखीला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या.

राखी आणि आदिल यांनी सात महिन्यांपूर्वी लग्न केलं. त्यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पण लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर आदिल लग्नाला नकार देत असल्याची माहिती समोर आली. दोघांच्या नात्यात अभिनेता सलमान खान याने पुढाकार घेतल्यामुळे सर्व काही सुरळीत झालं असल्याचा असा खुलासा देखील राखी आणि आदिल यांनी केला. सध्या राखी आणि आदिल त्यांच्या नात्यामुळे तुफान चर्चेत आहेत.

Follow Us
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले हिंदुत्त्व...
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
Sachin Ahir | ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! सचिन अहिर यांनी ठणकावू सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
Sachin Ahir Exclusive| 6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
Nalasopara Rain Updates | मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या लोकल
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना नेमका काय इशारा?
राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया...
Sudhir Mungantiwar | राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, योगी आदित्यनाथ...
56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी
Sudhir Mungantiwar | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी; एकही शेतकरी वंचित राहणार नाही - सुधीर मुनगंटीवार
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून...
Kalyan News | कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून नागरिकांची जीवघेणी कसरत
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने खळबळ, नेमका रोख कोणाकडे?