AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘अमिताभ बच्चन यांनी नातं ठेवलं नाही, कारण….’, सलीम खान यांच्यासोबत बिग बींचे असलेले संबंध अखेर समोर आलेच

बॉलिवूडचे दोन प्रसिद्ध सेलिब्रिटी सलीम खान आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्यामध्ये कसे आहेत संबंध; १९७३ साली प्रदर्शित झालेल्या 'जंजीर' सिनेमाच्या यशानंतर अनेक वर्षांनी सलीम खान स्पष्टच म्हणाले...

'अमिताभ बच्चन यांनी नातं ठेवलं नाही, कारण....', सलीम खान यांच्यासोबत बिग बींचे असलेले संबंध अखेर समोर आलेच
सलीम खान आणि महानायक अमिताभ बच्चन
| Updated on: Feb 05, 2023 | 10:43 AM
Share

Salim Khan And Amitabh Bachchan : सलीम खान (salim khan) आणि जावेद अख्तर यांनी १९७३ साली प्रदर्शित झालेल्या ‘जंजीर’ सिनेमातून बॉलिवूडला एक ‘एंग्री यंग मॅन’ दिला. ‘जंजीर’ सिनेमामुळे सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्यासोबतच महानायक अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांच्या करियरला देखील वेगळी दिशा मिळाली. नुकताच सलीन खान यांनी मुलगा आणि अभिनेता अरबाज खान याच्या शोमध्ये बिग बींसोबत असलेल्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला. जावेद अख्तर यांच्यासोबत संपर्क तुटल्यानंतर सलीम खान आणि बिग बी यांच्यामध्ये देखील दुरावा निर्माण झाला. (amitabh bachchan salim khan movies)

सलीम खान यांनी ‘जंजीर’साठी सर्व प्रथम धर्मेंद्र, देव आनंद आणि दिलीप कुमार यांना सिनेमाची स्क्रिप्ट पाठवली, पण त्यांनी सिनेमा करण्यास नकार दिला. त्यानंतर सिनेमाची स्क्रिप्ट अमिताभ बच्चन यांना देण्यात आली. पण सिनेमा करण्यासाठी एकही अभिनेत्री तयार नव्हती. त्यानंतर सलीम यांनी अभिनेत्री जया भादुरी यांना सिनेमात काम करण्यासाठी विनंती केली.

पण जया भादुरी यांनी देखील सिनेमात काम करण्यासाठी नकार दिला. अखेर सिनेमात अभिनेत्री जया बच्चन यांनी मुख्य भूमिका साकारली. पुढे सलीम खान म्हणाले, ‘अमिताभ बच्चन प्रोफेशनल होते. बिग बींच्या अभिनयावर विश्वास असल्यामुळे कायम त्यांच्या नावाची कायम निवड करायचो. पण जावेद अख्तर यांच्यापासून वेगळं झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी देखील संबंध तोडले.’

‘नातं कायम ठेवण्याची जबाबदारी बिग बींवर देखील होती. पण काही कारणांमुळे त्यांनी तसं केलं नाही.’ जावेद अख्तर यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर सलीम खान आणि अमिताभ बच्चन यांनी १९८९ साली प्रदर्शित झालेल्या तूफान सिनेमात एकत्र काम केलं. सलीम खान यांनी सांगितलं की, ‘अमिताभ बच्चन प्रोफेशनल होते. पण ते कधी मित्र झाले नाहीत.’

‘मी कधी असं दाखवलं नाही की मी त्यांचा चांगला मित्र आाहे. त्यांचा स्वभाव फक्त माझ्यासाठी असा नव्हता. पण त्यांनी कधी कोणासोबत नातं घट्ट करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांनी कायम प्रोफेशनली काम केला. त्यांनी प्रचंड उत्तम काम केलं..’ असं देखील सलीम खान यांनी मुलगा अजबाज खान याच्या शोमध्ये बोलून दाखवलं.

सांगायचं झालं तर, सलीम खान आणि अमिताभ बच्चन देखील बॉलिवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रिटी आहे. एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र बिग बींच्या अभिनयाचं कौतुक सर्वत्र व्हायचं. आज देखील त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. सोशल मीडियाच्या माध्यामातून बिग बी कायम चाहत्यांच्या संपर्कात असतात.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.